एक्स्प्लोर

Travel : इतिहासप्रेमींनो.. महाराष्ट्रातील 'ही' ऐतिहासिक ठिकाणं पाहिलीत? समुद्र, हिरवळ आणि सुंदर दृश्य खुणावतायत..

Travel : जर तुम्ही महाराष्ट्रात भेट देण्यासाठी चांगली ठिकाणं शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला अशा काही ऐतिहासिक ठिकाणांबद्दल सांगत आहोत. जी पाहून तुम्हाला निवांत वाटेल..

Travel : महाराष्ट्राला (Maharashtra) अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांचा वारसा लाभलेला आहे, ही ठिकाणं महाराष्ट्र राज्याला बहुसंपन्न आणि महान बनवतात. महाराष्ट्रात फिरण्यासाठी तशी अनेक ठिकाणं आहेत. पण आज आम्ही खास इतिहासप्रेमींसाठी अशा काही ठिकाणांची माहिती देत आहोत. जी कदाचित तुम्हाला माहित असावी. या ठिकाणी असलेला अथांग समुद्र, हिरवळ आणि इतिहासातील आठवणींचा ठेवा पाहाल तर तुम्हाला या ठिकाणांची भूरळ नाही पडली तर नवलंच..! 


एकाच वेळी अनेक गोष्टी पाहायला मिळतील..! 

जर तुम्हाला महाराष्ट्राला भेट देण्यासाठी लांबच्या सहलीचा प्लॅन करायचा असेल तर अशा किल्ल्यांना भेट देण्याचा प्लॅन करा. जिथे तुम्हाला एकाच वेळी अनेक गोष्टी पाहायला मिळतील. येथे अशी अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत, जिथे तुम्हाला समुद्राचे दृश्य तसेच हिरवळ यांसारख्या गोष्टी एकत्र पाहायला मिळतील. महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळ मराठा शासकांशी निगडीत खोल रहस्ये प्रतिबिंबित करते. यामध्ये प्रसिद्ध अजिंठा आणि एलोरा लेणी, रायगड, पनवेल आणि लोणावळा या ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश आहे. हे किल्ले इतके आलिशान आणि सुंदर आहेत की त्यांचे सौंदर्य पाहण्यासाठी इतिहासप्रेमी लांबून येतात. जर तुम्ही महाराष्ट्रात फिरण्यासाठी एखादे चांगले ठिकाण शोधत असाल तर तुम्ही हे ऐतिहासिक किल्ले एकदा पाहायलाच हवेत. या किल्ल्यांवर जाण्यासाठी तुम्ही ट्रेकिंग आणि हायकिंगचाही आनंद घेऊ शकता.


Travel : इतिहासप्रेमींनो.. महाराष्ट्रातील 'ही' ऐतिहासिक ठिकाणं पाहिलीत? समुद्र, हिरवळ आणि सुंदर दृश्य खुणावतायत..

जयगड किल्ला, रत्नागिरी


जयगड किल्ल्याला विजय किल्ला असेही म्हणतात. महाराष्ट्रातील रत्नागिरीच्या किनारी प्रदेशात 13 एकर क्षेत्रात पसरलेला हा 17व्या शतकातील किल्ला आहे. महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यातील रत्नागिरीतील हे प्रेक्षणीय ठिकाण आहे. वालुकामय समुद्र किनारे, स्मारके, धार्मिक तीर्थस्थळे, धबधबे याशिवाय; रत्नागिरीतील किल्ले खरोखरच भव्य आणि सुंदर निर्मिती आहेत जी आजही अस्तित्वात आहेत. रत्नागिरीपासून 56 किलोमीटर अंतरावर असलेल्या जयगड गावातील जयगड किल्ला हा शास्त्री नदी आणि अरबी समुद्राचे जिथे मिलन होते. त्याठिकाणी उंच कड्यावर असलेला एक प्राचीन किल्ला आहे. या किल्ल्याला मजबूत बुरुजांनी वेढलेले आहे. तुम्ही किल्ल्याला भेट देत असाल तर जयगड दीपगृहाला भेट द्या. हा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक आहे. याशिवाय रत्नागिरी, महाराष्ट्रात तुम्हाला भेट देण्यासाठी चांगली ठिकाणे सापडतील.

किल्ला कोठे आहे - जयगड किल्ला गणपतीपुळेपासून 20 किलोमीटर अंतरावर जयगड गावाजवळ आहे.

जर तुम्हाला दोन दृश्यांचा एकत्र आनंद घ्यायचा असेल तर यापेक्षा चांगली जागा असू शकत नाही. चारही बाजूंनी अरबी समुद्राच्या पाण्याने वेढलेला हा किल्ला प्रत्येक निसर्गप्रेमींना भूरळ घालतो. हा किल्ला 300 वर्ष जुना आहे. याचा पुरावा त्याच्या भिंती देतात. हा किल्ला 16 व्या शतकात विजापूरच्या सुलतानांनी शास्त्री नदीच्या खाडीमार्गे संगमेश्वर ते रत्नागिरी दरम्यान सागरी व्यापार निसंत्रित करण्यासाठी बांधला होता. पुढे हा किला संगमेश्वराच्या नाईकांच्या ताब्यात गेला. नाईकांनी पोर्तुगीज आणि विजापूर सुलतान यांच्याशी युद्ध केले आणि यश मिळवले, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे, कान्होजी आंग्रे यांच्या अधिपत्याखाली आला. असे इतिहासप्रेमी सांगतात. अलिबाग समुद्रकिनाऱ्यापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी तुम्ही पायीच पोहोचू शकता. शांततेच्या शोधात येणाऱ्या पर्यटकांना येथे अतिशय शांततापूर्ण वातावरण पाहायला मिळते. याशिवाय येथे पाहण्यासाठी अनेक चांगली ठिकाणे आहेत.


Travel : इतिहासप्रेमींनो.. महाराष्ट्रातील 'ही' ऐतिहासिक ठिकाणं पाहिलीत? समुद्र, हिरवळ आणि सुंदर दृश्य खुणावतायत..

दौलताबाद किल्ला, औरंगाबाद

हा किल्ला औरंगाबादच्या मुख्य शहरापासून 15 किमी अंतरावर आहे. दौलताबाद किल्ला हा एक प्राचीन किल्ला आहे, तो हिरवाईने नटलेला आहे. इतक्या उंचीवर वसलेला हा किल्ला आहे, जिथून तुम्हाला संपूर्ण शहराचे विलोभनीय दृश्य दिसते. येथे जाण्यासाठी तुम्हाला सुमारे 750 पायऱ्या चढाव्या लागतील. दौलताबाद हा महाराष्ट्रातील औरंगाबादहून एलोरा लेण्यांच्या मार्गावर वसलेला एक प्राचीन डोंगरी किल्ला आहे. दौलताबाद किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट जतन केलेल्या किल्ल्यांपैकी एक आहे आणि औरंगाबादच्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे.

दौलताबादचा ऐतिहासिक त्रिकोणी किल्ला यादव राजा भिल्लमा पाचवा याने 1187 मध्ये बांधला होता. तेव्हा या शहराला 'देवगिरी' म्हणजे देवांचा टेकडी असे म्हणतात. दौलताबाद  हे नाव मुहम्मद-बिन-तुघलकने 1327 मध्ये येथे आपली राजधानी केली तेव्हा दिले होते. हा प्रदेश आणि किल्ला 1347 मध्ये हसन गंगूच्या नेतृत्वाखाली बहामनी शासकांच्या आणि 1499 मध्ये अहमदनगरच्या निजाम शाह्यांच्या ताब्यात गेला. इ.स. 1607 मध्ये दौलताबाद ही निजामशाही घराण्याची राजधानी बनली, मुघल, मराठे, पेशव्यांनी काबीज केला आणि पुन्हा ताब्यात घेतला. शेवटी 1724 मध्ये हैदराबादच्या निजामांच्या ताब्यात स्वातंत्र्य मिळेपर्यंत ठेवले.

 

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

हेही वाचा>>>

Travel : अनेकांच्या नजरेपासून दूर..! महाराष्ट्रात काश्मीरचा आनंद अनुभवायचाय? शांत, सुंदर गुप्त ठिकाणं जाणून घ्या

 

 

 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्यMaharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
Embed widget