एक्स्प्लोर

Aurangabad: परीक्षेच्या सावळ्या गोंधळाच्या अहवालात विद्यापीठाचा जावईशोध; म्हणे, माध्यमं जबाबदार

विद्यापीठ प्रशासनाने शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवलेला अहवाल 'एबीपी माझा'च्या हाती लागला आहे.

Aurangabad University Exams: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी परीक्षांचा गोंधळ पाहायला मिळाला होता. ऐनवेळी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची संख्या शेकडोंनी वाढल्याने परीक्षा केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच परीक्षा केंद्रावर क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेला आल्यामुळे एका बेंचवर तीन-तीन विद्यार्थी बसविण्याची वेळ परीक्षा केंद्र संचालकांवर आली. त्यांनतर घडलेल्या या सर्व प्रकरणाची दखल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेत, चौकशीचे आदेश दिले  होते. त्यानुसार विद्यापीठाने शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना अहवाल पाठवला आहे. तर हा अहवाल 'एबीपी माझा'च्या हाती लागला असून, अहवालात विद्यापीठाने परीक्षेच्या सावळ्या गोंधळाला माध्यमं जबाबदार असल्याचा जावईशोध लावला आहे. विशेष म्हणजे या सर्व गोंधळाचे मुख्य कारण अहवालाच्या सर्वात शेवटी देण्यात आले आहे. 

 विद्यापीठाचा जावईशोध

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे की, गोंधळ झालेल्या परीक्षा केंद्रावर विविध संघटनांचे पदाधिकारी व मिडीया प्रतिनिधींनी परीक्षा केंद्रात अवैधरित्या प्रवेश करुन परीक्षार्थींचे लक्ष विचलित केले. तसेच महाविद्यालय व्यवस्थापनाला अतिरिक्त विद्यार्थीसंख्येसाठी बैठक व्यवस्था करण्यासाठी पुरेसा कालावधी दिला नाही. त्यामुळे गोंधळ निर्माण झाल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी केली असता, विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ निर्माण होवून परीक्षेबाबतच्या अनिश्चित परिस्थितीमुळे सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी गर्दी करून पालक, मिडिया व इतर पत्रकार व संघटना यांना दूरध्वनीवरून संपर्क केला. त्यांनतर प्रकरण इलेक्ट्रॉनिक माध्यमातून चुकीच्या पध्दतीने प्रसिध्द करण्यात आल्याचा अहवालात म्हटले आहे. 

मुख्य कारण अहवालाच्या सर्वात शेवटी... 

माध्यमांवर गोंधळाची ठपका ठेवणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाने गोंधळाचे खरं कारण सर्वात शेवटी नमूद केले आहे. ज्यात म्हटल आहे की, के. पंढरीनाथ पाटील संगणकशास्त्र महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय, येथे मूल्यांकन केंद्र सुरु असल्यामुळे सदरील केंद्रावरील 480 अतिरिक्त विद्यार्थी विजेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयाकडे वर्ग करण्यात आल्यामुळे सदरील परिस्थिती घडून आल्याचे निदर्शनास येत आहे. सदर परीक्षा केंद्रास अतिरिक्त विद्यार्थी संख्या देतांना एम.के.सी.एल. कडून समरीशिट जनरेट करतांना तांत्रिक चुकांमुळे मिळालेली संख्या व प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची यादी यामध्ये तफावत आढळून आली असल्याच म्हटल आहे. 

Aurangabad: मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी परीक्षांचा गोंध; एका बेंचवर तीन-तीन विद्यार्थी

तसेच, कुलगुरूंनी आणि परीक्षा विभागाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रास भेट दिल्यानंतर सदरील परीक्षा केंद्रावर झालेल्या गोंधळाची परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली असता, महाविद्यालयाकडे प्रत्यक्ष दिलेली विद्यार्थी संख्या व उपस्थित झालेली विद्यार्थी संख्या यात तफावत आढळून आली. महाविद्यालयाला अतिरिक्त विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था करण्यास पुरेसा अवधी मिळाला नसल्यामुळे एकाच बाकावर दोन विद्यार्थी किंवा काही ठिकाणी तीन विद्यार्थी परीक्षा देत असतांना निदर्शनास आल्याच सुद्धा अहवालात म्हटले आहे. 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटलांचा हॉस्पिटलमधूनच मोठा निर्णय, मराठा आरक्षणाच्या सर्व अभ्यासकांना अंतरवाली सराटीत बोलावलं, नेमकं प्रकरण काय? 
मनोज जरांगे पाटलांचा हॉस्पिटलमधूनच मोठा निर्णय, मराठा आरक्षणाच्या सर्व अभ्यासकांना अंतरवाली सराटीत बोलावलं, नेमकं प्रकरण काय? 
Manoj Jarange Patil Health Update: मनोज जरांगे तापाने फणफणले, 102 इतका ताप, टायफॉइडचीही लक्षणं; डॉक्टरांकडून महत्त्वाची अपडेट
मनोज जरांगे तापाने फणफणले, 102 इतका ताप, टायफॉइडचीही लक्षणं; डॉक्टरांकडून महत्त्वाची अपडेट
चक्कर, ताप, मळमळ ते अशक्तपणा! मनोज जरांगे पाटलांची तब्बेत बिघडली, उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल
चक्कर, ताप, मळमळ ते अशक्तपणा! मनोज जरांगे पाटलांची तब्बेत बिघडली, उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल
ST चालक मंद्यधुद, प्रवाशांच्या जीवाशी खेळ, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा अनर्थ टळला, चालक पोलिसांच्या ताब्यात
ST चालक मंद्यधुद, प्रवाशांच्या जीवाशी खेळ, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा अनर्थ टळला, चालक पोलिसांच्या ताब्यात

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget