Dilip Kumar Nephew Ayub Khan Flop In Bollywood: सुपरस्टार दिलीप कुमार यांचा पुतण्या, पण बॉलिवूडमध्ये नाही चालला 'या' अभिनेत्याचा पत्ता; 32 फिल्म 30 शो करुनही ठरला 'सुपरफ्लॉप'
Dilip Kumar Nephew Ayub Khan Flop In Bollywood: देखणं व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज आणि त्यासोबतच दमदार अभिनय याच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकलीसुद्धा, पण कधीकाळी चर्चेत असलेल्या या अभिनेत्याच्या करिअरला अचानक उतरती कळा लागली.

Dilip Kumar Nephew Ayub Khan Flop In Bollywood: बॉलिवूडच्या (Bollywood News) या चमचमत्या जगात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक कलाकार येतात. काहींना इथे यशाची पायरी गवसते, तर काहींच्या नशीबी आयुष्यभरासाठी स्ट्रगलच येतो. अनेकांचं तर बॉलिवूडमधल्या दिग्गजांसोबत अगदी जवळचं नातं असंत, पण तरीसुद्धा त्यांचं नशीब त्यांना साथ देत नाही. आम्ही आज अशाच एका अभिनेत्याबाबत बोलणार आहोत. तो अभिनेता म्हणजे, दिग्गज अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचे पुतणे अयूब खान (Ayub Khan). एक काळ असा होता की, ते बॉलिवूड (Bollywood Actor) आणि त्यासोबतच टेलिव्हिजन (Television Actor) जगतात चांगलेच चर्चेत होते. देखणं व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज आणि त्यासोबतच दमदार अभिनय याच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकलीसुद्धा, पण कधीकाळी चर्चेत असलेल्या या अभिनेत्याच्या करिअरला अचानक उतरती कळा लागली.
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्याचा पुतण्या असूनही या अभिनेत्याच्या नशीबानं अचानक एवढं वळण घेतलं की, त्याला काम मिळणंही कठीण झालेलं. अभिनेते अयूब खान (Dilip Kumar Nephew Ayub Khan) यांनी स्वतः कबुल केलेलं की, जर आता त्यांना लवकर काम मिळालं नाहीतर, त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ येऊ शकते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक चढ-उतार आले. त्यांच्या वैवाहिक आयुष्याची कहाणी एखाद्या सिनेमासारखीच होती. अयूब खान यांनी दोन लग्न केली असून त्यातलं एक लग्न त्यांनी स्वतःच्या चुलत बहिणीसोबत केलेलं.

दिलीप कुमारांचा पुतण्या असूनही हिरोपासून साईड अॅक्टरपर्यंतचा प्रवास
अयूब खानचा जन्म दिलीप कुमार यांचे बंधू नासिर खान आणि अभिनेत्री बेगम पारा यांच्या पोटी झाला. 1992 मध्ये 'माशूक' सिनेमाद्वारे त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर, 'मृत्युदंड' सिनेमात त्यांनी माधुरी दीक्षितसोबत (Madhuri Dixit) स्क्रिन शेअर केलेली. या सिनेमातील त्याच्या अभिनयाचं समीक्षकांनी भरभरून कौतुक केलं. मात्र, त्यांचा सिनेक्षेत्रातील प्रवास हळूहळू मंदावला. मग, त्यांनी आपलं लक्ष दूरचित्रवाणी क्षेत्राकडे वळवलं, जिथे त्यांनी 'उतरन', 'शक्ती: अस्तित्व के एहसास की' आणि 'तेरे इश्क में घायल' यांसारख्या सुपरहिट मालिकांमधून आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अगदी अलीकडेच, ते 'नीरजा – एक नई पहचान' या मालिकेत दिसले होते. आपल्या अभिनय कारकिर्दीत, अयूब खान यांनी आतापर्यंत 32 सिनेमे आणि 30 सिरीअल्समध्ये काम केलं.
दोन लग्न, मावस बहिणीशीच थाटला संसार (Ayub Khan Marry With Cousin Sister)
अयूब खान यांचं वैयक्तिक आयुष्यही अनेकदा सार्वजनिक चर्चेचा विषय ठरलेलं. 1992 मध्ये, त्यांनी आपल्या आत्याच्या मुलीशी, म्हणजेच आपल्या मावस बहिणीशी विवाह केला. मात्र, काही वर्षांनंतर या दोघांचा घटस्फोट झाला. या लग्नापूर्वी, महाविद्यालयीन दिवसांमध्ये अयूब खान यांचं निहारिका नावाच्या तरुणीवर प्रेम जडलं होतं. मात्र, त्यानंतर ती अमेरिकेला स्थायिक झाली होती. पुढे, या दोघांचा पुन्हा संपर्क झाला आणि अखेरीस त्यांनी विवाह केला. तरीही, 2016 मध्ये त्यांचं निहारिका यांच्यासोबतचं नातंही संपुष्टात आलं. अयूब खान यांना त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीत आणि वैयक्तिक आयुष्य दोन्ही ठिकाणी, संघर्षांचा सामना करावा लागला. असं असूनही, आजही ते मेहनतीच्या जोरावर स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी अविरत प्रयत्न करत आहेत.
"बँक बॅलेन्स आता संपत आलाय... भीक मागावी लागेल..."
2021 साली काम मिळत नसल्यामुळे अयूब खान यांनी सर्वांसमोर आपली व्यथा मांडली होती. कोरोनाच्या काळात त्यांनी सांगितलेलं की, या महामारीमुळे प्रत्येकाच्या कामावर परिणाम झाला असून सगळेच जण संघर्ष करत आहेत. जवळपास दीड वर्षांपासून त्यांच्याकडे कोणतंही नियमित काम नव्हतं आणि या काळात त्यांनी कोणतीही कमाई केली नव्हती, हीच त्यांच्यासाठी मोठी चिंता होती. परिस्थिती अशीच राहिली तर भिक मागण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली होती. तसेच त्यांचा बँक बॅलन्सही संपत आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :





















