एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 4 : ‘वाजवा रे वाजवा’ कॅप्टन्सी कार्यात कोण मारणार बाजी? ‘बिग बॉस मराठी’च्या घरात धुमश्चक्री सुरु...

Bigg Boss Marathi 4: अपूर्वा आणि तेजस्विनीमध्ये ‘वाजवा रे वाजवा’ हे कार्य पार पडणार असून, कोण बनणार घराचा नवा कॅप्टन हे आज कळणार आहे.

Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस मराठी’ सीझन 4च्या (Bigg Boss Marathi 4) घरामध्ये काल बिग बॉसनी घरातील सदस्यांवर ‘वाजवा रे वाजवा’ कॅप्टन्सी कार्य सोपवले होते. अपूर्वा आणि तेजस्विनीमध्ये हे कार्य पार पडणार असून, कोण बनणार घराचा नवा कॅप्टन हे आज कळणार आहे. पण, दोन्ही ग्रुप मधील सदस्य भन्नाट स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग करताना दिसत आहेत. या कॅप्टनसी कार्यामध्ये कोण कोणाची वाजवणार? अपूर्वा नि तेजस्विनीमध्ये कोण कोणाला मागे टाकून बनेल घराची नवी कॅप्टन, हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

या दरम्यान अपूर्वा त्रिशूलला सांगताना दिसणार आहे की, ‘त्यांनी सगळं उचललं असेल आणि फेकलं असेल शक्तीच्या बळावर, पण युक्ती देखील लागते जी त्यांच्याकडे नाहीये’. यावर मेघाचे म्हणणे आहे की, ‘आपली कॉपी करायला गेले, तुम्हांला का नाही सुचतं आधी...’ त्यावर अपूर्वाचे म्हणते की, ‘असं केलं आणि गणले.. कारण प्लॅन माहितीच नाहीये’. तेजस्विनी टीमला सांगताना दिसणार आहे, ‘मेघा ताई ज्याप्रकारे भांडतात, काही बघतच नाही त्या...’

बिग बॉसचा खेळ मनोरंजक टप्प्यावर

टास्क दरम्यान अक्षय, समृद्धी आणि अपूर्वामध्ये चर्चा रंगली असून, अमृता धोंगडे आणि यशश्रीबद्दल चर्चा सुरु आहे. अपूर्वा अक्षय आणि समृद्धीला सांगताना दिसणार आहे की,’अमृता प्रचंड चिडली आहे, हे लक्षात ठेवा. यशश्री पण.... दोघीपण विमझिकल आहेत.’ या सगळ्या ड्रामानंतर आज टास्कमध्ये पुढे काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अजून घरात काय काय घडले, हे जाणून घेण्यासाठी ‘बिग बॉस मराठी 4’ पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

समृद्धी ठरली पहिली महिला कॅप्टन!

‘बिग बॉस मराठी 4’च्या दसरा स्पेशल एपिसोडपासून कॅप्टन निवडीच्या टास्कला सुरुवात झाली होती. या कॅप्टन्सीच्या रेसमध्ये समृद्धी जाधवने बाजी मारली असून, ती ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासातील पहिली महिला कॅप्टन झाली आहे. ‘बिग बॉस मराठी सीझन 4’चा खेळ दुसऱ्या आठवड्यात पोहोचला असून, सर्वच स्पर्धकांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या आठवड्यातील साप्ताहिक कार्य पार पाडताना स्पर्धक बरेच आक्रमक होताना पाहायला मिळाले.

यावेळी पहिल्या फेरीत खेळताना किरण माने आणि बिग बॉस मराठी सीझन 4ची पहिली कॅप्टन समृद्धी जाधव ही या खेळातून बाहेर पडली. यावेळी समृद्धी जाधव हिने मनाचा मोठेपणा दाखवून कॅप्टन असल्यामुळे खेळातून स्वतःच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. बिग बॉस यांच्या आदेशावरून दोघांनाही दुसऱ्या फेरीसाठी संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

यावेळी संचालक असलेल्या समृद्धी जाधव आणि किरण माने यांच्यात देखील वादावादी झाली. या वेळी समृद्धी जाधव हिने स्वतःचा मुद्दा ठामपणे किरण माने यांच्यासमोर मांडून एका निष्पक्ष संचालकाची भूमिका अत्यंत उत्तम रित्या पार पडली. समृद्धी जाधव हिने मुद्देसूदपणे आपली मते मांडून एक चांगली स्पर्धकच नाही, तर एक चांगली कॅप्टन असल्याचेही दाखवून दिले. आक्रमकते बरोबरच समृद्धी हिचे हळवे मनदेखील प्रेक्षकांना दिसून आले. साप्ताहिक कार्य सुरु होण्याआधी ज्या वेळी विकास हा बाकी स्पर्धकांकडून टार्गेट होताना दिसत होता, त्यावेळी समृद्धी हिने विकास यांना प्रोत्साहन देऊन एक चांगली सदस्य असल्याचे दाखवून दिले.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:

Vaishali Thakkar Case : वैशाली ठक्कर प्रकरणात एक्स-बॉयफ्रेंड राहुल नवलानी पोलिसांच्या ताब्यात, आरोपी पूजाचा शोध सुरु

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget