एक्स्प्लोर

Kranti Redkar: कठीण काळात इंडस्ट्री पाठ फिरवून उभी होती, अनेकांकडून फक्त वरवरची चौकशी; पण 5 जणांनी दिली खरी साथ! क्रांती रेडकर पहिल्यांदाच 'त्या' दिवसांबद्दल बोलली

Kranti Redkar : कठीण काळात इंडस्ट्रीने पाठ फिरवली असली तर काही लोकं माझ्यापाठीशी उभी होती त्यांनी मला खरी साथ दिल्याचा खुलासा अभिनेत्री क्रांती रेडकरने (Kranti Redkar) केला आहे.

Kranti Redkar : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aaryan Khan) याला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर एनसीबीचे माजी प्रमुख अधिकारी आणि मराठामोळी अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती समीर वानखेडे (Sameer Wankhede) चर्चेत आले होते. तसेच, याप्रकरणी मोठी लाच घेतल्याचा आरोपही समीर वानखेडेंवर करण्यात आले. सोबतच या प्रकरणात समीर वानखेडे यांची ईडी चौकशी देखील करण्यात आली. त्यानंतर समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याची प्रकार देखील घडला होता. एकंदरीत या कठीण काळात त्यांना मोठ्या मानसिक त्रासाला समोर जावं लागलंय. मात्र या कठीण काळात इंडस्ट्रीने पाठ फिरवली असली तर काही लोकं माझ्यापाठीशी उभी होती त्यांनी मला खरी साथ दिल्याचा खुलासा अभिनेत्री क्रांती रेडकरने (Kranti Redkar) केला आहे. एका मुलाखतीत तिने या कठीण काळाचे वर्णन करताना हि प्रतिक्रिया दिली आहे.

Kranti Redkar: कठीण काळात इंडस्ट्रीतल्या मोजक्या 5-6 लोकांनी मला मानसिक आधार दिला

समीर वानखेडे एनसीबीत असताना झालेल्या आरोपांमुळे आणि त्यानंतरच्या चौकशांमुळे माझं कुटुंब प्रचंड तणावात होते. एकटे आम्ही या संकटाचा सामना करत होतो. पण या कठीण काळात इंडस्ट्रीतल्या मोजक्या 5-6 लोकांनी मला मानसिक आधार दिला, ज्याचा खुलासा अभिनेत्री क्रांती रेडकरने स्वतः एका मुलाखतीत केला आहे. यावेळी ती म्हणाली ​ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आज आपल्यात नाहीत, पण त्या कठीण काळात ते माझ्यासाठी एका वडिलांसारखे उभे राहिले. क्रांती पुढे सांगताना म्हणाली की, विक्रम काका दर दोन दिवसांनी फोन करायचे. "बेटा, मी आहे हा... तू लढ, मध्यरात्री गरज लागली तरी फोन कर," असे सांगत त्यांनी मोठा मानसिक आधार दिला. केवळ एका सिनेमात सोबत काम केले असूनही त्यांनी दाखवलेली ही आपुलकी माझ्यासाठी खूप मोठी होती. दुसरा महत्त्वाचा आधार मिळाला तो सुबोध भावे आणि त्याची पत्नी मंजिरी यांच्याकडून! सुबोधने फोन करून सांगितले होते, "क्रांती, तू कमाल लढतेयस. पण यात तुझी मुलं लहान आहेत, तुला कधीही वाटलं की मुलांकडे बघायला कोणी हवंय, तर त्यांना बिंधास्त आमच्याकडे सोड आणि तू लढायला जा." एका आईसाठी आणि पत्नीसाठी या शब्दांचा आधार किती मोलाचा असतो, हे शब्दांत सांगणे कठीण आहे.

Kranti Redkar : बाकी अनेकांनी फक्त वरवरची चौकशी केली, पण या 5-6 जणांनी खऱ्या अर्थाने...

​विक्रम गोखले आणि सुबोध भावे यांच्यासोबतच प्राजक्ता माळी, बिजय आनंद आणि मेघा धाडे हे कलाकारही पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. बाकी अनेकांनी फक्त वरवरची चौकशी केली, पण या 5-6 जणांनी खऱ्या अर्थाने जबाबदारीची जाणीव ठेवून मैत्री निभावली. संकटात जो साथ देतो, तोच खरा मित्र असतो हेच यातून दिसून येते! अशी प्रतिक्रिया क्रांतीने यावेळी बोलताना दिली.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Puja Bhatt on Nude Photoshoot: पूजा भट्टच्या 'त्या' न्यूड फोटोशूटने उडालेली प्रचंड खळबळ; अनेक वर्षांनी सोडलं मौन; म्हणाली.. 'रात्री 9.30 वाजता ..'
पूजा भट्टच्या 'त्या' न्यूड फोटोशूटने उडालेली प्रचंड खळबळ; अनेक वर्षांनी सोडलं मौन; म्हणाली.. 'रात्री 9.30 वाजता ..'
Tejashri Pradhan: तेजश्री प्रधाननं 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेतून घेतला ब्रेक, पोहोचली 'या' ठिकाणी, पोस्ट शेअर करत म्हणाली...
तेजश्री प्रधाननं 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेतून घेतला ब्रेक, पोहोचली 'या' ठिकाणी, पोस्ट शेअर करत म्हणाली...
Sayani Chakraborty: रोहिणी पाराध्येनंतर आणखी एका इन्फ्ल्युएंसरनं उचललं टोकाचं पाऊल; राहत्या खोलीतच जीवन संपवलं, कारण...
रोहिणी पाराध्येनंतर आणखी एका इन्फ्ल्युएंसरनं उचललं टोकाचं पाऊल; राहत्या खोलीतच जीवन संपवलं, कारण...
Siddharth Jadhav on Ranveer Deepika Reception: 'बायकोला 10 व्या मिनिटांतच म्हणालो .. ' रणवीर-दीपिकाच्या रिसेप्शनमधून तातडीनं बाहेर पडला सिद्धार्थ जाधव; कारणही सांगितलं ..
'बायकोला 10 व्या मिनिटांतच म्हणालो .. ' रणवीर-दीपिकाच्या रिसेप्शनमधून तातडीनं बाहेर पडला सिद्धार्थ जाधव; कारणही सांगितलं ..

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Embed widget