एक्स्प्लोर

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, आदित्य चोप्राने पोलीस चौकशीत सर्व आरोप फेटाळले

बाजीराव मस्तानीबद्दल संजय लीला भन्साळी किंवा त्यांची टीम दोघांनीही यशराजकडे कधीच संपर्क साधला नव्हता. सुशांतनेही मला हा चित्रपट मिळाला आहे आणि त्यामध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे कधीही सांगितले नाही, असं आदित्य चोप्राने सांगितलं.

मुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आज यशराज फिल्मचे मालक आदित्य चोप्रा यांची चार तास चौकशी केली. चौकशीत शेखर कपूर व सोशल मीडियावर सुशांतच्या मृत्यूच्या संदर्भात यशराजवर लावण्यात येत असलेले सर्व आरोप आदित्य चोप्राने फेटाळून लावले आहेत. सुशांत आणि यशराज यांच्यात कोणताही वाद किंवा मतभेद कधीच नव्हते. पाणी चित्रपट न बनवण्यामागील कारण म्हणजे माझं आणि शेखर कपूरमध्ये क्रिएटिव्ह डिफ्रन्स होते, असं आदित्य चोप्राने सांगितल.

आदित्य चोप्रा पुढे म्हणाला की, शेखर कपूर यांनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत. पानी चित्रपटाविषयी सुशांत डिप्रेशनमध्ये नव्हता. पानी हा चित्रपट बनवू शकला नाही आणि सुशांतबरोबरचा आमचा करार त्यानंतर कोणत्याही वादविवादाशिवाय आणि बर्‍याच चांगल्या नोटवर संपला. पाणी चित्रपट न बनवण्यामागील कारण म्हणजे शेखर कपूर आणि माझ्यातले सर्जनशील फरक आणि सुशांतला याची पूर्ण जाणीव होती. ‘पानी’ हा चित्रपट न केल्यामुळे सुशांत नैराश्यात गेला, असं शेखर कपूर यांचं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. चित्रपट न बनल्यामुळे सुशांत नैराश्येत गेला नाही. परंतु त्याने एका नवीन प्रोजेक्टवर काम करण्यास सुरुवात केली होती.

पानी चित्रपटासाठी सुशांतने अनेक चित्रपट सोडले, याविषयी कोणतीही माहिती कधीच समोर आली नाही. असे नाही की आम्हाला पानी चित्रपट करण्याची इच्छा नव्हती. आम्ही चित्रपटाचे काम सुरू केले आणि चित्रपटासाठी 6 ते 5 कोटी रुपये खर्चही केले. पण शेखर कपूरला आंतरराष्ट्रीय स्तरावर हा चित्रपट नेण्याची इच्छा होती आणि आम्हाला भारतात या चित्रपटाचा अधिक व्यवसाय करायचा होता. या चित्रपटासाठी सुमारे दीडशे कोटी खर्च येणार होतेा आणि सुरुवातीलाच शेखर कपूरशी मतभेद झाल्यानंतर आम्हाला इतकी मोठी जोखीम नव्हती घ्यायची. म्हणून हा चित्रपट बनू शकला नाही, असं आदित्य चोप्राने सांगितलं.

चित्रपट नाही बनला शकल्यामुळे सुशांत निराश झाला असेल. कोणताही कलाकार असेल तरी त्याला वाईट वाटेल. परंतु सुशांत एक हुशार अभिनेता होता. सुशांतला देखील या गोष्टी इंडस्ट्रीमध्ये घडतात हे माहित होते. म्हणूनच चित्रपट नाही झाल्यामुळे सुशांत नैराश्येत जात असल्याची माहिती पूर्णपणे निराधार आहे. आम्ही करार संपल्यानंतरही बर्‍याच वेळ संपर्कात होतो. जर आमच्यात वाद झाले असते तर तो नक्कीच कधीतरी बाहेर आला असता, असंही आदित्य चोप्राने सांगितलं.

रामलीला आणि बाजीराव मस्तानी या दोन चित्रपटांवरही चौकशी

आदित्य चोप्रा म्हणाले की, 2012 मध्ये संजय लीला भन्साळींनी रणवीर सिंहला या चित्रपटासाठी साईन केलं. तेव्हा सुशांतचा करार यशराजसोबत नव्हता. या चित्रपटात संजय लीला भन्साळी यांनी रणवीर सिंगच्या मार्च-एप्रिल 2012 मध्ये साईन केले होते. त्याच्या काही महिन्यांनंतर यशराजसोबत सुशांतचा करार झाला. तर यशराज यांच्याबरोबर झालेल्या करारामुळे सुशांत रामलीला हा चित्रपट करू शकला नाही हे म्हणणेही चुकीचे आहे.

बाजीराव मस्तानीबद्दल संजय लीला भन्साळी किंवा त्यांची टीम दोघांनीही यशराजकडे कधीच संपर्क साधला नव्हता. सुशांतनेही मला हा चित्रपट मिळाला आहे आणि त्यामध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे कधीही सांगितले नाही. आम्ही करार असूनही सुशांतला एमएस धोनी चित्रपट करणायस परवानगी दिली. जर आम्ही महेंद्रसिंग धोनीसारख्या मोठा चित्रपट सुशांतला करु देऊ शकतो तर मग सुशांतला रामलीला आणि बाजीराव मस्तानी करण्यापासून आम्ही का रोखू? असा सवाल आदित्या चोप्राने उपस्थित केला.

सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती यांच्याविषयीही पोलिसांनी आदित्य चोप्राकडून माहिती घेतली. आदित्य चोप्रा यांनी रियाच्या चित्रपटांबद्दल आणि या विषयावरील कॉन्ट्रॅक्टबद्दलही माहिती दिली. आदित्य चोप्राच्या सुशांतबरोबरच्या व्यवहाराचीही माहिती पोलिसांनी घेतली. आदित्यने सांगितले की यशराजने सुशांतला पहिला चित्रपट शुद्ध देसी रोमांससाठी 30 लाख रुपये तर दुसर्‍या चित्रपटाच्या व्योमकेश बक्षीसाठी 1 कोटी रुपये दिले होते.

संबंधित बातम्या

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण; रिया चक्रवर्तीची अमित शाहांकडे सीबीआय चौकशीची मागणी

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी सलमान खानची चौकशी होणार?

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येबाबत संजय लीला भन्साळी यांच्या चौकशीतून काय माहिती मिळाली?

Rhea Chakraborty | सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिची सीबीआय चौकशीची मागणी

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

NEET पेपरफुटीच्या गदारोळात ZEE5 ची नवी वेबसीरिज! 1 मिनीट 10 सेकंदाचा अंगावर काटा आणणारा टीझर
NEET पेपरफुटीच्या गदारोळात ZEE5 ची नवी वेबसीरिज! 1 मिनीट 10 सेकंदाचा अंगावर काटा आणणारा टीझर
Shabana Azmi Asthama Attack in CJP Protest: CJP आंदोलनादरम्यान शबाना आझमींची प्रकृती बिघडली; अश्रुधुरामुळे आला अस्थमा अटॅक, म्हणाल्या...
CJP आंदोलनादरम्यान शबाना आझमींची प्रकृती बिघडली; अश्रुधुरामुळे आला अस्थमा अटॅक, म्हणाल्या...
MI Jinkun Ghein Sara:'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्वीस्ट! शांभवीच्या कारस्थानांचा अखेर पर्दाफाश? छवीच्या हाती लागला मोठा पुरावा
'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्वीस्ट! शांभवीच्या कारस्थानांचा अखेर पर्दाफाश? छवीच्या हाती लागला मोठा पुरावा
Megha Dhade Oppose CJP: 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीचा CJP आंदोलनाला कडाडून विरोध; आक्रमक विरोधी पोस्टने लक्ष वेधलं, म्हणाली ..
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीचा CJP आंदोलनाला कडाडून विरोध; आक्रमक विरोधी पोस्टने लक्ष वेधलं, म्हणाली ..

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget