एक्स्प्लोर

‘खास’ व्यक्तीसोबत वेळ घालवण्यासाठी मुंबईजवळ एखादा शांत समुद्रकिनारा शोधताय? मग हे वाचा

दर वीकेंडला प्रियजनांसोबत मुंबईतील त्याच त्याच बीचवर जाऊन बोअर झाला आहात? मग मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या वसईतील शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारे तुमच्यासाठी एक बेस्ट डेस्टिनेशन ठरु शकतात.

मुंबई : वीकेंड म्हटलं की मुंबईकरांची पावलं समुद्रकिनाऱ्यांवर वळतात. मुंबईत मरिन ड्राईव, गिरगाव चौपाटी, बॅण्ड स्टॅण्ड, जुहू चौपाटी, वर्सोवा बीच, अक्सा बीच, दाना पानी बीच असे अनेक प्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत. पण दर वीकेंडला आपल्या खास प्रियजनांसोबत याच बीचवर जाऊन बोअर झाला आहात? तर मग मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या वसई तालुक्यातील शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारे तुमच्यासाठी एक बेस्ट डेस्टिनेशन ठरु शकतात. तुम्ही पण जर वीकेंडला फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. जाणून घेऊन हे समुद्रकिनारे कोणते आणि तिथे कसं जायचं?

वसई तालुक्यातील निसर्गरम्य समुद्रकिनारे

1. अर्नाळा
वसई तालुक्यातील एक मोठं बंदर आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ अशी अर्नाळाची ओळख. अर्नाळा बीचवर जाण्यासाठी मुबलक प्रमाणात वाहतूक व्यवस्था असल्याने पर्यटकांची पावलं अर्नाळा बीचकडे वळतात. अर्नाळा बीचपासून जवळच समुद्रात अर्नाळा हा सागरी किल्ला आहे. अर्नाळा बंदरातून बोटीने अर्नाळा किल्ल्यात जाता येते.


‘खास’ व्यक्तीसोबत वेळ घालवण्यासाठी मुंबईजवळ एखादा शांत समुद्रकिनारा शोधताय? मग हे वाचा

कसे जाल?
विरार रेल्वे स्थानकात उतरावे. विरार पश्चिमेला एसटी किंवा वसई-विरार परिवहन सेवेच्या बसने अर्नाळा गावात उतरावे. अर्नाळा गावात जाण्यासाठी विरार रेल्वे स्थानकातून रिक्षा देखील उपलब्ध होतात.

2. नवापूर
अर्नाळापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला एक शांत बीच तो म्हणजे नवापूर. नवापूर हे एक निसर्गरम्य गाव असून बीचजवळच विविध फुलांची शेती केली जाते. खासकरून सायंकाळच्या वेळी या बीचवर अत्यंत रम्य वातावरण असते.


‘खास’ व्यक्तीसोबत वेळ घालवण्यासाठी मुंबईजवळ एखादा शांत समुद्रकिनारा शोधताय? मग हे वाचा

कसे जाल?
नवापुर बीचला जाण्यासाठी विरार रेल्वे स्थानकातून वसई–विरार परिवहन सेवेची नवापूर बस पकडावी. नवापूर गावात उतरल्यावर चालत साधारण अर्धा किलोमीटर अंतर पार केल्यावर नवापूर बीचला पोहोचाल.

3. राजोडी
वसई तालुक्यातील राजोडी समुद्रकिनारा हा देखील आता पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. कारण तुम्हाला वॉटर स्पोर्टस् ॲक्टिव्हीटी आवडत असतील तर तुमच्यासाठी हा बीच नक्कीच एक उत्तम डेस्टिनेशन ठरू शकतो. या बीचवर अनेक साहसी खेळांचा अनुभव घेता येतो.


‘खास’ व्यक्तीसोबत वेळ घालवण्यासाठी मुंबईजवळ एखादा शांत समुद्रकिनारा शोधताय? मग हे वाचा

कसे जाल?
राजोडी बीचला जाण्यासाठी नालासोपारा रेल्वे स्थानकातून वसई विरार परिवहन सेवेची बस पकडावी. 

4. कळंब
वसई तालुक्यातील शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य समुद्रकिनारा अशी कळंबची ओळख आहे. समुद्रकिनारा विस्तीर्ण आणि दूरपर्यंत उथळ असल्याने समुद्रात पोहण्याचा आनंद घेता येतो. सायंकाळी सूर्यास्ताचा देखावा अतिशय मन मोहून टाकतो.


‘खास’ व्यक्तीसोबत वेळ घालवण्यासाठी मुंबईजवळ एखादा शांत समुद्रकिनारा शोधताय? मग हे वाचा

कसे जाल?
कळंब बीच गाठण्यासाठी नालासोपारा रेल्वे स्थानकातून कळंब गावात जाणारी बस पकडावी. तिथून पुढे चालत जावे लागते. खासगी वाहन किंवा रिक्षाने थेट कळंब बीचपर्यंत जाता येतं.

5. भुईगाव
भुईगाव हा वसईतील शांत समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. या बीचवर दाट सुरूचे वन आहे. अनेकजण प्री वेडिंग शूटसाठी या बीचला पसंती देतात. समुद्रकिनाऱ्यावर असलेली सुरुच्या झाडांची हिरवळ मन मोहून टाकते.


‘खास’ व्यक्तीसोबत वेळ घालवण्यासाठी मुंबईजवळ एखादा शांत समुद्रकिनारा शोधताय? मग हे वाचा

कसे जाल?
भुईगाव बीचला जाण्यासाठी नालासोपारा रेल्वे स्थानकातून वसई-विरार परिवहन सेवेची भुईगाव बस पकडावी.

6. रानगाव
रानगाव हा ही एक शांत समुद्रकिनारा आहे. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी इथले वातावरण अत्यंत रम्य होऊन जाते.


‘खास’ व्यक्तीसोबत वेळ घालवण्यासाठी मुंबईजवळ एखादा शांत समुद्रकिनारा शोधताय? मग हे वाचा

कसे जाल?
रानगाव समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी वसई रेल्वे स्थानकातून रिक्षा पकडावी.

7. सुरुची बीच
नावाप्रमाणेच या बीचवर सुरुची झाडे आहेत. वसईच्या दक्षिणेला हा बीच आहे. खासकरून प्रेमी युगूलांसाठी हा समुद्रकिनारा विशेष आकर्षण आहे. 


‘खास’ व्यक्तीसोबत वेळ घालवण्यासाठी मुंबईजवळ एखादा शांत समुद्रकिनारा शोधताय? मग हे वाचा

कसे जाल?
सुरुची बीचला जाण्यासाठी वसई रेल्वे स्थानकातून भास्कर आळी बस पकडावी.

महत्त्वाच्या बातम्या

Corona Virus Update: आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
Health: IVF प्रक्रियेत तीन वेळा अपयश आले? मग आता पुढे काय? मूल होणार की नाही? डॉक्टरांची महत्त्वाची माहिती...
IVF प्रक्रियेत तीन वेळा अपयश आले? मग आता पुढे काय? मूल होणार की नाही? डॉक्टरांची महत्त्वाची माहिती...
Health Tips : दप्तरांच्या ओझ्याने शाळकरी मुलांना मणक्याच्या समस्या; वाचा लक्षणं आणि तज्ज्ञांचा सल्ला
दप्तरांच्या ओझ्याने शाळकरी मुलांना मणक्याच्या समस्या; वाचा लक्षणं आणि तज्ज्ञांचा सल्ला
Health: पावसाळ्याच्या ऋतूत बाळाचे नियोजन करताय? मग, 'या' एका गोष्टीचं सेवन करायला विसरु नका! स्त्रीरोग तज्ज्ञ सांगतात...
पावसाळ्याच्या ऋतूत बाळाचे नियोजन करताय? मग, 'या' एका गोष्टीचं सेवन करायला विसरु नका! स्त्रीरोग तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
Rohit Sharma : लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा हिटमॅनला फुल सपोर्ट
लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूची मन की बात
परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या
परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या
Share Market : भारतीय शेअर बाजारात तुफान तेजी, सेन्सेक्स 965 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 81 हजार कोटींची कमाई
शेअर बाजारात तुफान तेजी, सेन्सेक्स 965 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 81 हजार कोटींची कमाई
बीड बायपासवर भीषण अपघात; दत्त संप्रदायाच्या कालिदास महाराजाचा मृत्यू, भावयजही ठार; भाविकांवर शोककळा
बीड बायपासवर भीषण अपघात; दत्त संप्रदायाच्या कालिदास महाराजाचा मृत्यू, भावयजही ठार; भाविकांवर शोककळा
Jayant Patil: जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
Embed widget