Jai Jai Swami Samarth: 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये गुरुपौर्णिमेचा महासोहळा! प्रथमच पाच गुरुंच्या दिव्य दर्शनाचा लाभ
Guru Pournima special: 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये प्रथमच पाच गुरुंच्या दिव्य दर्शनाचा अलौकिक अनुभव.

Guru Pournima special Jai Jai Swami Samarth: कलर्स मराठीवरील (Colors Marathi) 'जय जय स्वामी समर्थ' (Jai Jai Swami Smarth) मालिकेने नुकताच 1900 भागांचा पल्ला गाठला. आणि म्हणूनच यंदाची गुरुपौर्णिमा (Guru Pournima) 'जय जय स्वामी समर्थ'च्या प्रेक्षकांसाठी ठरणार आहे भक्ती, चमत्कार आणि गुरुकृपेचा एक अद्वितीय सोहळा. या विशेष एपिसोडमध्ये प्रथमच प्रेक्षकांना लाभणार आहे परब्रह्माच्या पाच दिव्य गुरुरूपांचे भव्य दर्शन आणि स्वामी समर्थांच्या कृपेने गुरुमंत्र प्राप्तीचा अलौकिक क्षण, जो मालिकेच्या इतिहासातील सर्वात भव्य आणि अविस्मरणीय प्रसंग ठरणार आहे.
स्वामी समर्थांवरील अखंड श्रद्धेने प्रेरित होऊन कावेरीने अक्कलकोटकडे जाण्याचा निर्धार केला. मात्र तिच्यासाठी हा प्रवास कधीच सोपा नव्हता. तिच्या भक्तीला खीळ घालण्यासाठी आणि तिचं प्रारब्ध बदलण्यासाठी नकारात्मक शक्तींनी वारंवार कटकारस्थानं रचली. कधी तिचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न झाला, कधी तिचा विश्वास डळमळीत करण्याचा, तर कधी तिच्या नशिबावरच डल्ला मारण्याचा. प्रत्येक संकटानंतरही स्वामींच्या कृपेने कावेरी पुन्हा उभी राहिली आणि तिचा प्रवास सुरूच राहिला.
गुरु पौर्णिमा विशेष, 'जय जय स्वामी समर्थ'(Guru Pournima special Jai Jai Swami Samarth)
याच प्रवासात तिच्या आयुष्यात आला शिवा - खऱ्या गुरूच्या शोधात घरदार सोडून भटकणारा एक तरुण. नियतीने वारंवार कावेरी आणि शिवाची भेट घडवली. हा केवळ योगायोग होता, की स्वामींची आखलेली दैवी योजना? एकमेकांच्या आयुष्यात ते कोणती भूमिका निभावणार आहेत? त्यांच्या भेटीमागचं रहस्य गुरुपौर्णिमेच्या दिवशी उलगडणार आहे. याहूनही मोठं रहस्य म्हणजे कावेरीचं हरवलेलं नशीब. मालिकेच्या सुरुवातीपासून स्वामींनी कावेरीला दिलेलं एक वचन, "तुझं हरवलेलं नशीब तुला परत मिळेल." त्या एका वचनाची पूर्तता अखेर गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी होणार आहे.
पण कावेरीचं हरवलेलं नशीब नेमकं काय आहे? ते तिच्यापासून दूर कसं गेलं? आणि ते तिला पुन्हा कसं मिळणार? कावेरीच्या हरवलेल्या नशिबाशी कायमच गूढरित्या जोडला गेलेला रामाप्पा या सर्व घडामोडींमध्ये कोणती भूमिका बजावणार? त्याच्या आयुष्यात कोणतं मोठं वादळ येणार? स्वामींच्या लीलेमुळे त्याचं भविष्य कोणत्या अनपेक्षित वळणावर येऊन उभं राहणार? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना थक्क करून सोडणार आहेत.
अनेक कठीण परीक्षा, अनपेक्षित चमत्कार आणि दैवी संकेत अनुभवत अखेर कावेरीच्या भक्तीचा परमोच्च क्षण जवळ येतो. गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी तिला लाभणार आहे, पाच दिव्य गुरुरूपांचे अलौकिक दर्शन एक असा साक्षात्कार, जो अनेक जन्मांच्या तपश्चर्येनंतरही लाभणे दुर्लभ मानला जातो, आणि तिच्या निस्सीम श्रद्धेचं सर्वोच्च फळ म्हणून स्वामी समर्थ स्वतः तिला प्रदान करणार आहेत, परमशक्तिशाली गुरुमंत्र एक असा दैवी आशीर्वाद, जो तिच्या आयुष्याचाच नव्हे तर प्रारब्धाचाही नवा अध्याय सुरू करणार आहे.
कावेरीचं हरवलेलं नशीब तिला कसं मिळणार? शिवाला त्याचा खरा गुरु लाभणार का? रामाप्पाच्या आयुष्यात कोणता धक्कादायक बदल होणार? पाच गुरुरूपांच्या दर्शनामागचं दैवी रहस्य काय आहे? आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थ आपल्या भक्तांसाठी कोणती अद्भुत लीला प्रकट करणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं अनुभवण्यासाठी पाहायला विसरू नका 'जय जय स्वामी समर्थ'चा गुरुपौर्णिमा विशेष एपिसोड श्रद्धा, भक्ती, गुरुकृपा, दैवी चमत्कार आणि प्रारब्ध बदलणाऱ्या स्वामींच्या लीलांचा एक नेत्रदीपक, आत्म्याला स्पर्श करणारा आणि अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव.
नक्की पहा गुरुपौर्णिमा विशेष भाग 29 जुलै आणि 30 जुलै रात्री 8:10 वा.आपल्या कलर्स मराठीवर.
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















