एक्स्प्लोर

MIM Protest: शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, एमआयएमकडून औरंगाबादमध्ये धरणे आंदोलन

MIM Protest Aurangabad: यावेळी भाजप नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

MIM Protest Aurangabad: भाजप (BJP) नेते आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज्यभरात संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. विरोधकांकडून रस्त्यावर उतरून आंदोलन केले जात आहे. दरम्यान आता एमआयएमकडून देखील रस्त्यावर उतरून आंदोलन केले जात आहे. औरंगाबादमध्ये आज शहरातील क्रांती चौकात एमआयएमकडून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

यावेळी 'भाजप हटाव देश बचाव' अशा घोषणाबाजी करण्यात आली. तर शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. तसेच राज्यपाल यांना राज्यातून परत पाठवण्याची देखील मागणी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी केली. तर शिवाजी महाराज यांचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नसल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला. यावेळी एमआयएम कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. 

राज्यपाल हटाव महाराष्ट्र बचाव 

यावेळी करण्यात आलेल्या आंदोलनावेळी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सोबतच राज्यपाल हटाव महाराष्ट्र बचाव असे होर्डिंग कार्यकर्त्यांच्या हातात पाहायला मिळाले. तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान सहन केला जाणार नसल्याचं उल्लेख असलेले बॅनर देखील यावेळी पाहायला मिळाले. तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. 

एमआयएमची प्रतिक्रिया...

यावेळी बोलतांना एमआयएमचे शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाची आण बाण शान आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले जात असतील ते महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. शिवाजी महाराज यांना आम्ही हिरो मानतो. त्यामुळे भाजपसाठी शिवाजी महाराज मोठे आहेत की, कोश्यारी मोठे आहेत हे त्यांनी स्पष्ट करावे. तर राज्यपाल कोश्यारी यांची तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी देखील यावेळी नक्शबंदी यांनी यावेळी केली.  

जलील यांचीही टीका... 

दरम्यान यावर बोलतांना जलील यांनी देखील भाजपवर टीका केली आहे. यावर बोलतांना ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही मंत्र्याला यापुढे कोणत्याही कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचे अधिकार नसायला पाहिजे. भाजपसाठी कोश्यारी महत्वाचे आहेत की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर महत्वाचा ही आता त्यांच्यासाठी परीक्षा आहे. त्यामुळे या परीक्षेत पास व्हायचं की, नापास हे त्यांच्या  हातात असल्याचा इशारा जलील यांनी भाजपला दिला आहे. आमच्यासोबत राजकीय मतभेद काहीही असू द्या, मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल होणारे वादग्रस्त विधान आम्ही सहन करणार नसल्याचं खासदार जलील म्हणाले.

मोठी बातमी! औरंगाबादमध्ये मनसे आक्रमक, कर्नाटक बँकेला फासलं काळे

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी

व्हिडीओ

Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
Embed widget