एक्स्प्लोर

Satluj Controversy: 48 तासांत सिनेमा हटवला; IMDb कडूनही 'सतलज'ला धक्का? आधी 9.5 रेटिंग, आता तीही गायब; मनोरंजनसृष्टीत खळबळ

बुधवारी ही रेटिंग अचानक हटवण्यात आली. त्यामुळे IMDb च्या प्रणालीच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

Satluj Controversy: अभिनेता दिलजीत दोसांझच्या (Diljit Dosanjh) 'सतलज' या चित्रपटाभोवतीचा वाद (Satluj Controversy) काही थांबण्याचं नाव घेत नाही. ZEE5 वरून चित्रपट हटवल्यानंतर आता IMDb वरील रेटिंगही अचानक गायब झाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. मंगळवारपर्यंत या चित्रपटाला IMDb वर 9.5 रेटिंग दिसत होती. इतकंच नाही, तर सर्वाधिक रेटिंग मिळालेल्या भारतीय चित्रपटांमध्ये त्याची गणना केली जात होती. मात्र बुधवारी ही रेटिंग अचानक हटवण्यात आली. त्यामुळे IMDb च्या प्रणालीच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

संजय गुप्तांची संतप्त प्रतिक्रिया

या प्रकरणावर दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर नाराजी व्यक्त केली. त्यांनी पोस्ट करत म्हटलं, "कालपर्यंत चित्रपटाला 9.5 रेटिंग होती आणि आज ती गायब झाली. खरं तर मी कधीच IMDb च्या रेटिंगवर विश्वास ठेवला नाही. पण या घटनेतून त्यांच्या सिस्टमवर किती विश्वास ठेवायचा, हा प्रश्न निर्माण होतो."

'चित्रपट कधी रिलीज झाला, कधी हटवला गेला हेही कळलं नाही'

'सतलज'चे सहलेखक नीरेन भट्ट यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितलं की, IMDb वरून रेटिंग का हटवण्यात आली याची कोणतीही माहिती त्यांना देण्यात आलेली नाही. ते म्हणाले, "आम्हाला चित्रपट कधी रिलीज झाला आणि कधी हटवला गेला हेही नीट समजलं नाही. आता IMDb वरून रेटिंगही गायब झाली, पण त्यामागचं कारण कुणीच सांगितलेलं नाही. नेमकी अडचण काय आहे, कुणाला आहे आणि का आहे, यावर कोणतीही स्पष्टता नाही."

सोशल मीडियावरही संताप

IMDb वरून रेटिंग हटवल्यानंतर सोशल मीडियावरही अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिलं, "मी जवळपास 1500 पेक्षा जास्त रिव्ह्यू वाचले आहेत. कितीही विरोध झाला किंवा चित्रपट हटवला गेला तरी सत्य हे सत्यच राहणार." काही युजर्सनी चित्रपटाच्या 9.6 रेटिंगचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत.

'अडचण असेल तर स्पष्टपणे सांगा'

'व्हरायटी इंडिया'शी बोलताना नीरेन भट्ट यांनी संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचं म्हटलं. अनेक वर्षांपासून चित्रपटावर नेमका आक्षेप काय आहे, हे कुणीच स्पष्ट केलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या मते, "जर चित्रपटात काही समस्या असेल, तर ती स्पष्टपणे सांगितली पाहिजे. कोणतंही कारण न देता चित्रपट हटवणं योग्य नाही."

'आमच्याच चित्रपटाला का केलं लक्ष्य?'

काहींचं म्हणणं आहे की, हा चित्रपट भारतविरोधी शक्तींकडून चुकीच्या पद्धतीने वापरला जाऊ शकतो. यावर नीरेन भट्ट म्हणाले, "हा युक्तिवाद पूर्णपणे चुकीचा आहे. 'द काश्मीर फाइल्स' किंवा 'द केरळ स्टोरी'सारखे चित्रपट बनू शकतात, तर आमच्याच चित्रपटाला अशा प्रकारे लक्ष्य का केलं जात आहे? एका साध्या चरित्रपटाबाबत अशा निष्कर्षांवर पोहोचण्याला काहीच अर्थ नाही."

आता न्यायालयात जाणार चित्रपटाची टीम

नीरेन भट्ट यांनी स्पष्ट केलं की, आता चित्रपटाची टीम न्यायालयात जाणार आहे. ते म्हणाले, "जर चित्रपटाबाबत कुणाला आक्षेप असेल, तर तो कायदेशीर मार्गाने मांडावा. आम्हालाही आमची बाजू मांडण्याची संधी मिळाली पाहिजे. 'उडता पंजाब'च्या वेळीही सीबीएफसीने 94 कट्सची मागणी केली होती. निर्माते न्यायालयात गेले आणि अखेर चित्रपट फक्त एका कटसह प्रदर्शित झाला. आम्हालाही न्याय मिळेल आणि 'सतलज' पुन्हा OTT वर स्ट्रीम होईल, अशी अपेक्षा आहे."

चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रदर्शित, दोन दिवसांतच हटवला

जवळपास चार वर्षे सेन्सॉर प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेनंतर 'सतलज' हा चित्रपट 3 जुलै रोजी ZEE5 वर प्रदर्शित झाला होता. मात्र अवघ्या दोन दिवसांतच तो प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आला. वृत्तांनुसार, सुरक्षेची कारणं आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नियम, 2021 यांचा हवाला देत सरकारने चित्रपट हटवण्याचे निर्देश दिले होते.

आधी नाव होतं 'पंजाब 95'

या चित्रपटाचं मूळ नाव 'पंजाब 95' होतं. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटात तब्बल 127 कट्स सुचवले होते. मात्र निर्मात्यांनी ते मान्य करण्यास नकार दिल्याने प्रमाणपत्राची प्रक्रिया रखडली. त्यानंतर चित्रपटाचं नाव बदलून 'सतलज' ठेवण्यात आलं आणि तो थेट OTT वर प्रदर्शित करण्यात आला. मात्र नंतर सरकारकडून सुरक्षा कारणांचा हवाला देत ZEE5 ला चित्रपट हटवण्याचे निर्देश देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

'सतलज'ची कथा काय आहे?

'सतलज' हा चित्रपट, ज्याचं आधीचं नाव 'पंजाब 95' होतं, हा मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंह खालरा यांच्या आयुष्यावर आधारित आहे. बँकेत नोकरी करणारे खालरा पुढे पंजाबमधील महत्त्वाचे मानवाधिकार कार्यकर्ते बनले. त्यांनी पंजाबमधील कथित बनावट चकमकी आणि बेपत्ता झालेल्या नागरिकांच्या प्रकरणांचा शोध लावला होता. चित्रपटात त्यांच्या 1995 मधील अपहरणापूर्वीच्या घटनांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या प्रकरणात नंतर पंजाब पोलिसांच्या चार कर्मचाऱ्यांना दोषी ठरवण्यात आलं होतं.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
Kala Hiran The Battle for Legacy: हरणाला गोळी... सलमान खानमुळे वादाच्या कचाट्यात सापडलेला 'काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी'चा टीझर रिलीज
हरणाला गोळी... सलमान खानमुळे वादाच्या कचाट्यात सापडलेला 'काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी'चा टीझर रिलीज
Kiran Rao Supports Sonam Wangchuk: आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं
आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं
Adinath Kothare And Urmila Kanetkar Net Worth: आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने 15 वर्षांचं नातं संपवलं, नक्की कारण काय? जाणून घ्या दोघांकडे संपत्ती किती?
आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने 15 वर्षांचं नातं संपवलं, नक्की कारण काय? जाणून घ्या दोघांकडे संपत्ती किती?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget