एक्स्प्लोर

Tea : चहाचे शौकीन आहात? दिवसातून किती कप चहा पिणे योग्य? काय सांगतो रिपोर्ट

Health News : जर तुम्ही दररोज पाच ते सहा कप पेक्षा जास्त चहा पीत असाल तर तुम्ही आजारांना आमंत्रित करत आहात.  चहाच्या अतिसेवनामुळे तुम्हाला अनेक आजार जडू शकतात.

Health News : जगाच्या कानाकोपऱ्यात चहा पसंत केला होतो. सकाळी पेपर वाचताना, अथवा टिव्ही पाहताना चहा पितात.. दुपारी चहा पितात अन् संध्याकाळीही चहा पितात.. टेन्शनमध्ये चहा पितात त्याशिवाय, घरात कुणी नातेवाईक आले तरी चहाच केला जातो... भारतामध्ये चहा हा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक चहाप्रेमी आहेत. पण दिवसभरात किती कप चहा पिणे योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही जण तर इतके चहाप्रेमी आहेत की, जितक्यावेळी चहा प्यायला बोलवलं तितक्यावेळी चहा पिण्यासाठी येणारेही आहेत.. पण जास्त चहा प्यायल्यास काय नुकसान होऊ शकतं? याबाबतचा रिपोर्ट समोर आला आहे. 

जर तुम्ही दररोज पाच ते सहा कप पेक्षा जास्त चहा पीत असाल तर... तुम्ही आजारांना आमंत्रित करत आहात. अति चहा पिल्यामुळे तुम्हाला अनेक आजार जडू शकतात. मग प्रश्न असा की, दिवसभरात किती चहा पिणं योग्य आहे. हेल्थलाइनच्या रिपोर्ट्सनुसार, चहामध्ये असलेल्या गुणधर्मामुळे त्याला वर्षानुवर्षे औषध म्हणून वापरले जाते. पण याचं अति प्रमाणात सेवन केल्यामुळे अनेक आजार होऊ शकतात.. जसे की डिहायड्रेशन, एसिडिटी, ब्लड प्रेशर, पोटाच्या समस्या, छातीत दुखणे, आतड्यांवर प्रभाव यासारखे अनेक आजार होऊ शकतात. अति चहा सेवनामुळे एखादा तंदुरुस्त व्यक्तीही आजारी पडू शकतो. 
 
ब्राऊन युनिवर्सिटीच्या रिपोर्ट्सनुसार, ग्रीन आणि ब्राऊन चहामध्ये प्रति कप  40 मिलीग्रॅम कॅफीन असते. त्यामुळे चहाचे अति सेवन केल्यामुळे तुम्हाला व्यसन लागू शकते. तसेच तुम्हाला एखाद्या कामावर लक्ष केंद्रीत करणं कठीण होऊ शकते.  त्याशिवाय, तुम्हाला अस्वस्थ वाटू शकेल आणि स्वभाव चिडचिडा होऊ शकतो. त्याशिवाय झोपेची वेळही बदलू शकते. कॅफीनच्या थोड्या वापराचे तुम्हाला अनेक फायदेही होऊ शकतात. पण याच्या अति वापरामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अनेकांना चहा प्यायल्याने फायदे आणि तोटे झाल्याचं दिसून येतं. पण जास्त चहा तुम्हाला नक्कीच नुकसानदायक आहे, हे रिपोर्टमधून समोर आले.  

किती कप चहा योग्य ?

दिवसातून किती कप चहा पिणे योग्य, ज्यामुळे आरोग्याला कोणताही धोका होणार नाही. हेल्थलाइनच्या रिपोर्ट्स, दिवसातून तुम्ही तीन ते चार कप (710–950 मिली)  चहा पिऊ शकता. एनल्स ऑफ इंटरनल मेडिसिनमध्ये पब्लिश झालेल्या एका अभ्यासानुसार, दिवसातून दोन कप चहा पिणाऱ्यांना मृत्यूचा धोका 9 ते 13 टक्के कमी आहे. तर POPSUGAR च्या रिपोर्ट्सनुसार,  UCLA आणि यूनिवर्सिटी ऑफ मॅरीलँड मेडिकल सेंटरमध्ये एका कँसर एपिडेमियोलॉजी रिसर्चर्स जूओ फेंग झांग यांनी एका दिवसात दोन तीन कप पिण्याचा सल्ला दिला. काही रिपोर्ट्सनुसार, अति सेवनामुळे अनेक आजार जडत असल्याचे सांगितलेय. त्यामुळे निरोगी आयुष्यासाठी दिवसात फक्त तीन ते चार कप चहा प्या. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!

व्हिडीओ

Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
Embed widget