एक्स्प्लोर

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या एकत्रित दौऱ्यामुळे प्रशासनावर परिणाम होऊ शकतो - जयंत पाटील

Maharashtra Government : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच राज्याचा एकत्रित दौरा करणार असल्याची चर्चा आहे

Jayant Patil On Maharashtra Government : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच राज्याचा एकत्रित दौरा करणार असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी टीकास्त्र सोडलेय. ते म्हणाले की, 'मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना एकत्रित दौरा का करावा वाटतोय? हे माहिती नाही. पण, त्यांच्या एकत्रित दौऱ्यामुळे राज्याचे व्यवस्थापन आणि प्रशासनावर परिणाम होऊ शकतो. ' ते अहमदनगरमध्ये बोलत होते. यावेळी जयंत पाटील यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली. 

मंत्रिमंडळ विस्तार करणं हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मात्र, सध्या इतरांना विचारल्याशिवाय मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळ विस्तार करता येत नाहीये. ही नवीनच परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे, असा टोला राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून लगावला आहे. सोबतच मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला स्थान मिळते की नाही? यावरून शिंदे गटातील काही आमदारांमध्ये  नाराजी असल्याच्या चर्चेबाबत बोलताना त्यांच्यात नाराजी आहे की नाही तो त्यांचा प्रश्न आहे, असं जयंत पाटील म्हणाले. 

नुकसान पाहणी दौऱ्यादरम्यान राधाकृष्ण विखेंनी शरद पवारांवर टीका केली होती, त्यावर जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं.  भू-विकास बँकेचे अस्तित्वच सध्या राहिलेलं नाही, आमच्या सरकारच्या काळातच तो निर्णय झाला होता. पण शरद पवारांच्या मुळेच भारतातील स्वतंत्र्यांनंतरची सर्वात मोठी कर्जमाफी झाली होती. याबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसमध्ये असताना कौतुक केलं होतं. पण सध्या ते भाजपमध्ये गेलेत त्यामुळे ते शरद पवारांवर टीका करत असतील, असं जयंत पाटील म्हणाले. 

महाराष्ट्रातील शेतकरी आज दिवाळी साजरी करू शकत नाही. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करणं ही मुख्यमंत्र्यांकडून लोकांची अपेक्षा होती. मुख्यमंत्र्यांनी ओला दुष्काळ जाहीर केला नाही. त्यामुळे सर्वांच्याच उत्सवावर विरजन पडलं आहे. तर दुसरीकडे आनंदाचा शिधा देखील काही ठिकाणी वाटला गेलाय काही ठिकाणी नाही. महाराष्ट्रातील युवकांचा रोजगार हा फॉग्सवॅगन गेल्यामुळे बुडाला असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आणि सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचला, त्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की,  महाराष्ट्रातील सरकारी नोकऱ्याना आम्हीच मान्यता दिल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये सरकारी नोकऱ्यांच्या पलीकडे ज्या खासगी नोकऱ्या निर्माण करण्याची खासगी गुंतवणूक आणून सरकारची जबाबदारी होती. त्यातला फॉग्सवॅगनसारखा मोठा प्रकल्प गेल्यामुळे महाराष्ट्राचं आणि बेरोजगार युवकांच प्रचंड मोठं नुकसान या सरकार ने केलं आहे. ते आता भरून निघेल असं मला वाटत नाही, असं ही जयंत पाटील म्हणाले.

मागच्या एक वर्षापासून एबीपी माझा सोबत कार्यरत...8 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत... व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारितेला सुरुवात
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया समोर 
कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया समोर 
नीट परीक्षेच्या दुसऱ्या निकालात मुलीला अवघे 200 गुण, वडिलांना ह्रदयविकाराचा झटका; लेकीचा सरकारला सवाल
नीट परीक्षेच्या दुसऱ्या निकालात मुलीला अवघे 200 गुण, वडिलांना ह्रदयविकाराचा झटका; लेकीचा सरकारला सवाल
जनता मालक तर  शिक्षणमंत्री हे सेवक, जनतेने राजीनामा मागितला तर तो दिला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर काय म्हणाले अण्णा हजारे?
जनता मालक तर  शिक्षणमंत्री हे सेवक, जनतेने राजीनामा मागितला तर तो दिला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर काय म्हणाले अण्णा हजारे?
Anna Hazare Protest Ahilyanagar:  मौन धरणे आंदोलनादरम्यान अण्णा हजारेंना रडू कोसळलं, विद्यार्थ्यांच्या हातातील पोस्टर पाहताच अश्रू अनावर
मौन धरणे आंदोलनादरम्यान अण्णा हजारेंना रडू कोसळलं, विद्यार्थ्यांच्या हातातील पोस्टर पाहताच अश्रू अनावर

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
Embed widget