एक्स्प्लोर

Important days in 26th April : 26 एप्रिल दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

Important days in 26th April : एप्रिल महिन्यातील प्रत्येक दिनाचं महत्व नेमकं काय आहे हे जाणून घ्या.

Important days in 26th April : एप्रिल महिना सुरु आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. एप्रिल महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 26 एप्रिलचे दिनविशेष.

1920 : थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचे निधन.

श्रीनिवास रामानुजन अय्यंगार हे एक महान भारतीय गणितज्ञ होते. आधुनिक काळातील महान गणिती विचारवंतांमध्ये त्यांची गणना होते. त्यांना गणिताचे कोणतेही विशेष प्रशिक्षण मिळाले नाही, तरीही त्यांनी विश्लेषण आणि संख्या सिद्धांताच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले. आपल्या प्रतिभेने आणि समर्पणाने त्यांनी गणिताच्या क्षेत्रात केवळ अद्भुत शोध लावले नाहीत तर भारताला अतुलनीय वैभव मिळवून दिले.

1948 : अभिनेत्री मौसमी चटर्जी यांचा जन्म.

मौसमी चॅटर्जी या एक भारतीय अभिनेत्री आहेत. ज्या हिंदी तसेच बंगाली चित्रपटांमध्ये त्यांच्या कामासाठी विशेष ओळखल्या जातात. 1970 च्या दशकात हिंदी चित्रपटांमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी त्या एक होत्या. तिने 2019 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

1976 : साहित्यिक चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू यांचे निधन. 

चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू हे एक मराठी कवी, कथा-कादंबरीकार आणि नाटककार. ‘आरती प्रभु’ ह्या नावाने त्यांनी  कवितालेखन केले. 1978 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार – 'नक्षत्रांचे देणे' त्यांना प्रदान करण्यात आला. जोगवा (1959), दिवेलागण (1962), नक्षत्रांचे देणे (1975). कादंबऱ्या : रात्र काळी घागर काळी (1963), अजगर (1965), कोंडुरा (1966), त्रिशंकू (1968). नाटके : एक शून्य बाजीराव (1966), सगेसोयरे (1967), अवध्य (1972), कालाय तस्मै नमः (1972). कथासंग्रह : सनई (1964), गणुराया आणि चानी (1970), राखी पाखरू (1971) हे त्यांचे गाजलेले कवितासंग्रह. 

1986 : रशियातील चेर्नोबिल येथील अणुभट्टीत भीषण स्फोट होऊन किरणोत्सारी पदार्थ वातावरणात फेकले गेले.

चेर्नोबिल, युक्रेन मधल्या अणुभट्टीचा 26 एप्रिल 1986 रोजी अपघाती स्फोट झाला. हिरोशिमाच्या तुलनेत चेर्नोबिलमधे जीवितहानी खूप कमी असली, तरी या अपघातामुळे हिरोशिमाच्या चारशे पट अधिक किरणोत्सर्गी वायू आणि सुक्ष्मकण पृथ्वीच्या वातावरणात फेकले गेले. या अपघाताचा सर्वात जास्त फटका बेलारूस प्रांतातल्या लाखो नागरिकांना कर्करोग, अर्भकांची अपुरी मानसिक वाढ आणि जनुकांमधले उत्परिवर्तन या व्याधींच्या स्वरूपात बसला.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Health: पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
Navi Mumbai : घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार
घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार
Child Health: शाळा, प्रवासात टाईप - 1 मधुमेही मुलांची काळजी कशी घ्याल? किशोरवयीन मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा आजार, डॉक्टर सांगतात...
शाळा, प्रवासात टाईप - 1 मधुमेही मुलांची काळजी कशी घ्याल? किशोरवयीन मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा आजार, डॉक्टर सांगतात...
Ear Wax : कॉटन बडने कान साफ करता? ही सवय ठरू शकते धोकादायक, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
कॉटन बडने कान साफ करता? ही सवय ठरू शकते धोकादायक, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget