एक्स्प्लोर

Health Tips : शरीरात अशक्तपणा जाणवतोय? काळजी करू नका; 'या' 10 पदार्थांचा आहारात समावेश करा

Health Tips : लोकांना आरोग्याबाबत जागरूक करण्यासाठी दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो.

Health Tips : लोकांना आरोग्याबाबत जागरूक करण्यासाठी दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. दैनंदिन जीवनशैलीत खाण्या-पिण्याच्या वेळा पाळल्या जात नाहीत. अशा वेळी अवेळी जेवण केल्याने शरीराला अनेक त्रास होतात. त्याचबरोबर आपले शरीर आणि मन दोन्ही निरोगी असणे गरजेचे आहे. यासाठी आपल्या आहारात काही पदार्थांचा समावेश असणे गरजेचे आहे.  हे पदार्थ नेमके कोणते ते जाणून घ्या. 

पालक - पालक हे पोषक तत्वांनी युक्त सुपरफूड आहे. आरोग्य तज्ञ पालक हे पृथ्वीवरील सर्वात आरोग्यदायी अन्न मानतात. पालक एनर्जीने भरलेला असतो आणि त्यात खूप कमी कॅलरीज असतात. पालक हे व्हिटॅमिन ए आणि के यांचा चांगला स्त्रोत मानला जातो. 

लसूण - लसणाचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत. लसणात बॅक्टेरियाशी लढण्याची क्षमता असते. शतकानुशतके रोगांपासून संरक्षण म्हणून त्याचा वापर केला जातो. शक्तिशाली दाहक-विरोधी लसूण कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब कमी करण्यासाठी देखील प्रभावी आहे. 

लिंबू - लिंबूने हेल्थ इंडस्ट्रीमध्ये सुपरफूड म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. या लिंबूवर्गीय फळामध्ये दाहक विरोधी गुण तर आहेतच. पण ते शरीरात कर्करोगाच्या पेशी विकसित होण्यापासून रोखू शकतात. यामध्ये व्हिटॅमिन सी संत्र्यांइतकेच असते. लिंबू आपल्या यकृत आणि आतड्यांसाठीदेखील खूप फायदेशीर आहे. 

बीट - बीट केवळ आपल्या मेंदूसाठी चांगले नाही तर ते रक्तदाबही नियंत्रित ठेवते. ते खाल्ल्याने व्यायामाची कार्यक्षमता वाढते. आणि स्मृतिभ्रंशाचा धोकाही कमी होतो. या भाज्यांमध्ये फॉलेट, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक असतात. 

डार्क चॉकलेट - चॉकलेटमध्ये उच्च अॅंटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. जे फ्री रॅडिकल्समुळे होणारे रोगदेखील प्रतिबंधित करतात. डार्क चॉकलेट कॅन्सरपासून बचाव करते. 

कडधान्ये - मसूरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रथिने असल्यामुळे ते सुपरफूड मानले जाते. यामध्ये असलेले पोषक तत्व आपल्या हृद्याच्या आरोग्यासाठी उत्तम आहेतच पण वजन कमी करण्यासाठी, ऊर्जा वाढविण्यासाठी आणि रक्तातील साखर कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. 

अक्रोड - कोणत्याही ड्रायफ्रूटपेक्षा अक्रोडमध्ये जास्त अॅंटीऑक्सिडंट्स असतात. असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. अक्रोड रक्तवाहिन्यांमधील जळजळ तसेच ऑक्सिडेशन कमी करते. दररोज किमान 8 अक्रोड खावे. 

सॅल्मन फिश - सॅल्मन फिश ओमेगा-3 फॅटी एॅसिडचा चांगला स्त्रोत आहे. ज्यामुळे नैराश्य तसेच हृदयविकार आणि कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो. यामध्ये उच्च प्रथिने, जीवनसत्व आणि खनिजे देखील चांगले असतात. 

एवोकॅडो - एवोकॅडोची गणना जगातील सर्वात शक्तिशाली वस्तूंमध्ये केली जाते. आरोग्यदायी फॅटी एॅसिड्स आणि फायबरने समृद्ध असलेले एवोकॅडो आपले डोळे, संधिवात आणि कर्करोगाचा धोका कमी करते. 

रास्पबेरी - रास्पबेरी खाल्ल्याने लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकाराचा धोका कमी होतो. रास्पबेरी खाल्ल्याने आपल्या शरीराला त्वरीत ऊर्जा मिळते. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Embed widget