बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पावसाने अतोनात नुकसान; राज्य सरकारने तात्काळ मदत जाहीर न केल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करू: धनंजय मुंडे
Beed: मागील काही दिवसात परतीच्या पावसाने परळी तालुक्यासह बीड जिल्ह्यातील शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर न केल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा ईशारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी केले आहे.

Beed: मागील काही दिवसात परतीच्या पावसाने परळी तालुक्यासह बीड जिल्ह्यातील शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारला शेतकऱ्यांची ही परिस्थिती पाहूनतरी पाझर फुटेल का, सरकारने अतिवृष्टीने ग्रासलेल्या या शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर न केल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा ईशारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी केले आहे.
शासकीय यंत्रणा या पावसाने केलेल्या नुकसानीला कोणत्या निकषात पाहतात माहीत नाही, मात्र या पावसाने झालेले नुकसान अतिवृष्टीच्या निकषांपेक्षा अनेक पटींनी जास्त आहे. मागील 15 दिवसात जिल्ह्यात जवळपास दररोज एक शेतकरी आत्महत्या करत आहे. यावर शासन प्रशासन कोणतीही उपाययोजना करू शकले नाही. काल शिरूर तालुक्यात 4 जणांचा पावसाच्या कहारामुळे मृत्यू झाला. आज परळी तालुक्यात एक युवकाचा पुरात वाहून जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला. शासनाने याची दखल घेतल्याचे अजूनतरी दिसून आले नाही, हे दुर्दैवी असून राज्यात सरकार आहे तरी कुठे, असा संतप्त सवाल धनंजय मुंडे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.
मागील तीन महिन्यांच्या नुकसानीचे दोन वेगवेगळ्या मदतीचे जीआर आले, कोट्यावधी रुपयांच्या मदतीची घोषणा झाली पण त्यात बीड जिल्ह्यात नुकसान झालेच नाही, असा दावा करत सरकारने मदतीपासून वगळले. आता जे समोर दिसते आहे, ते नुकसान पाहूनतरी सरकारच्या मनाला पाझर फुटणार आहे का? असा प्रश्न उपस्थित करत धनंजय मुंडे यांनी सरकारला तातडीने मदतीचा निर्णय घेण्याची विनंती केली आहे.
काल रात्रीपासून परळी मतदारसंघात ढगफुटीसदृश जोरदार पाऊस पडतो आहे. शेतीचे नुकसान पाहून तर मन सुन्न होते आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर बळीराजा कोलमडून पडला आहे. राज्य सरकारने काल झालेल्या मंत्री मंडळ बैठकीत अतिवृष्टी बाधित मराठवाडा व विदर्भासाठी काहीतरी ठोस निर्णय घेणे अपेक्षित होते मात्र असे झाली नाही, त्यामुळे लाखो शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे.
धनंजय मुंडे यांनी आज परळी तालुक्यात पावसाने नुकसान केलेल्या वाघबेट, कौठळी, कौठळी तांडा, बेलंबा, इंजेगाव आदी गावांमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पावसाने अक्षरशः कहर केला असून, कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिके संपूर्णतः वाया गेली आहेत. काही ठिकाणी नदी काठच्या घरांमध्ये पाणी शिरल्यानेही नुकसान झाले आहे. घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य, किराणा, धान्य आदी नुकसान झाले असेल अशा कुटुंबांना तातडीने आकस्मिक निधीतून अर्थ सहाय्य देण्याच्या सूचना मुंडे यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना केल्या आहेत. तसेच शेतीच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे तात्काळ पूर्ण करून शासनास पाठवावेत, अशाही सूचना त्यांनी केल्या.
Before You Go
Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!























