एक्स्प्लोर

Aurangabad: दिवाळीपर्यंत तरी दोन-तीन दिवसांआड औरंगाबादकरांना पाणी द्या; औरंगाबाद खंडपीठ

Aurangabad Water Issue: एक लाख बेकायदा नळ कनेक्शन असतांना फक्त 428 वरच का कारवाई केली  असा प्रश्न सुद्धा न्यायालयाने उपस्थित केला.

Aurangabad News: एकीकडे जायकवाडी धरणातून दोन वेळा पाणी सोडण्याची वेळ आली असतांना, दुसरीकडे औरंगाबादकरांचा पाणी प्रश्न काही सुटता सुटत नसल्याचे चित्र कायम आहे. औरंगाबाद खंडपीठात यावर बुधवारी सुनावणी झाली. यादरम्यान खंडपीठाने महानगरपालिका प्रशासनाचे कान टोचल्याचे पाहायला मिळाले. औरंगाबादकरांना दिवाळीपर्यंत तरी दोन-तीन दिवसांआड पाणी द्या अशी अपेक्षा व्यक्त करत न्यायालयाने महापालिकेचे कान टोचले. 

बुधवारी औरंगाबाद खंडपीठात औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर सुनावणी झाली. यादरम्यान शहरातील बेकायदा नळ कनेक्शनच्या मुद्यावरून न्यायालयाने महापालिकेला कारवाई करत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तर एक लाख बेकायदा नळ कनेक्शन असतांना फक्त 428 वरच का कारवाई केली  असा प्रश्न सुद्धा न्यायालयाने उपस्थित केला. तर औरंगाबादकरांना दिवाळीपर्यंत तरी दोन-तीन दिवसांआड पाणी द्या असे म्हणत मनपाचे कान टोचले. 

पाणी प्रश्न कधी सुटणार...

गेली अनेक वर्षे औरंगाबादकर पाणी प्रश्नाला तोंड देत आहेत. उन्हाळ्यात तर अनेक भागात दहा ते बारा दिवस नळाला पाणीच येत नाही. काही वस्त्यांमध्ये तर पाणीच पोहचत नसल्याने त्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. राज्यातील राजकारणात नेहमीच केंद्रबिंदू ठरलेल्या औरंगाबाद शहराच्या पाणी प्रश्न मिटवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रमाणिक प्रयत्न कधी केलाच नसल्याचा आरोप नागरिक करतात. त्यामुळे पाणी प्रश्न मिटवण्यासाठी नेतेमंडळी आणि प्रशासन अपयशी ठरत असल्याने आता खंडपीठानेच पुढाकार घेतला आहे. 

निवडणुकीत कळीचा मुद्दा...

औरंगाबादच्या प्रत्येक निवडणुकीत शहरातील पाणी प्रश्न कळीचा मुद्दा ठरतो.  विशेष करून महानगरपालिका निवडणूक तोंडावर आल्यावर यावरून राजकीय वातवरण तापतांनाचे चित्र पाहायला मिळते. तर सर्वच पक्षांकडून पाणी प्रश्न मार्ग लावण्याचे आश्वासन दिले जातात. जाहीरनाम्यात सुद्धा पाणी प्रश्न प्रामुख्याने पाहायला मिळतो. मात्र असे असतांना देखील गेली कित्येक वर्षे औरंगाबादकरांचा पाणी प्रश्न सुटलेला नाही. 

पाच मंत्री असतांना पाणी प्रश्न सुटणार का?

नुकत्याच झालेल्या शिंदे-फडणवीस मंत्रीमंडळ विस्तारात औरंगाबादला तीन कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहेत. तर यापूर्वी दोन केंद्रीय मंत्रिपद औरंगाबादकडे आहेत. त्यातच आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद सुद्धा औरंगाबादला मिळाले आहे. त्यामुळे एवढ सर्व असतांना किमान आतातरी औरंगाबाद शहराचा पाणीप्रश्न सुटेल का? असा प्रश्न शहारतील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 12 May 2024Pankaja Munde On Politics : काहींना वाटतं अभद्र बोलणं म्हजणे चांगलं...पंकजा मुंडेंचा रोख कुणारवर?TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 04PM : 12 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 05 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळेंचा भाजपामध्ये प्रवेश
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळेंचा भाजपामध्ये प्रवेश
Embed widget