एक्स्प्लोर

'मातोश्री'वरील शिवसेना आमदारांच्या बैठकीत मोबाईल फोनवर बंदी

शिवसेनेच्या आजच्या बैठकीत अंतिम निर्णय होऊ शकतो. यानंतर शिवसेनेच्या आमदारांशी इतर कुणाचाही संपर्क होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. त्यासाठी शिवसेनेच्या आमदारांची रवानगी नरिमन पॉईंट येथील हॉटेल ट्रायडंटमध्ये होणार आहे.

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे सरकार स्थापनेबद्दल आपला निर्णय जाहीर करु शकतात. दरम्यान या बैठकीसाठी शिवसेना आमदार मातोश्रीवर पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. खबदारीचा उपाय म्हणून या बैठकीत मोबाईल फोनवर बंदी घालण्यात आली आहे. तर मातोश्रीला छावणीचं स्वरुप आलं आहे. मातोश्रीबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यानंतर शिवसेनेच्या आमदारांशी इतर कोणाचाही संपर्क होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. त्यासाठी शिवसेनेच्या आमदारांची रवानगी नरिमन पॉईंट इथल्या हॉटेल ट्रायडंटमध्ये होणार आहे. आमदार फुटीच्या भीतीने शिवसेना हे पाऊल उचलणार असल्याचं कळतं. सत्ताधाऱ्यांनी सर्व पक्षांचे आमदार फोडण्याचा गेल्या काही दिवसात प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. त्यासाठी भाजपने गुंडांचा, धमक्यांचा वापर केल्याचेदेखील राऊत यांनी सांगितले होते. त्यामुळे शिवसेनेने सावध पवित्रा घेतला आहे. तर भाजपने सत्ता स्थापनेचा दावा करावा : संजय राऊत   सत्तास्थापनेचा संघर्ष अंतिम टप्प्यात आलेला असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल याचा पुनरुच्चार केला आहे. त्यासोबतच कोणत्याही परिस्थितीत शिवसेना आमदार फुटणार नाहीत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. तसंच भाजपकडे 145 चा आकडा असेल तर त्यांनी सरकार स्थापनेचा दावा करावा. त्यांच्या हातात सत्ता, पैसा आणि पॉवर असल्यामुळे ते सत्ता स्थापनेचा प्रयत्न करतील. पण महाराष्ट्रात आम्ही ते होऊ देणार नाही, असं म्हणत राऊत यांनी भाजपला आव्हान दिलं आहे. भाजप नेते राज्यपालांची भेट घेणार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन आठवडे सुरु असलेला सत्तासंघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिनिधी म्हणून आज चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार  राज्यपालांची भेट घेणार आहेत. दुपारी 2 वाजता ही भेट होणार आहे. यात भाजप सत्ता स्थापनेचा दावा करतं का हे पाहणं महत्वाचं आहे. विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून चौदा दिवस लोटले तरी राज्यातील सत्तेचा पेच सुटलेला नाही. त्यामुळे अनेक कामं आणि निर्णय रखडले आहेत. तसंच 9 नोव्हेंबर रोजी राज्याच्या विधीमंडळाची मुदतही संपतं आहे. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. मात्र राष्ट्रपती राजवट लागू होऊ नये यासाठी आजच सत्तेचा तिढा सोडवणं आवश्यक आहे. त्यादृष्टीने मुंबईत आज घडमोडी वेगाने घडत आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 

व्हिडीओ

Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
Embed widget