एक्स्प्लोर

Marathwada: मराठवाड्यातील 647 गावांत पाणीटंचाई; 852 विहिरींचे अधिग्रहण, 94 टँकरद्वारे...

Water Problem: मराठवाड्यात 1 ते 15 जूनदरम्यान 45.50 मि.मी. पाऊस झाला आहे.

Marathwada Water Issues: पावसाळा सुरु होऊन तीन आठवडे उलटत चालले असतानाही मराठवाड्यातील  पाणी टंचाई अजूनही कायम आहे. मराठवाडा विभागातील विविध जिल्ह्यातील 647 गावांत आजही पाणीटंचाई असून 94  टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सोबतच 852 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तर सर्वाधिक टँकर जालना जिल्ह्यात सुरु आहे. तर सर्वाधिक 294 विहिरी हिंगोली जिल्ह्यात अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. 

गेल्या तीन वर्षांपासून जून महिन्याच्या सुरवातीलाच दमदार पाऊस पडत असल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र यावर्षी अर्धा महिना उलटूनही दमदार असा पाऊस झाला नाही. तर काही भागात एकही  पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली असून, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. तर टँकरच्या संख्येत सुद्धा दिवसेंदिवस वाढ होत आहे. 

कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती...

औरंगाबाद जिल्ह्यात आजघडीला 5 टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, 90 विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. जालना जिल्ह्यात 43 टँकर आणि 93 विहिरी, परभणी 1  टँकर आणि 29 विहिरी, हिंगोली 20  टँकर आणि 294 विहरी, नांदेड 16  टँकर आणि 164 विहिरी, बीड 8 टँकर आणि 161 विहिरी, लातूर जिल्ह्यात 17 आणि उस्मानाबाद जिल्ह्यात 4 विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. 

कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस...

मराठवाड्यात 1 ते 15 जूनदरम्यान 45.50 मि.मी. पाऊस झाला आहे. यात औरंगाबादेत 50.8 मि.मी., जालना 40.5 मि.मी., बीड 49.1 मि.मी., लातूर 32.5 मि.मी., उस्मानाबाद 42.8 मि.मी., नांदेड 51.9 मि.मी., परभणी 47.8 मि.मी. आणि हिंगोलीत 41.3 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

भाजपकडून मोर्चे...

मराठवाड्यात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या विरोधात भाजपकडून विविध जिल्ह्यात जल आक्रोश मोर्चे काढण्यात येत आहे. आधी औरंगाबाद आणि आता जालना जिल्ह्यात सुद्धा मोर्चा काढण्यात आला. तसेच ज्या जिल्ह्यात पाणी टंचाई तिथे भाजप अशी घोषणा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यात केली. त्यामुळे यापुढे सुद्धा टंचाईग्रस्त जिल्ह्यात भाजपकडून मोर्चे काढले जाण्याची शक्यता आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Earthquake Tremors : उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
Chandrakant Patil : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
कुंभच्या नावाखाली हिंदू तुडवला जातोय, शीखांच्या पगड्या उतरवल्या, आमच्या भूमीत भारतीयांच्या पायात अमेरिकेनं बेड्या घातल्या, काय केलं मोदींनी? संजय राऊतांचा सडकून प्रहार
कुंभच्या नावाखाली हिंदू तुडवला जातोय, शीखांच्या पगड्या उतरवल्या, आमच्या भूमीत अमेरिकेनं बेड्या घातल्या, काय केलं मोदींनी? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Team India Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी नवा वाद, टीम इंडियामध्ये पडली फूट?, गंभीर आणि आगरकरमध्ये जोरदार बाचाबाची
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी नवा वाद, टीम इंडियामध्ये पडली फूट?, गंभीर आणि आगरकरमध्ये जोरदार बाचाबाची
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat Nanded : स्वबळावर लढायचं तर आमची हरकत  नाही, आम्ही पण कमजोर नाहीSanjay Raut PC : संतोष देशमुख प्रकरणात भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल!Sanjay Gaikwad Dance Buldhana : आमदार संजय गायकवाड यांनी मुरळीवर धरला ठेका, दिलखुलास डान्सNew India Co-Oprative Bank :  Hitesh Mehta ने व्यवसायासाठी धर्मेशला 70 कोटी दिल्याची कबुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Earthquake Tremors : उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
Chandrakant Patil : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
कुंभच्या नावाखाली हिंदू तुडवला जातोय, शीखांच्या पगड्या उतरवल्या, आमच्या भूमीत भारतीयांच्या पायात अमेरिकेनं बेड्या घातल्या, काय केलं मोदींनी? संजय राऊतांचा सडकून प्रहार
कुंभच्या नावाखाली हिंदू तुडवला जातोय, शीखांच्या पगड्या उतरवल्या, आमच्या भूमीत अमेरिकेनं बेड्या घातल्या, काय केलं मोदींनी? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Team India Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी नवा वाद, टीम इंडियामध्ये पडली फूट?, गंभीर आणि आगरकरमध्ये जोरदार बाचाबाची
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी नवा वाद, टीम इंडियामध्ये पडली फूट?, गंभीर आणि आगरकरमध्ये जोरदार बाचाबाची
मुंबईतील हॉटेल्समध्ये आता तंदूर रोटी कायमची बंद?
मुंबईतील हॉटेल्समध्ये आता तंदूर रोटी कायमची बंद?
Indian Immigrant : मोदींच्या दौऱ्यानंतरही अमेरिकेतून हद्दपार होणाऱ्या भारतीयांच्या हातापायात साखळदंड सुरुच; 15 दिवस आंघोळ नाही, दातही घासले नाहीत, खायला सुद्धा कमी दिलं!
मोदींच्या दौऱ्यानंतरही अमेरिकेतून हद्दपार होणाऱ्या भारतीयांच्या हातापायात साखळदंड सुरुच; 15 दिवस आंघोळ नाही, दातही घासले नाहीत, खायला सुद्धा कमी दिलं!
Nana Patekar Wife In Chhaava Movie: 'छावा'मध्ये 'या' दिग्गज मराठमोळ्या अभिनेत्याच्या पत्नीनं साकारलीय 'धाराऊ'; नवऱ्यापासून वेगळी राहते, पण...
'छावा'मध्ये 'या' दिग्गज मराठमोळ्या अभिनेत्याच्या पत्नीनं साकारलीय 'धाराऊ'; नवऱ्यापासून वेगळी राहते, पण...
Tuljapur Drugs Case : तुळजापूर ड्रग्स प्रकरणाचे मुंबई कनेक्शन; आरोपींना बेड्या, तपासात धक्कादायक माहिती उघड
तुळजापूर ड्रग्स प्रकरणाचे मुंबई कनेक्शन; आरोपींना बेड्या, तपासात धक्कादायक माहिती उघड
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.