एक्स्प्लोर

गाडीला कट मारल्याच्या वादातून संगमनेरमध्ये राडा, दोन गट भिडले; घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त

Sangamner News : पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून, परिसरात शांतता आहे. या प्रकरणी पोलिसांकडून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sangamner News : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) संगमनेर शहरात मंगळवारी दोन गटात हाणामारीची घटना समोर आली आहे. गाडीला कट लागल्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर काही तरुणांचा जमाव जमा झाला आणि त्यांनी दुचाकीस्वार तरुणाला बेदम मारहाण केली. मारहाण झालेल्या तरुणाच्या मदतीला धावून आलेल्या दोघांना देखील मारहाण झाली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून, परिसरात शांतता आहे. या प्रकरणी पोलिसांकडून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून जमावाने तिघांना मारहाण केल्याची घटना काल सायंकाळी घडली होती. या मारहाणीची चर्चा शहरात पसरताच संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने तरुण जमा झाले. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात हा जमाव वाढत असतानाच पोलिसांनी हस्तक्षेप करत या जमावाला पांगवलं. तर, दुसरीकडे मारहाण झालेल्या घटनास्थळी सुद्धा दुसऱ्या गटातील जमाव एकत्र आला होता. यामुळे रात्री संगमनेर शहरातील वातावरण तणावपूर्ण झालं होतं. या प्रकरणी रात्री उशिरा पोलिसांनी राहुल गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून आठ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यातील तीन जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती असून, इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. 

नेमकं काय घडलं? 

क्रमांक नसलेल्या पीक-अप जीपने कट मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडीतील एकाला जमावाने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी संध्याकाळी घडला. या तरुणाच्या मदतीला धावलेल्या तिघा-चौघांनाही जमावाने मारहाण केली. या घटनेत तिघे जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर कोल्हेवाडीसह संगमनेर शहरात तणाव निर्माण झाला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. मात्र पोलिसांनी जमावाला पांगवल असून परिस्थिती नियंत्रणात आहे. तसेच कुणीही अफवा पसरवू नयेत अन्यथा कारवाई केली जाईल असे देखील पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 

यापूर्वी देखील अशाच घटना...

काही महिन्यांपूर्वी याच परिसरात अशाच पद्धतीने जमावणं मारहाण केल्याची घटना घडली होती. तर, कोरोना काळात सुद्धा पोलिसांवर देखील याच परिसरात हल्ला झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला असून अधिक तपास पोलीस करत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या : 

Lok Sabha Election 2024 : रोहित पवारांनी लोकसभा लढण्यास नकार दिला, त्यामुळेच मविआ नेते निलेश लंकेचा बळी देतायत; सुनील शेळकेंचा खळबळजनक आरोप

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!

व्हिडीओ

Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Prithviraj Chavan on PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...
Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Devendra Fadnavis: आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Embed widget