एक्स्प्लोर

Chandrakant Khaire : समांतर जलवाहिनी भाजपनेच बंद पाडली, फडणवीसांनी शहरात यायची गरज नव्हती : चंद्रकांत खैरे

औरंगाबाद शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईविरोधात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी भाजपकडून भव्य असा मोर्चा काढण्यात आला होता. यावर खैरे यांनी टीका केली

Chandrakant Khaire : संभाजीनगर हा बाळासाहेब ठाकरे यांचा गड आहे. समांतर जलवाहिनी भाजपनेच बंद पाडली. आता या प्रकल्पाची रक्कम वाढली असून हे पाप भाजपचं असल्याची टीका शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांनी या शहरात यायची काही आवश्यकता नव्हती. पाच हजारापेक्षा जास्त लोक या मोर्चात नव्हते असेही खैरे म्हणाले. औरंगाबाद शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईविरोधात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी भाजपकडून भव्य असा मोर्चा काढण्यात आला होता. यावर खैरे यांनी टीका केली.

राज ठाकरेंना नामकरणाची प्रोसिजर माहिती आहे का?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील यावेळी चंद्रकांत खैरे यांनी टीका केली. राज ठाकरे यांना राज ठाकरेंना नामकरणाची प्रोसिजर तरी माहिती आहे का? असा टोला खरैंनी राज ठाकरेंना लगावला. औरंगाबादच्या नामांतरणाच्या मुद्यावरुन राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टिकेला उत्तर देताना खैरे यांनी राज यांच्यावर निशाणा साधला.
 
राज्यसभेबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय मान्य

सध्या राज्यसभेची निवडणूक लागली आहे. शिवसेनेकडून दोन जणांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहे. यामध्ये चंद्रकांत खैरे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. यावर खैरे यांनी प्रतिक्रिया दिली. यावर बोलताना खैरे म्हणाले की,राज्यसभेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य असेल असे खैरे म्हणाले. संभाजीराजे यांनी शिवसेनेत यायला नकार दिल्याची माहिती मिळत आहे,  उद्धव साहेब यातून मार्ग काढतील, असेही खैरे यावेळी म्हणाले.

आठ जूनला मुख्यमंत्री औरंगाबादला येणार 

येत्या आठ जूनला शिवसेनेचा मराठवाड्यातल्या पहिल्या शाखेचा वर्धापन दिन आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे औरंगाबादमध्ये येणार आहेत. यावेळी ते सगळ्यांचा समाचार घेतील असेही खैरे म्हणाले. 
माझ्या मित्र नितीन गडकरी यांचे मला दुःख आहे. कारण, नॅशनल हायवे 211 मधल्या टनेलचे भूमिपूजन झालं आहे, पण ते आता म्हणतात पैसे नाहीत. सगळ्यांनी पत्र देऊनही गडकरी हे काम करत नाहीत. याबाबत काय राजकारण आहे मला माहिती नाही असेही खैरे यावेळी म्हणाले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
Uday Samant : भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला
भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला
BMC Election: पहिल्यांदा एबी फाॅर्मवरून शिल्पा केळुसकरांनी जाता जाता भाजपचा 'पोपट' केला; आता भाजपने ठिय्या आंदोलन करत काय केलं?
पहिल्यांदा एबी फाॅर्मवरून शिल्पा केळुसकरांनी जाता जाता भाजपचा 'पोपट' केला; आता भाजपने ठिय्या आंदोलन करत काय केलं?

व्हिडीओ

Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Akola BJP : भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला थेट उमेदवारी, गरीब कुटुंब रातोरात आलं चर्चेत
Panvel Election : पनवेलमध्ये भाजपला मोठा धक्का, स्नेहा शेंडेंची माघार, अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून
Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
Uday Samant : भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला
भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला
BMC Election: पहिल्यांदा एबी फाॅर्मवरून शिल्पा केळुसकरांनी जाता जाता भाजपचा 'पोपट' केला; आता भाजपने ठिय्या आंदोलन करत काय केलं?
पहिल्यांदा एबी फाॅर्मवरून शिल्पा केळुसकरांनी जाता जाता भाजपचा 'पोपट' केला; आता भाजपने ठिय्या आंदोलन करत काय केलं?
Shahajibapu Patil : काय ती झाडी, काय ते डोंगार... शहाजी बापूंची तोफ आता मुंबईत धडाडणार, पहिले टार्गेट संजय राऊत
काय ती झाडी, काय ते डोंगार... शहाजी बापूंची तोफ आता मुंबईत धडाडणार, पहिले टार्गेट संजय राऊत
Ajit Pawar Pimpri Chinchwad Election 2026: अजित पवारांना भाजपसोबत घेताना मी फडणवीसांना बोललो होतो, 'एकदा विचार करा'; रवींद्र चव्हाणांनी पिंपरी-चिंचवडमध्ये दंड थोपटले
अजित पवारांना भाजपसोबत घेताना मी फडणवीसांना बोललो होतो, 'एकदा विचार करा'; रवींद्र चव्हाणांनी पिंपरी-चिंचवडमध्ये दंड थोपटले
मोठी बातमी! भाजपच्या बिनविरोध पॅटर्नची मनसेकडून पोलखोल होणार; राज ठाकरेंचं पुन्हा 'लाव रे तो व्हिडिओ'
मोठी बातमी! भाजपच्या बिनविरोध पॅटर्नची मनसेकडून पोलखोल होणार; राज ठाकरेंचं पुन्हा 'लाव रे तो व्हिडिओ'
Akola Crime News: समलिंगी नात्यातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या; अकोल्यात खळबळ, तीन वर्षे एकत्र राहणाऱ्या तरुणांमध्ये संशयातून वाद
समलिंगी नात्यातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या; अकोल्यात खळबळ, तीन वर्षे एकत्र राहणाऱ्या तरुणांमध्ये संशयातून वाद
Embed widget