एक्स्प्लोर

Yashoda - Goshta Shyamchya Aaichi: 'यशोदा गोष्ट श्यामच्या आईची' मालिकेचा शेवटचा एपिसोड येणार प्रेक्षकांच्या भेटीस; वीरेंद्र प्रधान पोस्ट शेअर करत म्हणाले, 'टीआरपी नाही हे कारण...'

वीरेंद्र प्रधान (Virendra Pradhan) यांनी नुकतीच 'यशोदा गोष्ट श्यामच्या आईची' (Yashoda - Goshta Shyamchya Aaichi) या मालिकेबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

Yashoda - Goshta Shyamchya Aaichi: छोट्या पडद्यावरील 'यशोदा गोष्ट श्यामच्या आईची' (Yashoda - Goshta Shyamchya Aaichi) ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.  या मालिकेचा शेवटचा एपिसोड 19 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रसिद्ध लेखक, क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि निर्माते  वीरेंद्र प्रधान (Virendra Pradhan) यांनी नुकतीच यशोदा या मालिकेबद्दल एक खास पोस्ट शेअर केली आहे. 

वीरेंद्र प्रधान यांची पोस्ट

वीरेंद्र प्रधान यांनी फेसबुक या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, "यशोदा गोष्ट श्यामच्या आईची, शेवटचा भाग 19 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजता, झी मराठी वर. टीआरपी नाही हे कारण नक्कीच आहे , मालिका वेळेआधी संपवण्यामागे.'

'उंच माझा झोका, स्वामिनी , यशोदा या गोष्टी मला पूर्ण करता आल्या नाहीत. टीआरपी नाही हेच कारण होते दरवेळी . लोकमान्य , सावित्री ज्योती आणि अशा अनेक मालिका या कारणास्तव लवकर संपल्या' अशी खंत देखील वीरेंद्र प्रधान यांनी या पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली.

त्यांनी पुढे पोस्टमध्ये लिहिलं,'टीआरपी मिळवण्यासाठी आम्हाला ही बर्याचदा अशा गोष्टी लिहाव्या लागतात , ज्या बऱ्याचदा आम्हाला लेखक म्हणून पटत नाहीत . वाहिन्या ही अशा गोष्टी आणण्यासाठी कायम प्रयत्नशील असतात . म्हणून मी , ही मालिका बंद होतेय हा कांगावा करणार नाही . आपल्या महाराष्ट्रात काय उत्तम साहित्य नाही ? आहे . दर्दी वाहिन्या नाहीत ? आहेत . आपले भारतीय शास्त्रीय संगीत , नाट्य संगीत , भावगीते , कविता , आपले पेहराव , ऋचा परवचा , संध्याकाळ ची शुभंकरोती , दिवाळी पहाट , किर्तन , लेझिम , टाळ मृदुंग , भूपाळी , काकड आरती , पदस्पर्श नमस्कार , खाडिलकर , गडकरी , पुल देशपांडे , बहिणाबाई , संत एकनाथ , साने गुरुजी , नामदेव ढसाळ, सुर्वे , शिरवाडकर ,लक्ष्मण गायकवाड ,विश्वास पाटील , शिवाजी सावंत , प्रकाश नारायण संत .. हजारो लाखो गोष्टी आहेत , ज्या आपल्या मुलांसमोर यायला हव्यात. महाराष्ट्रात आपल्याच या ठेवी दुर्मिळ आणि मलूल होत चालल्या आहेत . आणि काही वर्षात त्या नामशेष होणार , असा आपला प्रवास सुरु आहे . त्यातल्या त्यात आपापल्या कुवती नुसार , काही लोक हे टिकवण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहेत पण त्यांची शक्ती कमी पडतेय. हे कुणा एका दुग्ग्याच काम नाही . समाज ( टीआरपी ) सोबत लागतो . राज्यकर्ते इकडे फारसे लक्ष देणार नाहीत . त्यांची टेन्शन्स वेगळी आहेत . आणि का आपण कुणावर अवलंबून रहावं ? अगदी तो राजा असला तरी , का आपण एकाच व्यवस्थेच्या माथी हा वरवंटा फोडावा ? ही व्यवस्था कोण आणि का बनवतं ? आपण . अशा मालिका ही आपण बंद करतो आणि अशी सिस्टीम ( व्यवस्था ) ही आपण निवडून देतो . किती घरात अजून लोक साने गुरुजींची पुस्तके वाचतात , आपल्या मुलानं वाचायला देतात ? किती लोक आपले शास्त्रीय संगीत , नाट्य संगीत , भावगीते , बडबडगीते ऐकतात आणि आपल्या मुलांना ऐकवतात ?

'आम्हा लेखक दिग्दर्शकां ना ही चांगले काम करायचे आहे . वाहिन्याना ही उत्तम कंटेंट द्यायचा आहे . पण समोर प्रेक्षक नसेल तर काय करावे ? काही लोक म्हणतील , की आम्ही आहोत तसे दर्दी प्रेक्षक. पण ही संख्या पुरेशी नाही. ती असती तर वाहिन्या अशा मालिका बंद न करत्या. जे खपतं तेच विकतं. काळासोबत जावे असे म्हटले तर जगात अजून असे अनेक देश आहेत , ज्यांनी आपली संस्कृती सोडली नाही . अभिमानाने जगतायत . आणि उत्तम जगतायत. आपल्याकडे कलेची कदर नाही , ही खंत बोलून , किंचित वाईट वाटून , एकमेकाना वाईट साईट ठरवून , दोषारोप करून डफलीवर थाप मारून गाणारे शाहीर आजूबाजूला खुप दिसतील . परंतु आपण अशा ठिकाणी टाळ्या देण्या पेक्षा , आपल्याच घरातून संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्न केला , तर कदाचित उद्या छान चित्र तयार होईल . ही इतर कोणाची ही जबाबदारी नाही . लेखक , प्रेक्षक आणि व्यावसायिक म्हणून आपली जबाबदारी आहे . हे माझे व्यक्तिगत मत आहे . अजूनही चांगले आणि परिणामकारक विचार तुमचे असू शकतील . आपण व्यक्त व्हायला पाहीजे. साने गुरुजींची श्याम ची आई ही गोष्ट पूर्ण व्हावी ही माझी तीव्र ईच्छा आज ना उद्या पूर्ण होईल अशी आशा बाळगतो . या प्रवासात मला साथ करणारी झी मराठी , माझे संपूर्ण युनिट , आणि अत्यंत कमी पण दर्दी प्रेक्षक यांचा मी शतश: आभारी आहे.' असंही त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं. वीरेंद्र प्रधान यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
 
 
संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Bhootam Bhayam Sarojini Song: एका 'सरोजिनी'वर फिदा सात मित्र, अन्...; 'भूतम भयम्'चं भन्नाट गाणं रिलीज
एका 'सरोजिनी'वर फिदा सात मित्र, अन्...; 'भूतम भयम्'चं भन्नाट गाणं रिलीज
Angad Mhaskar Second Marriage: टेलिव्हिजनच्या पडद्यावरचा 'नौटंकी' खलनायक, दुसऱ्यांदा चढला लग्नाच्या बोहोल्यावर; गपचूप बांधली लग्नगाठ
टेलिव्हिजनच्या पडद्यावरचा 'नौटंकी' खलनायक, दुसऱ्यांदा चढला लग्नाच्या बोहोल्यावर; गपचूप बांधली लग्नगाठ
Kushal Badrike On Rahul Deshpande: भाऊ कदमांनी 'तो' प्रश्न विचारताच राहुल देशपाडेंना राग अनावर, अन्...; कुशल बद्रिकेनं सांगितला 'चला हवा येऊ द्या'चा 'तो' किस्सा
भाऊ कदमांनी 'तो' प्रश्न विचारताच राहुल देशपाडेंना राग अनावर, अन्...; कुशल बद्रिकेनं सांगितला 'चला हवा येऊ द्या'चा 'तो' किस्सा
Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad khandekar: 'खांड्या... हे खूपच झालं', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकर कुणावर संतापला? कमेंटवर रिप्लाय देत म्हणाला...
'खांड्या... हे खूपच झालं', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकर कुणावर संतापला? कमेंटवर रिप्लाय देत म्हणाला...

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget