एक्स्प्लोर

Makarand Anaspure On Compulsion Of Hindi Language: शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा का नको? मकरंद अनासपुरेंनी सगळं उलगडून सांगितलं, म्हणाले...

Makarand Anaspure On Compulsion Of Hindi Language: पहिलीपासून हिंदी नकोच, अशी स्पष्ट भूमिका मकरंद अनासपुरे यांनी मांडली आहे. पण, का नको? हे त्यांनी उलगडूनही सांगितलं आहे.

Makarand Anaspure On Compulsion Of Hindi Language: महाराष्ट्रात (Maharashtra News) आता हिंदी भाषेवरून (Compulsion Of Hindi Language) नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. त्याचं कारण आहे इयत्ता पहिलीपासून हिंदी (Hindi Compulsion) विषयाची सक्ती करण्याचा सरकारचा निर्णय. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून येत्या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्यानं बदल लागू करण्यात येणार आहेत. त्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, मराठी आणि इंग्रजीसोबत हिंदीच्या सक्तीचा. अनेक मराठी सेलिब्रिटी आणि राजकीय नेतेमंडळींनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन सरकारला घेरलं आहे. अशातच आता मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनीही हिंदी सक्तीच्या मुद्यावर भाष्य केलं आहे. पहिलीपासून हिंदी नकोच, अशी स्पष्ट भूमिका मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) यांनी मांडली आहे. 

मराठी सिनेसृष्टी (Marathi Film Industry) गाजवणारं आणि अगदी खेड्यापाड्यांतील साध्याभोळ्या लोकांपासून थेट शहरी भागांतील लोकांना खळखळून हसवणारं मराठमोळं नाव म्हणजे, मकरंद अनासपुरे. नुकतीच मकरंद अनासपुरेंनी न्यूज 18 लोकमतला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यांनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. 

मकरंद अनासपुरे नेमकं काय म्हणाले? 

मकरंद अनासपुरे म्हणाले की, "पहिली इयत्तेपासून हिंदी भाषेची सक्ती अजिबात असू नये. कारण, आपापल्या गरजेनुसार माणूस त्या त्या भाषांमध्ये संवाद साधतो. मी 'पिंजरेवाली मुनिया' नावाचा भोजपुरी सिनेमा केलाय. मला भोजपुरी येत नाही. पण, मी त्या सिनेमापुरतं बोललोय. त्यामुळे गरजेपुरतं आपल्याला ते करता येतं. दुसरं म्हणजे, इतक्या लहान वयात मातृभाषा मुलगा शिकत असताना त्याला हिंदीची सक्ती कशासाठी? मराठी आणि हिंदी या दोन्ही देवनागरी असल्या तरी व्याकरण वेगळं आहे. मराठीतील ऱ्हस्व हे हिंदीत दीर्घ आहे. शब्दांमध्येही घोळ होण्याची शक्यता आहे. म्हणजेच, मराठीत चेष्टा म्हणजे, टवाळी होते. तर हिंदीत चेष्टा म्हणजे, प्रयत्न करणं होतं. त्यामुळे अशा पद्धतीचा घोळ होऊ शकतो".

पहिल्या इयत्तेपासून हिंदी सक्तीची नको, हे माझं स्पष्ट मत : मकरंद अनासपुरे 

पुढे बोलताना मकरंद अनासपुरे म्हणाले की, "शिवाय इतक्या लहान वयात काय गरज आहे? असा मला पडलेला प्रश्न आहे. त्यामुळे पहिल्या इयत्तेपासून हिंदी सक्तीची नको, हे माझं स्पष्ट मत आहे. आम्ही पण पाचवीपासून हिंदी शिकलो. आणि त्यामुळे फारसा फरक पडलेला नाही. मी परदेशात गेलो तरी भाषेमुळे काही भानगड आली अशातला भाग नाही. आपण तेवढ्यापुरतं जुजबी मोडकं तोडकं बोलतो. पण, आपली भाषा ही आपल्याला स्वच्छपणे येणं. आपल्याला ती माहीत असणं. आपल्या भाषेवर आपलं प्रेम असणं, ही मला महत्त्वाची गोष्ट वाटते. मी ग्रामीण भाषांमधल्या सिनेमांमध्ये काम केलेलं असलं तरी त्यामध्ये बऱ्याच म्हणींचाही वापर केलेला आहे. वेगवेगळे शब्दही मी त्यामध्ये वापरलेले आहेत. भाषिक सौंदर्यासाठी प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं प्रयत्न करत असतो"

आपण भाषेला मोठं करत नसतो. तर भाषेमुळे आपण मोठे होतो : मकरंद अनासपुरे 

"मी कॉस्मोपॉलिटियन सोसायटीमध्ये राहतो. जेव्हा माझा मुलगा म्हणाला की, मी कोशिश केली पण मला जमलं नाही. तेव्हा मी बायकोला सांगितलं. त्यामुळे घरात स्पष्ट मराठी बोललं गेलं पाहिजे. आपल्या भाषेचा अभिमान आपण बाळगलाच पाहिजे. मी सातत्यानं मराठीच बोलतो. मी कोणतीही वेगळी भाषा बोलत नाही. जिथे गरजेचं असतं, तिथे आपल्याला तोडकं मोडकं संवाद साधता येतो. आपण भाषेला मोठं करत नसतो. तर भाषेमुळे आपण मोठे होतो", असं मकरंद अनासपुरे म्हणाले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

'अशी ही बनवाबनवी' सिनेमाची स्क्रिप्ट लिहण्यात माझा महत्त्वाचा वाटा, '70 रुपये वारले' डायलॉग कोणी लिहिला? सचिन पिळगावकरांनी सांगितला किस्सा

महत्त्वाच्या बातम्या

Sonu Sood On Kangana Ranaut: कंगना म्हणाली, जेन-झी गटरछाप, लफडेबाज; आता अभिनेता सोनू सूदचं साईंच्या शिर्डीतून उत्तर, परखड वक्तव्य
कंगना म्हणाली, जेन-झी गटरछाप, लफडेबाज; आता अभिनेता सोनू सूदचं साईंच्या शिर्डीतून उत्तर, परखड वक्तव्य
Kangana Ranaut On Media: कंगना रनौतने गुरुपौर्णिमेला मोदींपासून प्रेरणा घेत फ्रंट कॅमेऱ्याने इन्स्टा रील बनवली, म्हणाली, ''अनैतिक' आणि 'अश्लील' कृत्यांना'...
कंगना रनौतने गुरुपौर्णिमेला मोदींपासून प्रेरणा घेत फ्रंट कॅमेऱ्याने इन्स्टा रील बनवली, म्हणाली, ''अनैतिक' आणि 'अश्लील' कृत्यांना'...
Lock Upp: 52 वर्षांच्या राम कपूरने 22 वर्षांनी लहान असलेल्या श्रेया कालरासोबत नको ते केलं; व्हिडीओने सर्व समोर आलं, आता पत्नीने सर्वांसमोर मागितली माफी, म्हणाली...
52 वर्षांच्या राम कपूरने 22 वर्षांनी लहान असलेल्या श्रेया कालरासोबत नको ते केलं; व्हिडीओने सर्व समोर आलं, आता पत्नीने सर्वांसमोर मागितली माफी, म्हणाली...
Abhijeet Dipke On Kangana Ranaut: गटारछाप पिढी म्हणत कंगना रणौत नको नको ते बोलली; आता अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, 5 शब्दांत विषय संपवून टाकला!
गटारछाप पिढी म्हणत कंगना रणौत नको नको ते बोलली; आता अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, 5 शब्दांत विषय संपवून टाकला!

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Manoj Jarange Patil Maratha Reservation: ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
Delhi Student Protest: चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
Embed widget