एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
शिवसेनेचा विरोध असलेलं नागरिकत्व संशोधन विधेयक नेमकं काय आहे?
विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून आज विधेयक मंजुरीसाठी लोकसभेच्या सादर करण्यात आलं आहे. लोकसभेत भाजपला बहुमत असल्याने, तिथे हे विधेयक मंजूर करून घेण्यात सरकारला अडचण येणार नाही.
![शिवसेनेचा विरोध असलेलं नागरिकत्व संशोधन विधेयक नेमकं काय आहे? What is citizenship amendment bill in loksabha live updates शिवसेनेचा विरोध असलेलं नागरिकत्व संशोधन विधेयक नेमकं काय आहे?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/12/09124351/Amit-Shah.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : नागरिकत्व संशोधन विधेयक आज लोकसभेत सादर करण्यात आलं असून त्यावर आता चर्चा सुरु आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हे विधेयक लोकसभेत सादर केलं. शिवसेनेनेचा आधीपासूनच या विधेयकाला विरोध होता. संसदेत शिवसेना या विधेयकाविरोधात मतदान करणार आहे. या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून आज विधेयक मंजुरीसाठी लोकसभेच्या सादर करण्यात आलं आहे. लोकसभेत भाजपला बहुमत असल्याने, तिथे हे विधेयक मंजूर करून घेण्यात सरकारला अडचण येणार नाही. मात्र सरकारची खरी कसोटी राज्यसभेत लागणार आहे.
नागरिकत्व संशोधन विधेयक काय आहे?
- या विधेयकात बांग्लादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तानातील सहा अल्पसंख्य समुदायांना भारताचं नागरिकत्व देण्याचा हा प्रस्ताव आहे.
- सहा समुदायांमध्ये हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ईसाई आणि शीखांचाही समावेश आहे.
- आताच्या कायद्यानुसार भारताचं नागरिकत्व मिळण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला कमीत कमी 11 वर्ष भारतात वास्तव्य अनिवार्य आहे.
- आता शेजारी देशांमधून येणाऱ्या हिंदू अल्पसंख्य समुदायांसाठी ही अट 6 वर्ष करण्यात आली आहे.
- यासाठी नागरिकत्व अधिनियम 1955 मध्ये काही बदल केले जातील, ज्यामुळे शेजारी देशांमधील अल्पसंख्य हिंदूंना कायदेशीर मदत होईल.
- सध्याच्या कायद्यानुसार अवैध पद्धतीने भारतात येणाऱ्यांना नागरिकत्व मिळत नाही, त्यांना परत पाठवण्याची किंवा अटकेत ठेवण्याची तरतूद आहे.
नागरिकत्व संशोधन विधेयकावरुन विवाद का आहे?
- विरोधकांच्या मते हे विधेयक मुस्लिमविरोधी आहे आणि भारतीय संविधानाच्या कलम 14 चं उल्लंघन करणारं आहे.
- धर्मनिरपेक्ष देशामध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव केला जाणं अयोग्य आहे, असा दावा करत विधेयकाला विरोध आहे.
- आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशमध्येही विधेयकाचा विरोध.
- बांग्लादेशातून हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायातील लोक इथं येऊन स्थायिक झाले आहेत.
- हिंदू व्होट बँक बनवण्याच्या दृष्टीने भाजप नवं विधेयक आणत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे.
- एनआरसी लिस्टमधून जे बाहेर गेलेले हिंदू आहेत, त्यांना पुन्हा भारतात स्थायिक होण्यास मदत करण्यासाठीचं हे षडयंत्र असल्याचा आरोप आहे.
याआधी विधेयक कधी सदनात आलं होतं?
- 2016 मध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेशातून आलेल्या हिंदू, शीख, पारशी, जैन यांना अटी-शर्थींसह नागरिकत्व देण्यासाठी विधेयक आणलं होतं, ते लोकसभेत पारीत झालं होतं.
- मात्र राज्यसभेत हे विधेयक तसंच पडून होतं.
- त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आल्या. आणि एकाच सरकारच्या काळात दोन्ही सदनात विधेयक पारीत झालं नाही, त्यामुळे ते निष्प्रभ झालं.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
बॉलीवूड
पुणे
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)