Samay Raina: 'अभी ज़िंदा हूँ '; पोलिसांपासून राजकीय नेत्यांपर्यंत, काय काय घडलं सगळंच सांगितलं, समय रैनाच्या नव्या व्हिडीओने पुन्हा धुमाकूळ
Samay Raina Reveals Comeback After Youtube Controversy: 'इंडियाज गॉट लेटंट' या शोमुळे वादात सापडलेल्या समय रैनाने 14 महिन्यांनंतर पुन्हा कमबॅक केला आहे.

Samay Raina Still Alive Full Video Controversy Explanation: गेल्या वर्षी कॉमेडियन समय रैना 'इंडियाज गॉट लेटंट' (Indias Got Latent) या शोमुळे प्रचंड चर्चेत आला होता. या शोमध्ये स्पर्धक येतात आणि आपली कॉमेडी (Comedian) सादर करतात. समय रैनासोबत (Samay Raina) उपस्थित असलेलं पॅनल देखील स्पर्धक आणि उपस्थितांना रोस्ट करतात. परंतु, या शोमध्ये आक्षेपार्ह शब्दांचा जास्त वापर होतो. एका एपिसोडमध्ये यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने (Ranveer Allahbadia) एका स्पर्धकाला आक्षेपार्ह प्रश्न विचारला होता. यामुळे प्रचंड वाद निर्माण झाला. समय रैनासह त्याच्या शोवरही प्रचंड टीका करण्यात आली. यामुळे समय रैनाचा शो 'इंडियाज गॉट लेटंट' बंद पडलं. यूट्यूबर्स आणि कॉमेडियन्सना कोर्टाच्या चकरा माराव्या लागल्या. या प्रकरणामुळे प्रचंड गदारोळ झाला. यूट्यूबर रणवीर अलाहाबादियानेही माफी मागितली. या वादानंतर चौदा महिन्यांनंतर समय रैना यूट्यूबवर परतला आहे. त्यानं यूट्यूब व्हिडीओतून जबरदस्त कमबॅक केला आहे. या व्हिडीओत त्यानं 14 महिन्यांत नेमकं काय काय घडलं? याबद्दल सांगितलं. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय.
'समय रैना - स्टील अलाइव्ह' (Samay Raina New Show Still Alive)
समय रैनाने 'समय रैना - स्टील अलाइव्ह' या शोद्वारे पुनरागमन केलं आहे. त्यानं 1 तास 21 मिनिटांच्या कमबॅक व्हिडीओमध्ये आपल्या शोभोवतीच्या वादावर मौन सोडले आहे. IGL या शोमध्ये विचारण्यात आलेल्या आक्षेपार्ह प्रश्नावर समय रैना म्हणतो, 'रणवीर अलाहाबादियाने संपूर्ण शोमध्ये तो वादग्रस्त प्रश्न किमान आठ वेळा विचारला होता. बरंच काही बोलला होता, एडिटमध्ये त्या गोष्टी काढून टाकल्या. मात्र, फायनल एडिटमध्ये तेवढा एकच प्रश्न समाविष्ट केला होता', असं समय म्हणाला. मुंबई पोलिसांनी 'इंडियाज गॉट लेटंट' शोमधील एपिसोड्स पाहून अॅक्शन घेतली. मुंबई पोलिसांनी नेमकी कोणती कारवाई केली? याबाबतही त्यानं आपल्या व्हिडीओत सांगितलं.
14 महिन्यांनंतर समय रैनाचा धमाकेदार कमबॅक (Samay Raina Comeback Through New Show)
कमबॅक व्हिडीओमध्ये, समय रैनाने या वादातून वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या परिणामांबद्दलही सांगितलं. 'वादामुळे मला एक वर्ष कॉमेडीपासून दूर राहावं लागलं. या संपूर्ण वादाचा कामावर थेट परिणाम झाला', असं समयनं सांगितलं. यासह रणवीरच्या एका चुकीच्या प्रश्नामुळे, शोमधील संबंधित प्रत्येक व्यक्तीचे कसे नुकसान झाले, याबाबतही त्यानं सांगितलं. सुनील पाल, मुकेश खन्ना यांसारखे दिग्गज लोक आणि राजकीय नेते त्याच्या शोवर कसे तुटून पडले होते, याबद्दलही खुलासा समयने आपल्या व्हिडीओत केला. दिग्गज लोकांनी या शोवर टीका केली होती, असंही त्यानं सांगितलं.
सुनील पालच्या टीकेला उत्तर देताना समय म्हणाला, 'सुनील पालने कपिल शर्माकडून कॉमेडी शिकण्याचा सल्ला दिला होता. पण, कपिल शर्माने स्वत: मेसेज करुन या शोचं कौतुक केलं होतं', असा खुलासा समय रैनाने केला. कपिल शर्माला 'इंडियाज गॉट लेटंट' हा शो प्रचंड आवडला होता, असं समय म्हणाला.
'इंडियाज गॉट लेटंट' मधील प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं होतं (Indias Got Latent Controversy Case)
फेब्रुवारी 2025 मध्ये , 'इंडियाज गॉट लेटंट' हा यूट्यूब शो एका मोठ्या वादात सापडला होता. एका एपिसोडमधील आक्षेपार्ह वक्तव्यावरुन, या शोवर अनेक राज्यांमधून तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या . हे प्रकरण इतकं वाढलं की, राष्ट्रीय महिला आयोगाने समन्स पाठवले, तसेच महाराष्ट्र सायबर सेलने चौकशीला सुरुवात केली. हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोगर; वाढदिवसाच्या दिवशीच वडिलांनी घेतला अखेरचा श्वास






















