एक्स्प्लोर

Salman Khan On CJP Students Protest: 'आंदोलनाला हिंसक वळण लागणं...', सलमान खाननं विद्यार्थी आंदोलनावर मौन सोडलंच; सरकारवर दाखवला विश्वास, नेमकं काय म्हणाला?

Salman Khan On CJP Students Protest: दिल्लीच्या रस्त्यांवर हिंसक संघर्ष होऊन एक दिवस उलटल्यानंतर, अनेक अभिनेते आणि गायकांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली असून सरकारलाही चर्चा करण्याचं, संवाद साधण्याचं आवाहन केलंय.

Salman Khan On CJP Students Protest: राजधानी दिल्लीत (Delhi) सुरू झालेली विद्यार्थ्यांची आंदोलनं (Student Protest) आता देशाच्या विविध भागांत पसरली आहेत. केवळ दिल्लीतच नव्हे, तर अनेक शहरांमधील विद्यार्थी निदर्शनं करत आहेत आणि रॅलींचे आयोजन करत आहेत. अनेक सेलिब्रिटी आणि सिनेसृष्टीतील व्यक्ती 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (Cockroach Janata Party) आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि निदर्शकांवरील पोलीस कारवाईच्या विरोधात आवाज उठवत आहेत. दिल्लीच्या रस्त्यांवर हिंसक संघर्ष होऊन एक दिवस उलटल्यानंतर, अनेक अभिनेते आणि गायकांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली असून सरकारलाही चर्चा करण्याचं, संवाद साधण्याचं आवाहन केलंय.

दरम्यान, सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांसारख्या बड्या बॉलिवूड (Bollywood News) स्टार्सच्या मौनाबाबत बरीच चर्चा रंगली होती. अगदी कपूर कुटुंबीयांनीही (Kapoor Family) यावर पूर्णपणे मौन बाळगलंय. मात्र, अखेरीस बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खान यानं एक निवेदन जारी केलंय. सलमान खाननं एक ट्वीट (Salman Khan Tweet) करत विद्यार्थ्यांना आपला पाठींबा जाहीर केलाय.   

सलमान खान नेमकं काय म्हणाला? (Salman Khan On Student Protest)

सलमान खान ट्वीट करत म्हणाला की, "ही एक अत्यंत शांततापूर्ण चळवळ होती; तिला हिंसक वळण लागले याचे खूप दुःख वाटते. ज्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दुखापत झाली, त्यांच्याबद्दल मला मनापासून सहानुभूती वाटते. प्रश्नपत्रिका फुटणे (पेपर लीक) ही एक अतिशय गंभीर समस्या आहे. आपल्या देशातील मुले एका चांगल्या शैक्षणिक व्यवस्थेसाठी एकत्र आली आहेत आणि त्यांच्या पालकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे, हे पाहून मला खूप आनंद होत आहे."

हे आंदोलन किंवा हा विरोध हीच योग्य पद्धत : सलमान खान (Salman Khan Tweet On Student Protest)

"त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे मी मनापासून कौतुक करतो. त्यांनी दाखवलेली निष्ठा, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम करून स्वतःचे भविष्य घडवण्याची तसेच एक महान आणि सुशिक्षित भारत निर्माण करण्याची त्यांची जिद्द वाखाणण्याजोगी आहे. हे आंदोलन किंवा हा विरोध हीच योग्य पद्धत आहे आणि विद्यार्थ्यांनी ते अत्यंत शांततेने केले आहे. ते खरोखरच धैर्यवान आणि शूर आहेत. शिक्षणाप्रती समर्पित आणि प्रेरित असलेली ही पिढी भारताचा नक्कीच गौरव वाढवेल...", असं सलमान खान म्हणाला.

याचं राजकारण केलं जाऊ नये... : सलमान खान (Actor Salman Khan Reaction On Delhi Protest)

पुढे बोलताना सलमान खान म्हणाला की, "हा मुद्दा विद्यार्थी आणि शैक्षणिक व्यवस्था यांच्यातील आहे, याचं राजकारण केलं जाऊ नये. याचे संपूर्ण श्रेय आपल्या देशातील विद्यार्थ्यांनाच दिलं पाहिजे. मला खात्री आहे की, सरकारही त्यांना पूर्ण पाठिंबा देईल आणि शैक्षणिक व्यवस्था अधिक बळकट करेल. ही सर्वांसाठीच फायदेशीर अशी स्थिती आहे. सकारात्मक निर्णयाची आशा आणि प्रार्थना करतो. शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या तुम्हा सर्वांवर ईश्वराची कृपा असो..." 

शिक्षण हीच पुढची 'ट्रेंड' आणि 'फॅशन' बनली पाहिजे : सलमान खान 

"शिक्षण हीच पुढची 'ट्रेंड' आणि 'फॅशन' बनली पाहिजे आणि ती दरवर्षी अधिक लोकप्रिय आणि आकर्षक झाली पाहिजे; इतकी की परदेशातून लोक शिक्षणासाठी भारतात येतील आणि भारत एक 'एज्युकेशनल हब' (शिक्षणाचे प्रमुख केंद्र) बनेल...", असं सलमान खान म्हणालाय. 

दरम्यान, दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला देशभरातून मोठा पाठींबा मिळतोय. राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासोबतच अनेक सेलिब्रिटीही विद्यार्थ्यांसाठी आणि देशाच्या भविष्यासाठी मैदानात उतरले आहेत. बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेते प्रकाश राज,अतुल कुलकर्णी यांसारखे अनेक कलाकार आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी जंतर-मंतरवर पोहोचलेले. तर, नसरुद्दीन शाह, सोनाक्षी सिन्हा, हृतिक रोशन यांच्यासह अनेक कलाकारांनी सोशल मीडिया पोस्टमधून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शवला होता. तर, यावर बॉलिवूडच्या तीन खान्सकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती. तर कपूर कुटुंबीयांकडूनही या प्रकरणात मौन बाळगलेलं. याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू होती. अशातच आता बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खाननं यावर आपली भूमिका स्पष्ट केली असतानाच, आता नेटकऱ्यांकडून शाहरुख खानंही आपली भूमिका जाहीर करावी असा सूर आवळला जातोय.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Naseeruddin Shah On Violence With Students: 'सरकारला फक्त एकच सांगणं, सगळं लक्षात ठेवलं जाईल...'; जंतर-मंतरवर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, नसीरुद्दीन शाहांचा संताप

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan On CJP Students Protest: 'आंदोलनाला हिंसक वळण लागणं...', सलमान खाननं विद्यार्थी आंदोलनावर मौन सोडलंच; सरकारवर दाखवला विश्वास, नेमकं काय म्हणाला?
सलमान खाननं विद्यार्थी आंदोलनावर मौन सोडलंच; सरकारवर दाखवला विश्वास, नेमकं काय म्हणाला?
NEET पेपरफुटीच्या गदारोळात ZEE5 ची नवी वेबसीरिज! 1 मिनीट 10 सेकंदाचा अंगावर काटा आणणारा टीझर
NEET पेपरफुटीच्या गदारोळात ZEE5 ची नवी वेबसीरिज! 1 मिनीट 10 सेकंदाचा अंगावर काटा आणणारा टीझर
Shabana Azmi Asthama Attack in CJP Protest: CJP आंदोलनादरम्यान शबाना आझमींची प्रकृती बिघडली; अश्रुधुरामुळे आला अस्थमा अटॅक, म्हणाल्या...
CJP आंदोलनादरम्यान शबाना आझमींची प्रकृती बिघडली; अश्रुधुरामुळे आला अस्थमा अटॅक, म्हणाल्या...
MI Jinkun Ghein Sara:'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्वीस्ट! शांभवीच्या कारस्थानांचा अखेर पर्दाफाश? छवीच्या हाती लागला मोठा पुरावा
'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्वीस्ट! शांभवीच्या कारस्थानांचा अखेर पर्दाफाश? छवीच्या हाती लागला मोठा पुरावा
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget