एक्स्प्लोर

Sharad Kelkar : जास्त सिनेमे बनवयाचे आणि थिएटर मिळत नाही म्हणून रडायचं, मराठी सिनेमावर शरद केळकरने मांडलं रोखठोक मत

Sharad Kelkar : शरद केळकरने नुकतच त्याच्या एका लेखामध्ये मराठी सिनेमांविषयी त्याचं रोखठोक मत मांडलं आहे.

Sharad Kelkar : मराठीत चांगले सिनेमे बनत नाही अशी प्रेक्षकांची आणि प्रेक्षक मराठी सिनेमाकडे वळत नाही, अशी कलाकारांची खंत अधिक तक्रार कायमच असते. याचविषयी अनेक कलाकार हे मुलाखतींच्या माध्यमातून त्यांची नाराजी व्यक्तही करत असतात. पण मराठी सिनेमात अशी परिस्थिती का आहे यावर अभिनेता शरद केळकरने (Sharad Kelkar)  नुकतच भाष्य केलं आहे. मराठी जास्त सिनेमे बनवायचे आणि नंतर थिएटर मिळत नाही म्हणून रडत बसयाचं असं थेट त्याने म्हटलंय.  

 'लयं भारी या सिनेमातून अभिनेता शरद केळकर हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यानंतर अनेक मराठी आणि हिंदी सिनेमातून शरद प्रेक्षकांच्या भेटीस आलाय.त्याच्या अनेक भूमिका या आजवर प्रेक्षकांना आवडल्या आहेत. नुकतच तो रानटी या सिनेमात झळकला होता. असं असतानाच शरदने नुकतच मराठी सिनेमाविषयीचं त्याचं रोखठोक मत मांडलं आहे. 

 'वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून...'

शरद केळकरने या लेखात म्हटलं की,  वर्षाला 10 ते 12 मराठी चित्रपट हिट झाल्यास लोक पैसे लावण्यासाठी पुढे येतील. त्यावेळी तुमच्याकडे स्वातंत्र्य असेल, तेव्हा तुम्ही हक्काने पैसे मागून घ्या. संगीतकार अजय-अतुल मराठी असूनही आपल्या निर्मात्यांना परवडत नाहीत. कारण त्यांनी स्वत:ला सिद्ध केलंय. ते गुणवत्तेचे पैसे आकारत असतील, तर चुकीचे आहे. दोन ते तीन मोठे निर्माते एकत्र आल्यास तेही परवडू शकतात. वर्षात दर आठवड्याला दोन चित्रपट आले तर 104 सिनेमे होतात. यापेक्षा जास्त सिनेम बनवून काय करणार? कारण, सिनेमागृहे मिळवण्यासाठी हिंदी-दाक्षिणात्य चित्रपट हॉलिवूडपटांशीही आपली स्पर्धा आहे. सिनेमे वाढले तरी सिनेमागृहे तितकीच आहेत. जास्त सिनेमे बनवायचे आणि थिएटर मिळत नाही म्हणून रडायचे, याला काय अर्थ आहे. वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येऊन इंडस्ट्री मोठी करण्याचा प्रयत्न करायला हवा. 

'तर मराठी सिनेमा हॉलीवूडपटांशी स्पर्धा करु शकेल'

शरदने म्हटलं की, सर्वांनी मिळून कमिशन बेसिसवर सिनेमे बनवायला हवेत. यामुळे सिनेमांची गुणवत्ता सुधारेल. जेणेकरुन हिंदी तसेच इतर कोणत्याशी भाषेतील सिनेमांशी आणि हॉलीवूडपटांशी मराठी सिनेमा स्पर्धा करु शकेल. आपल्याजवळ अप्रतिम पटकथाकार, कलाकार, तंत्रज्ञ आहेत; पण द्रष्टेपणा नाही. प्रेक्षकांजवळ तुमच्यापेक्षा जास्त चांगले पर्याय आहे. सिनेमा हा नाटकासारखा नसावा. कल्पनेच्या पलीकडच्या विश्वात प्रेक्षकांना घेऊन जावं. यासाठी बजेट हा एक मोठा घटक मराठीत आडवा येतो. दोन-तीन मोठे निर्माते एकत्र आल्यास बिग बजेट सिनेमे बनू शकतात. त्यामुळे जोखीमही कमी होईल. 

'दोन वर्षांत तीनच चित्रपट हिट होत असतील...'

90 टक्के सिनेमे हे ओव्हर बजेट झाल्याने प्रोमोशन मार्केटिंगवर खर्च केला जात नाही. ही सर्वात मोठी चूक आहे. आजच्या काळात मार्केटिंग आणि प्रमोशन गरजेचं आहे. पुष्पा सारख्या सिनेमाची लोक वाट बघत असताना त्याचे जोरदार प्रोमोशनही करण्यात  आले. लोकांपर्यंत सिनेमा पोहचवलाच नाही तर ते सिनेमागृहांत येणार कसे. आज ट्रान्झिट करण्याची वेळ आली आहे. आजपर्यंत जे करत आलो, तेच पुढे करता कामा नये. मराठी इंडस्ट्रीचे जगभर खूप नाव आहे, पण व्यावसायिकदृष्ट्या वाढ होत नाही. वर्षाला येणाऱ्या 100 हून अधिक सिनेमांपैकी वेड, बाईपण भारी देवा आणि नवरा माझा नवासाचा असे दोन वर्षांत तीनच चित्रपट हिट होत असतील तर कसे होणार? असाही प्रश्न शरदने या लेखात उपस्थित केला आहे. 

ही बातमी वाचा : 

Marathi Play : 'गंधर्व'काळाची पर्वणी, पॅरिसहून मागवलेल्या अत्तराचा दरवळ अन् पुरणपोळीचा बेत; पुण्यात पार पडला ‘संगीत स्वयंवर’चा वैभवशाली प्रयोग

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Riteish Deshmukh on Raja Shivaji: रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
Popular Director on Ranveer Singh: 'रणवीर सिंह पुन्हा एक फ्लॉप देईल ' प्रसिद्ध दिग्दर्शकाचं वक्तव्य चर्चेत; अडचणीच्या काळात सगळं बोलून गेले..
'रणवीर सिंह पुन्हा एक फ्लॉप देईल ' प्रसिद्ध दिग्दर्शकाचं वक्तव्य चर्चेत; अडचणीच्या काळात सगळं बोलून गेले..
Bharat Bhagya Vidhata Kangana Ranaut Look OUT: डोळ्यात आग,चेहऱ्यावर जखमा; 'भारत भाग्य विधाता'मधील कंगना रनौतचा पहिला लुक समोर; पाहताच खिळल्या नजरा
डोळ्यात आग,चेहऱ्यावर जखमा; 'भारत भाग्य विधाता'मधील कंगना रनौतचा पहिला लुक समोर; पाहताच खिळल्या नजरा
Deool Band 2: मोहन जोशी यांची 'देऊळ बंद'साठी कशी निवड झाली? प्रवीण तरडेंनी सांगितला खास किस्सा, म्हणाले...
मोहन जोशी यांची 'देऊळ बंद'साठी कशी निवड झाली? प्रवीण तरडेंनी सांगितला खास किस्सा, म्हणाले...

व्हिडीओ

Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड
Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज फलंदाजी अन् दिग्गजांची कौतुकाची 'बोलं'दाजी, सचिन, सेहवागसह ख्रिस गेलकडून स्तुतीसुमने
वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज फलंदाजी अन् दिग्गजांची कौतुकाची 'बोलं'दाजी, सचिन, सेहवागसह ख्रिस गेलकडून स्तुतीसुमने
लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Iran War Live Update: अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
Riteish Deshmukh on Raja Shivaji: रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
Bashir Badr: उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
Chhatrapati Sambhajinagar : अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
Embed widget