एक्स्प्लोर

‘खास’ व्यक्तीसोबत वेळ घालवण्यासाठी मुंबईजवळ एखादा शांत समुद्रकिनारा शोधताय? मग हे वाचा

दर वीकेंडला प्रियजनांसोबत मुंबईतील त्याच त्याच बीचवर जाऊन बोअर झाला आहात? मग मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या वसईतील शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारे तुमच्यासाठी एक बेस्ट डेस्टिनेशन ठरु शकतात.

मुंबई : वीकेंड म्हटलं की मुंबईकरांची पावलं समुद्रकिनाऱ्यांवर वळतात. मुंबईत मरिन ड्राईव, गिरगाव चौपाटी, बॅण्ड स्टॅण्ड, जुहू चौपाटी, वर्सोवा बीच, अक्सा बीच, दाना पानी बीच असे अनेक प्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत. पण दर वीकेंडला आपल्या खास प्रियजनांसोबत याच बीचवर जाऊन बोअर झाला आहात? तर मग मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या वसई तालुक्यातील शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारे तुमच्यासाठी एक बेस्ट डेस्टिनेशन ठरु शकतात. तुम्ही पण जर वीकेंडला फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. जाणून घेऊन हे समुद्रकिनारे कोणते आणि तिथे कसं जायचं?

वसई तालुक्यातील निसर्गरम्य समुद्रकिनारे

1. अर्नाळा
वसई तालुक्यातील एक मोठं बंदर आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ अशी अर्नाळाची ओळख. अर्नाळा बीचवर जाण्यासाठी मुबलक प्रमाणात वाहतूक व्यवस्था असल्याने पर्यटकांची पावलं अर्नाळा बीचकडे वळतात. अर्नाळा बीचपासून जवळच समुद्रात अर्नाळा हा सागरी किल्ला आहे. अर्नाळा बंदरातून बोटीने अर्नाळा किल्ल्यात जाता येते.


‘खास’ व्यक्तीसोबत वेळ घालवण्यासाठी मुंबईजवळ एखादा शांत समुद्रकिनारा शोधताय? मग हे वाचा

कसे जाल?
विरार रेल्वे स्थानकात उतरावे. विरार पश्चिमेला एसटी किंवा वसई-विरार परिवहन सेवेच्या बसने अर्नाळा गावात उतरावे. अर्नाळा गावात जाण्यासाठी विरार रेल्वे स्थानकातून रिक्षा देखील उपलब्ध होतात.

2. नवापूर
अर्नाळापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला एक शांत बीच तो म्हणजे नवापूर. नवापूर हे एक निसर्गरम्य गाव असून बीचजवळच विविध फुलांची शेती केली जाते. खासकरून सायंकाळच्या वेळी या बीचवर अत्यंत रम्य वातावरण असते.


‘खास’ व्यक्तीसोबत वेळ घालवण्यासाठी मुंबईजवळ एखादा शांत समुद्रकिनारा शोधताय? मग हे वाचा

कसे जाल?
नवापुर बीचला जाण्यासाठी विरार रेल्वे स्थानकातून वसई–विरार परिवहन सेवेची नवापूर बस पकडावी. नवापूर गावात उतरल्यावर चालत साधारण अर्धा किलोमीटर अंतर पार केल्यावर नवापूर बीचला पोहोचाल.

3. राजोडी
वसई तालुक्यातील राजोडी समुद्रकिनारा हा देखील आता पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. कारण तुम्हाला वॉटर स्पोर्टस् ॲक्टिव्हीटी आवडत असतील तर तुमच्यासाठी हा बीच नक्कीच एक उत्तम डेस्टिनेशन ठरू शकतो. या बीचवर अनेक साहसी खेळांचा अनुभव घेता येतो.


‘खास’ व्यक्तीसोबत वेळ घालवण्यासाठी मुंबईजवळ एखादा शांत समुद्रकिनारा शोधताय? मग हे वाचा

कसे जाल?
राजोडी बीचला जाण्यासाठी नालासोपारा रेल्वे स्थानकातून वसई विरार परिवहन सेवेची बस पकडावी. 

4. कळंब
वसई तालुक्यातील शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य समुद्रकिनारा अशी कळंबची ओळख आहे. समुद्रकिनारा विस्तीर्ण आणि दूरपर्यंत उथळ असल्याने समुद्रात पोहण्याचा आनंद घेता येतो. सायंकाळी सूर्यास्ताचा देखावा अतिशय मन मोहून टाकतो.


‘खास’ व्यक्तीसोबत वेळ घालवण्यासाठी मुंबईजवळ एखादा शांत समुद्रकिनारा शोधताय? मग हे वाचा

कसे जाल?
कळंब बीच गाठण्यासाठी नालासोपारा रेल्वे स्थानकातून कळंब गावात जाणारी बस पकडावी. तिथून पुढे चालत जावे लागते. खासगी वाहन किंवा रिक्षाने थेट कळंब बीचपर्यंत जाता येतं.

5. भुईगाव
भुईगाव हा वसईतील शांत समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. या बीचवर दाट सुरूचे वन आहे. अनेकजण प्री वेडिंग शूटसाठी या बीचला पसंती देतात. समुद्रकिनाऱ्यावर असलेली सुरुच्या झाडांची हिरवळ मन मोहून टाकते.


‘खास’ व्यक्तीसोबत वेळ घालवण्यासाठी मुंबईजवळ एखादा शांत समुद्रकिनारा शोधताय? मग हे वाचा

कसे जाल?
भुईगाव बीचला जाण्यासाठी नालासोपारा रेल्वे स्थानकातून वसई-विरार परिवहन सेवेची भुईगाव बस पकडावी.

6. रानगाव
रानगाव हा ही एक शांत समुद्रकिनारा आहे. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी इथले वातावरण अत्यंत रम्य होऊन जाते.


‘खास’ व्यक्तीसोबत वेळ घालवण्यासाठी मुंबईजवळ एखादा शांत समुद्रकिनारा शोधताय? मग हे वाचा

कसे जाल?
रानगाव समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी वसई रेल्वे स्थानकातून रिक्षा पकडावी.

7. सुरुची बीच
नावाप्रमाणेच या बीचवर सुरुची झाडे आहेत. वसईच्या दक्षिणेला हा बीच आहे. खासकरून प्रेमी युगूलांसाठी हा समुद्रकिनारा विशेष आकर्षण आहे. 


‘खास’ व्यक्तीसोबत वेळ घालवण्यासाठी मुंबईजवळ एखादा शांत समुद्रकिनारा शोधताय? मग हे वाचा

कसे जाल?
सुरुची बीचला जाण्यासाठी वसई रेल्वे स्थानकातून भास्कर आळी बस पकडावी.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?

व्हिडीओ

Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Pradnya Satav Join BJP : राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश - प्रज्ञा सातव
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Embed widget