एक्स्प्लोर

'कपिल शर्मा शो'मध्ये भारती राहणार की जाणार?

कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिम्बाचिया ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या रडारवर आल्यानंतर या दोघांच्या करिअरवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यामुळे कपिल शर्मा शोमुळे घराघरांत पोचलेली भारती कपिल शर्मा शोमधून बाहेर जाणार का असा सवाल उपस्थित होतं आहे.

मुंबई : सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर झालेला गुंता आता अधिक गहिरा होताना दिसू लागला आहे. आधी आत्महत्येवरून सुरू झालेला वाद बघता बघता अमली पदार्थ सेवन आणि बाळगणे यापर्यंत आला. एनसीबीने यात छापेमारी सुरू केली आणि सुपरस्टार्सची नावं यात आली. आता त्यापलिकडे कॉमेडीवीरांकडे ही संशयाची सुई जाताना दिसू लागली आहे. भारती सिंगचं नाव यात आल्यामुळे अनेक गोष्टींवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

भारती सिंह ही कपिल शर्मा शोमुळे प्रकाशात आली. उत्तम टायमिंग तर तिचं होतं. पण तिचं दिसणं तिने कॅश केलं. अत्यंत गरीबीतून वर आलेली भारती आता कोट्यधीश बनली. ती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया हे दोघेही मनोरंजन क्षेत्रात मोठे झाले. आता मात्र एनसीबीच्या रडारवर आल्यानंतर या दोघांच्या करिअरवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. यात सर्वात पहिला नंबर लागतो तो कपिल शर्मा शोचा. कारण कपिल शर्मा शोमुळे भारती घराघरांत पोचली. आता एनसीबीने भारतीला अटक केल्यानंतर कपिल शर्मा शोमध्ये भारती राहणार की जाणार यावर प्रश्नचिन्ह आहे.

Drugs Case | ड्रग्ज प्रकरणी कॉमेडियन भारती सिंह आणि नवरा हर्ष लिम्बाचिया यांना जामीन मंजूर

बऱ्याचदा सेलिब्रेटीवर कोणताही आरोप झाला की त्याला संबंधित प्रोजेक्टमधून काढून टाकलं जातं. कारण त्यामुळे तो शो डागाळला जातो. एक व्यक्तीमुळे कोणताही शो वादात सापडू नये म्हणून ही काळजी घेतली जाते. याला मी टूचं उदाहरण आहे. ज्या ज्या लोकांवर मी टूचे आरोप झाले. त्या लोकांना संबंधित प्रोजेक्टमधून काढून टाकण्यात आलं. आता त्याच नियमाने भारती कपिल शर्मा शोमधून बाहेर जाणार का असा सवाल इंडस्ट्रीला आहे. तसं असेल तर भारतीची जागा कोण घेणार यावरही लोकांचं लक्ष आहे. कपिल शर्मा शोमधून यापूर्वी कलाकार गेल्याचा मोठा फटका बसला आहे. अशावेळी भारतीचं शोमधून जाणं रिस्की ठरू शकतं त्याचाच दुसरा भाग म्हणजे, जर भारतीला शोमध्ये ठेवलं तर भारतीवर कपिल नेहमी करतो तशी कॉमेडी करणार का हाही प्रश्न आहे. तसं असेल तर भारतीच्या या वर्तणुकीची शिक्षा एकतर कपिल शर्मा शोला भोगावी लागू शकते किंवा भारती या शो मधून बाहेर पडून तिला त्याबद्दल मोठी किंमत मोजावी लागेल.

आता भारती आणि तिचा पती जामिनावर सुटले आहेत. त्यामुळे भारती नियम अटींसह पुन्हा चित्रिकरणात भाग घेऊ शकेल. पण तिच्याबाबत काय निर्णय घेतला जातो. हे लवकरच कळेल .

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
Jalgaon News : आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Nagpur Crime | एकालाही सोडणार नाही, उपमुख्यमंत्र्यांचं शांततेचं आवाहनDevendra Fadnavis on Nagpur | कायदा सुव्यवस्थेचं पालक करावं, मुख्यमंत्र्यांचं नागपूरकरांना आवाहनZero Hour Full EP : औरंगजेबाच्या कबरीचं काय करावं? का होतेय कबर काढून टाकण्याची मागणी? सखोल चर्चाNagpur Violance News : नागपुरात दोन गटात दगडफेक, पोलिसांनी केलं शांततेचं आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
Jalgaon News : आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश; जुना निर्णय रद्द
मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश; जुना निर्णय रद्द
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
Ahilyanagar Crime : माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
Embed widget