एक्स्प्लोर

Jab We Met चा सिक्वेल येतोय? इम्तियाज अलींनी गीत आणि आदित्य म्हणून सांगितली 'या' एक्टर्सची नावं

दिग्दर्शकाने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा देखील केली आहे. या चित्रपटाला ए. आर. रहमान यांचं संगीत लाभणार असून मुख्य भूमिकेत दिलजीत दोसांझ दिसणार आहे.

Jab We Met Sequel: 2007 मध्ये प्रदर्शित झालेला 'जब वी मेट' हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात ताजा आहे. दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या या रोमँटिक फिल्ममध्ये करीना कपूर आणि शाहिद कपूर यांनी साकारलेले गीत-आदित्य हे पात्र प्रचंड गाजले होते. चित्रपटातील गाणीही तितकीच लोकप्रिय ठरली. त्यामुळे या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत चर्चा रंगणे स्वाभाविक मानले जात आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इम्तियाज अली यांनी जब वी मेटच्या आधुनिक आवृत्तीत गीत आणि आदित्य कोण असतील असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर इम्तियाज अली यांनी उत्तर दिलं आहे. 

'जब वी मेट'मध्ये कोण असतील गीत आणि आदित्य?

अलीकडे एका मुलाखतीदरम्यान इम्तियाज अली यांना ‘जब वी मेट’च्या आधुनिक आवृत्तीत कोणती स्टारकास्ट पाहायला आवडेल, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी आश्चर्यचकित करणारे उत्तर दिले. ते म्हणाले की, “आजच्या काळात मला वाटतं शरवरी वाघ आणि वेदांग रैना हे हे रोल उत्तमरीत्या साकारू शकतात. ते तरुण आहेत आणि या भूमिकांसाठी योग्य प्रतिभा त्यांच्यात आहे.” विशेष म्हणजे शरवरी आणि वेदांग हे दोघेही त्यांच्या आगामी प्रोजेक्टचा भाग आहेत. पण याबाबत कोणतही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. पण जब वी मेट या चित्रपटाचा सिक्वल यावा अशी चाहत्यांची इच्छा आहे. यापूर्वीही इम्तियाज यांनी गीत-आदित्यच्या भविष्याबाबत विनोदी प्रतिक्रिया दिली होती. एका कार्यक्रमात त्यांनी मिश्कीलपणे म्हटलं होतं की, “दोघे कदाचित घटस्फोटासाठी वकिलांच्या ऑफिसमध्ये असतील.”

दरम्यान, दिग्दर्शकाने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा देखील केली आहे. या चित्रपटाला ए. आर. रहमान यांचं संगीत लाभणार असून मुख्य भूमिकेत दिलजीत दोसांझ दिसणार आहे. तसेच नसीरुद्दीन शाह, वेदांग रैना आणि शरवरी वाघही या प्रोजेक्टमध्ये झळकणार आहेत. मात्र चित्रपटाचे शीर्षक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

‘जब वी मेट’चा तमिळ-तेलुगू अवतारही

इम्तियाज अली दिग्दर्शित ‘जब वी मेट’ हा चित्रपट 2007 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला होता. प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादानंतर या चित्रपटाचे तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही रूपांतर करण्यात आले होते. आजही ‘गीत’ आणि ‘आदित्य’ची प्रेमकहाणी चाहत्यांच्या मनात ताजी आहे.

या चित्रपटादरम्यान अभिनेता शाहिद कपूर आणि करीना कपूर यांच्या नात्याची ही चर्चा झाली. शाहिद आणि करीना यांच्या नात्याबद्दल बोलायचे झाल्यास, दोघांनी 2004 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. मात्र, 2007 मध्ये त्यांचे अचानक ब्रेकअप झाले. तरीही आज दोघेही व्यावसायिक आयुष्यात पुढे जात आपापल्या कामात व्यस्त आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Jackie Shroff : जॅकी दादा नेहमी सोबत झाड का घेऊन फिरतात? त्यांच्या कुंडलीमध्ये काय होतं? नेव्हीमध्ये न जाता ते 'हिरो' कसे बनले? रंजक किस्सा
जॅकी दादा नेहमी सोबत झाड का घेऊन फिरतात? त्यांच्या कुंडलीमध्ये काय होतं? नेव्हीमध्ये न जाता ते 'हिरो' कसे बनले? रंजक किस्सा
OTT Horror Thriller: दिवसा पाहतानाही उडेल थरकाप! JioHotstar वरील वर्षभरापूर्वीचा हा हॉरर थ्रिलर पाहण्याचं धाडस कराल?
दिवसा पाहतानाही उडेल थरकाप! JioHotstar वरील वर्षभरापूर्वीचा हा हॉरर थ्रिलर पाहण्याचं धाडस कराल?
Medha Manjrekar : महेश मांजरेकरांच्या पत्नी मेधा मांजरेकर यांना कॅन्सर? सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टने वेधले लक्ष
महेश मांजरेकरांच्या पत्नी मेधा मांजरेकर यांना कॅन्सर? सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टने वेधले लक्ष
'धुरंधर 2'फेम गायिकेनं भर कॉन्सर्टमध्ये केली साखरपुड्याची घोषणा; स्टेजवर होणाऱ्या नवऱ्याला घेऊन आली अन् .. 
'धुरंधर 2'फेम गायिकेनं भर कॉन्सर्टमध्ये केली साखरपुड्याची घोषणा; स्टेजवर होणाऱ्या नवऱ्याला घेऊन आली अन् .. 

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Embed widget