एक्स्प्लोर

सरकारी नोकरीची मोठी संधी, रेल्वेत हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, अर्ज करण्यासाठी उरले काहीच दिवस

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) ने RRB भर्ती 2025 अंतर्गत 1036 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे.

RRB Recruitment 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) ने RRB भर्ती 2025 अंतर्गत 1036 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली असून आता उमेदवारांना 16 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. यापूर्वी ही तारीख 6 फेब्रुवारी 2025 ही नियोजित होती. अधिकृत सूचनेनुसार, उमेदवारांना 18 फेब्रुवारीपर्यंत फी भरण्याची मुभा असेल आणि ते 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत त्यांच्या अर्जात सुधारणा करू शकतात.

कोणत्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु?

पीजीटी (पदव्युत्तर शिक्षक)
TGT (प्रशिक्षित पदवीधर शिक्षक)
PRT (प्राथमिक शिक्षक)
संगीत शिक्षक
महिला कनिष्ठ शाळेतील शिक्षिका
महिला सहाय्यक शिक्षिका (प्राथमिक शाळा)
प्रयोगशाळा सहाय्यक
ग्रंथपाल
कनिष्ठ अनुवादक (हिंदी)

7 जानेवारीपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु

अर्जाची सुरुवात: 7 जानेवारी 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2025
फी भरण्याची शेवटची तारीख: 18 फेब्रुवारी 2025 
अर्ज बदलण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2025
परीक्षेची पद्धत: संगणक आधारित चाचणी (CBT)

आवश्यक शैक्षणिक पात्रता काय?

अधिसूचनेनुसार, पदव्युत्तर, पदवीधर आणि 12 वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. काही पदांसाठी विशेष डिप्लोमा किंवा पदवी आवश्यक असू शकते.

वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तर अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय 48 वर्षे निश्चित करण्यात आले आहे.

निवड प्रक्रिया कशी असणार?

लेखी परीक्षा
शारीरिक चाचणी
कागदपत्रांची तपासणी
वैद्यकीय चाचणी

दरम्यान, जे युवक सरकारी नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही मोठी संधी निर्माण झाली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे असं आवाहन करण्यात आलं आहे. 7 जानेवारापासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र, अनेक उमेदवारांना अर्ज भरता नाही आला, त्यामुळं रेल्वे विभागानं अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. त्यामुळं आता 16 फेब्रुवारीपर्यंत इच्छुक आण पात्र असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 6 फेब्रुवारी होती. मात्र, त्यामध्ये आता बदल करण्यात आला आहे. या निर्यामुळं इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, ही परीक्षा लेखी चार टप्प्यात होणार आहे. सुरुवातीला लेखी परीक्षा होणार आहे. त्यानंतर उमेदवारांची शाररिक चाचणी देखील होणार आहे. यामध्ये उमेदवार यशस्वी झाल्यानंतर कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर शेवटी वैद्यकीय चाचणी होणार आहे. 

महत्वाच्या बातम्या:

सरकारी नोकरीची मोठी संधी! BHEL मध्ये 400 पदांसाठी भरती प्रक्रिया, काय आहे पात्रता? कसा कराल अर्ज?

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget