Sachin Pilgaonkar on Asha Bhosle Demise: 'माझ्यासाठी त्या कधीच..' आशा भोसलेंच्या निधनानंतर सचिन पिळगावकरांची पोस्ट चर्चेत; म्हणाले..
तब्बल सहा दशकं रसिकप्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज अनंतात विलिन झाला.

Sachin Pilgaonkar on Asha Bhosle Demise: वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षापासून भारतीयांच्या मनावर आपल्या सुरांची अमिट छाप उमटवणाऱ्या दिग्गज गायिका आशा भोसले यांचं रविवारी निधन झालं. (Asha Bhosle Passed Away) त्यांच्यावर आज पार्थिवावर आज (13 एप्रिल 2026) रोजी दुपारी 5 वाजता शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण भारत शोकसागरात बुडाला आहे. मनोरंजन सृष्टीतील अनेक दिग्गजांना आशाजींचा सहवास लाभला. त्यांच्या जाण्याने सगळेच रडवेले झाले आहेत. त्यांच्या आठवणींना वाट मोकळी करून देत आहेत. अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांची आशाजींविषयीची एक भावनिक पोस्ट सध्या चर्चेत आहे. सचिन पिळगावकर यांनी आशा भोसले यांच्यासोबतचे काही जुने फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
काय लिहिलंय सचिन यांनी पोस्टमध्ये?
सचिन पिळगावकर यांनी आशा भोसले यांची आठवण सांगताना लिहिलं,"माझ्या मनात आशाताई नेहमीच उत्साही, जिवंत आणि आनंदाने भरलेल्याच राहतील… कदाचित म्हणूनच माझ्यासाठी त्या कधीच खर्या अर्थाने दूर जाणार नाहीत.लहानपणी मी माझ्या आईसोबत एका रेकॉर्डिंगला गेले असताना त्यांची पहिली भेट झाली. त्यांनी माझ्या आईला खूप आपुलकीने भेटल्या. नंतर कळलं की माझ्या आईसोबत त्यांनी अनेक रेकॉर्डिंग्सही केली होती.
ते पुढे म्हणाले, "आयुष्याचं वर्तुळ तेव्हा पूर्ण झालं, जेव्हा मला माझ्या चित्रपटांसाठी त्यांच्या आवाजात गाणी गाऊन घेण्याचा सन्मान मिळाला. कधी त्यांच्या सोबत स्टेज शेअर करेन, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही होतं… आणि त्यांची स्टाईल तर अप्रतिमच!आम्ही अनेक सुंदर क्षण एकत्र घालवले.
त्यांनीच शिकवलं. आयुष्य साजरं करायचं असतं.या अमर सुरांसाठी मनापासून धन्यवाद.लव्ह यू आशाताई, ॐ शांती"
View this post on Instagram
आशा भोसले यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रचंड संघर्ष केला आणि अथक परिश्रम घेतले. त्यांनी अगदी लहान वयातच त्यांनी गाणं शिकायला सुरुवात केली होती. सुरुवातीच्या काळात, प्रस्थापित गायकांनी नाकारलेली गाणीच त्यांना गाण्यासाठी दिली जात असतं. मात्र, त्यांनी याच गाण्यांचं रूपांतर आपल्या सर्वात मोठ्या सामर्थ्यात केलं. हळूहळू, सिनेमांची गाणी, गझल, पॉप आणि शास्त्रीय संगीत अशा संगीताच्या प्रत्येक प्रकारात त्यांनी आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांनी आपल्या परिस्थितीबद्दल कधीच तक्रार केली नाही. उलट, त्यांनी आपल्या कामालाच स्वतःबद्दल बोलू दिलं. त्यांच्या निधनानंतर, समाजातील सर्व स्तरांतील लोक त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत आणि त्यांच्या गाण्यांची आणि त्यांच्या संघर्षाच्या आठवणींना उजाळा देत आहेत.





















