एक्स्प्लोर

सुवर्ण महोत्सवी इफ्फीचा सुवर्ण मयूर पुरस्कार ‘पार्टीकल्स’ चित्रपटाला, मराठमोळी उषा जाधव सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

ब्लेझ हॅरिसन दिग्दर्शित आणि एस्टेल फियालॉन निर्मित ‘पार्टीकल्स’ या चित्रपटाने 50 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा प्रतिष्ठेचा सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला आहे. या महोत्सवाचा आज समारोप झाला.

पणजी: ब्लेझ हॅरिसन दिग्दर्शित आणि एस्टेल फियालॉन निर्मित ‘पार्टीकल्स’ या चित्रपटाने 50 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा प्रतिष्ठेचा सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला आहे. या महोत्सवाचा आज समारोप झाला. 40 लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असून निर्माता आणि दिग्दर्शक अशा दोघांचा या पुरस्कारात समान वाटा आहे. पौंगाडावस्थेतील मुलांचा प्रवास आणि त्यायोगे भौतिकशास्त्राच्या मदतीने पलिकडच्या जगाचा शोध घेण्याचा त्यांचा प्रवास याचे चित्रण या चित्रपटात आहे. संयत चित्रांकनासाठी या चित्रपटाचे परीक्षक मंडळाने कौतुक केले. ‘जल्लिकट्टू’ चित्रपटासाठी लिजो जोस पेल्लिसेरी यांनी पटकावला सर्वोत्तम दिग्दर्शकाचा पुरस्कार ‘जल्लिकट्टू’ या चित्रपटासाठी लिजो जोस पेल्लिसेरी यांनी सर्वोत्तम दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला. या पुरस्काराचे स्वरुप रौप्य मयूर, प्रशस्तीपत्र आणि 15 लाख रुपये असे आहे. हा मल्याळम चित्रपट आहे. दुर्गम गावातील एक बैल गावातून पळून जातो आणि त्यातून हिंसा उद्‌भवते, असे या चित्रपटाचे कथानक आहे. या चित्रपटातील ‘कोरिओग्राफीचे’ परीक्षक मंडळाने कौतुक केले. सेऊ जॉर्ज यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार ब्राझीलचा चित्रपट ‘मारीघेला’ या चित्रपटातील कार्लोस मारीघेलाच्या भूमिकेसाठी सेऊ जॉर्ज यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हुकूमशाहीच्या काळातील शक्तीशाली आणि प्रभावी व्यक्तीरेखा जॉर्ज यांनी साकारली आहे. उषा जाधव यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार ‘माई घाट: क्राईम नं. 103/2005’ या मराठी चित्रपटातील प्रभा माईन या व्यक्तीरेखेसाठी उषा जाधव यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भ्रष्टाचारी व्यवस्थेविरोधात आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी एका आईने पुकारलेला लढा या चित्रपटात आहे. रौप्य मयूर, प्रमाणपत्र आणि 10 लाख रुपये प्रत्येकी असे सर्वोत्तम अभिनेता आणि सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्काराचे स्वरुप आहे. विशेष ज्युरी पुरस्कार पेमा त्सेदेन यांच्या ‘बलून’ चित्रपटाला इफ्फी महोत्सवात यंदा विशेष ज्युरी पुरस्कार पेमा त्सेदेन यांच्या ‘बलून’ चित्रपटाने पटकावला. या तिबेटी चित्रपटातील भाषिक सौंदर्याचे आणि कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. रौप्य मयूर, प्रशस्तीपत्र आणि 15 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. ‘अबू लैला’ आणि ‘मॉनस्टर्स’ या चित्रपटांसाठी अमीन सिदी बौमेदिने आणि मॉरिस अल्टेनू यांना पदार्पणातील सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार ‘अबू लैला’ आणि ‘मॉनस्टर्स’ या चित्रपटांसाठी अमीन सिदी बौमेदिने आणि मॉरिस अल्टेनू यांना पदार्पणातील सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार विभागून देण्यात आला. एका दहशतवाद्याच्या शोधात वाळवंट ओलांडणाऱ्या दोघा बालमित्रांची गोष्ट ‘अबू लैला’ चित्रपटात आहे. तर 24 तासात घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमधील एका जोडप्याच्या नात्यामधले नाट्य ‘मॉनस्टर्स’ या चित्रपटात आहे. रौप्य मयूर, प्रशस्तीपत्र आणि 10 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. ‘हेल्लारो’ चित्रपटाला विशेष पुरस्कार अभिषेक शहा दिग्दर्शित ‘हेल्लारो’ या चित्रपटाला परिक्षकांकडून विशेष पुरस्कार देण्यात आला. चित्रपटातील संगीत आणि कोरिओग्राफीचे कौतुक परीक्षकांनी केले. चित्रपटात मांडण्यात आलेला महिला सबलीकरणाचा विषय आजच्या काळाशीही सुसंगत असल्याचे परीक्षकांनी सांगितले. ‘रवांडा’ चित्रपटाला आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक रिकार्डो सालवेट्टी दिग्दर्शित ‘रवांडा’ या चित्रपटाने आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक पटकावले आहे. पॅरिसमधील इंटरनॅशनल काऊंसिल फॉर फिल्म टेलिव्हिजन ॲण्ड ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन आणि युनेस्को यांच्यातर्फे हा पुरस्कार देण्यात आला आहे. आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक विशेष पुरस्कार संजय पी सिंग चौहान दिग्दर्शित ‘बहत्तर हूरे’ या चित्रपटाला देण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

4000 Core Ramayana Ajinkya Deo Play Vishwamitra: 4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमात अजिंक्य देव यांची वर्णी; साकारणार प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका
4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमात अजिंक्य देव यांची वर्णी; साकारणार प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका
Katrina Kaifs Silence On CJP Protest: कतरिना कैफला लहानपणापासून फॉलो करायचा, पण लाडक्या अभिनेत्रीचं विद्यार्थी आंदोलनावरचं मौन पटलं नाही, थेटच उचललं टोकाचं पाऊल
कतरिना कैफनं विद्यार्थी आंदोलनावर चकार शब्द काढला नाही, लहानपणापासून फॉलो करणारा चाहता भलताच नाराज, उचललं टोकाचं पाऊल
Aamir Khan Nephew Imran Khan Joins Student Protest: आमीर खानचा पत्ता नाही, पण भाचा मात्र विद्यार्थ्यांसाठी मैदानात, मुंबईत शिवाजी पार्कच्या रॅलीमधला VIDEO समोर
आमीर खानचा पत्ता नाही, पण भाचा मात्र विद्यार्थ्यांसाठी मैदानात, मुंबईत शिवाजी पार्कच्या रॅलीमधला VIDEO समोर
Salman Khan On CJP Students Protest: 'आंदोलनाला हिंसक वळण लागणं...', सलमान खाननं विद्यार्थी आंदोलनावर मौन सोडलंच; सरकारवर दाखवला विश्वास, नेमकं काय म्हणाला?
सलमान खाननं विद्यार्थी आंदोलनावर मौन सोडलंच; सरकारवर दाखवला विश्वास, नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget