एक्स्प्लोर

Prajakta Gaikwad On Wedding Entry Controversy: नंदीवरुन बसून एन्ट्री, शंकराला पायी चालवलं, आता लग्नातील एन्ट्रीबाबत प्राजक्ता गायकवाडचं स्पष्टीकरण, म्हणाली...

Prajakta Gaikwad On Wedding Entry Controversy: प्राजक्ता आणि शंभूराजची एन्ट्री डोळ्यांचं पारणं फेडणारी भव्य अशी होती. एका भव्यदिव्य अशा नंदीवर बसून प्राजक्ता गायकवाडनं दणक्यात एन्ट्री घेतली. अनेकांना एन्ट्री आवडली, पण काहींना मात्र ही एन्ट्री जास्तच खटकली.

Prajakta Gaikwad On Wedding Entry Controversy: काही दिवसांपूर्वी 'स्वराज्यरक्षक संभाजी' (Swarajyarakshak Sambhaji) मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) हिनं उद्योगपती शंभूराज खुटवड (Shambhuraj Khutwad) याच्याशी आपली लग्नगाठ बांधली. प्राजक्ताचं लग्न ठरल्यापासूनच तिच्या आणि शंभूराजच्या लगीनघाईची चर्चा रंगलेली. त्यानंतर प्राजक्ता शंभूराजचा शाही विवाहसोहळा (Prajakta Gaikwad On Wedding Entry Controversy) तर डोळे दिपवणारा होता. जेवढी चर्चा प्राजक्ताच्या अख्ख्या विवाहसोहळ्याची झाली, तेवढीच किंवा त्याहून कित्येक पटींनी जास्त चर्चा प्राजक्ता आणि शंभूराजनं रिसेप्शनसाठी दणक्यात घेतलेल्या ग्रँड एन्ट्रीची झाली.   

प्राजक्ता आणि शंभूराजची एन्ट्री डोळ्यांचं पारणं फेडणारी भव्य अशी होती. एका भव्यदिव्य अशा नंदीवर बसून प्राजक्ता गायकवाडनं दणक्यात एन्ट्री घेतली. अनेकांना एन्ट्री आवडली, पण काहींना मात्र ही एन्ट्री जास्तच खटकली. या ग्रँड एन्ट्रीसाठी प्राजक्ता आणि शंभूराज एका भव्यदिव्य अशा नंदीवर बसलेले. त्या मिरवणुकीत पुढे भगवान शंकर आणि शिवगण पायी चालत होते. मराठमोळ्या परंपरेचा हा शाही थाटबाट लक्ष वेधणारा ठरला. प्राजक्ता, शंभूराजची नंदीवरुन एन्ट्री होत असताना फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. पण, सर्व अगदी थाटामाटात, धुमधडाक्यात सुरू असताना उपस्थितांना जे खटकलं नाही, ते नेटकऱ्यांनी हेरलं आणि प्राजक्ता गायकवाडला फैलावर धरलं. ती गोष्ट म्हणजे, प्राजक्ता, शंभूराजच्या ग्रँड एन्ट्रीवेळी पायी चालणारे भगवान शंकर. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

काहींना आमची एन्ट्री निगेटिव्ह वाटली पण... : प्राजक्ता गायकवाड 

प्राजक्ता गायकवाड आणि तिचे अहो शंभूराज खुटवड यांनी नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला जोड्यानं मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना प्राजक्ता आणि शंभूराजनं लग्न आणि लग्नानंतरच्या एकमेकांसोबतचं नातं यावर मनमोकळ्या गप्पा मारल्या. याच मुलाखतीत बोलताना प्राजक्तानं तिच्या लग्नातल्या रिसेप्शनच्या ग्रँड एन्ट्रीवरही स्पष्टीकरण दिलंय. प्राजक्ता गायकवाड म्हणाली की, "लग्नातील सगळे इव्हेंट्स साधे आणि सुटसुटीत ठेवले होते. संगीत, हळद आणि विशेषतः आमची एन्ट्री खूप स्पेशल होती, अनेकांना ती आवडली, पण काहींना ते फार निगेटिव्ह वाटलं. मला प्रेक्षकांना सांगायचंय की, ज्या दिवशी लग्न असतं, त्या दिवशी ते वधू आणि वर हे फक्त स्त्री आणि पुरुष नसून लक्ष्मी-नारायणाचं स्वरूप असतात, याचा उल्लेख पुराणांतही आहे. नंदीवरून केलेली आमची एन्ट्री ही शिव-पार्वती विवाहाची संकल्पना आणि शिवगणांशी जोडलेली होती. खूपच युनिक आणि अगदी वेगळी एन्ट्री होती. मला मोठ्ठ्यानं डीजे लावलाय आणि तिथे सगळे नाचतायत, अशी अजिबात एन्ट्री नको होती... मला स्पिरिच्युअल आणि अर्थपूर्ण करायचं होतं. शिवाय त्यांचं नाव शंभुराज असल्यामुळे ही संकल्पना नावाशीही जोडलेली होती. आता आमच्या लग्नामुळे हे ट्रेंडमध्ये येईल, असं वाटतंय."

लग्न महाबळेश्वरला होणार होतं, पण अचानक... : प्राजक्ता गायकवाड 

शाही विवाहसोहळ्याबाबत बोलताना प्राजक्ता गायकवाड म्हणाली की,"खरंतर, जसं बाकीच्यांचं लग्न होतं तसंच हे नॉर्मल लग्न होतं. पण, लोकांना हे लग्नकार्य आपलंसं वाटलं.सगळ्यांनी ते आपुलकीने ते उचलून धरलं. हे लग्न इतरांसारखंच साधं होतं, सर्व पारंपरिक विधी झाले. पण लोकांनी ते आपुलकीने स्वीकारलं. रिल्स, फोटो-व्हिडीओ व्हायरल झाले. माझ्या महाराणी येसूबाईंच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील लोकांशी असलेला कनेक्ट यामागचं कारण असावं. बाकी लग्नामध्ये आम्ही काहीही वेगळं केलं नव्हतं."

मग प्राजक्तानं सांगितलं की, "मला लग्नात अवाजवी खर्च करायचा नव्हता.मर्यादित लोकांत साधं लग्न करावं, असं माझं मत होतं. पुण्यामध्ये होणाऱ्या लग्नांमध्ये पाच-दहा हजारांचा क्राऊड असतोच. इतक्या मोठ्या लेव्हलची लग्न पुण्यात होतात. शिवाय लोकांची मानसिकता अशी असते की, एक पदार्थ खायचा असतो आणि ताटामध्ये खूप पदार्थ घेतलेले असतात. त्यामुळे खूप अन्न वाया जातं. सगळीकडे अन्न सांडलेलं असतं असं मला अजिबात होऊ द्यायचं नव्हतं.आई-वडिलांच्या कष्टाने कमावलेले पैसे वाया जाऊ नयेत, हीही भावना होती. सुरुवातीला महाबळेश्वरला डेस्टिनेशन वेडिंग ठरवलं होतं, पण नंतर काही कारणांमुळे लग्न पुण्यात करावं लागलं आणि पाहुण्यांची संख्या वाढली. तरीसुद्धा सगळा कार्यक्रम खूप छान पार पडला." 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
मुंबईत वर्षा गायकवाडांच्या बालहट्टानं काय मिळवलं? कार्यकर्ते असूनही काँग्रेसने तब्बल 20 जागा वाऱ्यावर सोडल्या, वंचितने सुद्धा 16 जागांवर उमेदवार दिलेच नाहीत
मुंबईत वर्षा गायकवाडांच्या बालहट्टानं काय मिळवलं? कार्यकर्ते असूनही काँग्रेसने तब्बल 20 जागा वाऱ्यावर सोडल्या, वंचितने सुद्धा 16 जागांवर उमेदवार दिलेच नाहीत
कुंभमेळ्याचे बजेट गिरीश महाजन विरोधीपक्ष फोडण्यासाठी वापरतात; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
कुंभमेळ्याचे बजेट गिरीश महाजन विरोधीपक्ष फोडण्यासाठी वापरतात; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
IAS तुकाराम मुंढेंनी सांगितली 'आयुष्य घडवणारी आठवण'; 25 मे 2005 रोजीचा अत्यानंदी दिवस
IAS तुकाराम मुंढेंनी सांगितली 'आयुष्य घडवणारी आठवण'; 25 मे 2005 रोजीचा अत्यानंदी दिवस
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
मुंबईत वर्षा गायकवाडांच्या बालहट्टानं काय मिळवलं? कार्यकर्ते असूनही काँग्रेसने तब्बल 20 जागा वाऱ्यावर सोडल्या, वंचितने सुद्धा 16 जागांवर उमेदवार दिलेच नाहीत
मुंबईत वर्षा गायकवाडांच्या बालहट्टानं काय मिळवलं? कार्यकर्ते असूनही काँग्रेसने तब्बल 20 जागा वाऱ्यावर सोडल्या, वंचितने सुद्धा 16 जागांवर उमेदवार दिलेच नाहीत
कुंभमेळ्याचे बजेट गिरीश महाजन विरोधीपक्ष फोडण्यासाठी वापरतात; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
कुंभमेळ्याचे बजेट गिरीश महाजन विरोधीपक्ष फोडण्यासाठी वापरतात; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
IAS तुकाराम मुंढेंनी सांगितली 'आयुष्य घडवणारी आठवण'; 25 मे 2005 रोजीचा अत्यानंदी दिवस
IAS तुकाराम मुंढेंनी सांगितली 'आयुष्य घडवणारी आठवण'; 25 मे 2005 रोजीचा अत्यानंदी दिवस
Shahada Accident : भीषण अपघात! प्रवासी टॅक्सी आणि ट्रकची जोरदार धडक; पाच जण गंभीर तर दोघांची प्रकृती चिंताजनक, कारचा अक्षरश: चक्काचूर
भीषण अपघात! प्रवासी टॅक्सी आणि ट्रकची जोरदार धडक; पाच जण गंभीर, तर दोघांची प्रकृती चिंताजनक, कारचा अक्षरश: चक्काचूर
Akola News : कुपवाड्यातील दहशतवाद विरोधी कारवाईत महाराष्ट्राच्या शूर जवानाला वीरमरण; शहीद नायक वैभव लहानेंना अकोल्यात मानवंदना
कुपवाड्यातील दहशतवाद विरोधी कारवाईत महाराष्ट्राच्या शूर जवानाला वीरमरण; शहीद नायक वैभव लहानेंना अकोल्यात मानवंदना
Nanded Municipal Election 2026: 'एक वेळेस संधी द्या, वर्षभरात विकास झाला नाही तर राजीनामा देईन'; ठाकरे गटाच्या महिला उमेदवाराकडून थेट शासकीय बाँडवर हमी!
'एक वेळेस संधी द्या, वर्षभरात विकास झाला नाही तर राजीनामा देईन'; ठाकरे गटाच्या महिला उमेदवाराकडून थेट शासकीय बाँडवर हमी!
Kolhapur Municipal Corporation Election: 'निवडून आल्यावर आम्ही भ्रष्टाचार करणार नाही, पक्ष सोडणार नाही' कोल्हापुरात 'आप' राजर्षी शाहू आघाडीच्या उमेदवारांचे मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र
'निवडून आल्यावर आम्ही भ्रष्टाचार करणार नाही, पक्ष सोडणार नाही' कोल्हापुरात 'आप' राजर्षी शाहू आघाडीच्या उमेदवारांचे मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र
Embed widget