एक्स्प्लोर

न संपणारा 'बोगदा'

एक निमित्त होतं, आणि आईला एका दुर्धर आजार होतो. यातून सुटण्याची आईची धडपड सुरु होते. शेवटचे दिवस एका गावात व्यतित करण्याबाबत दोघींचं एकमत होतं. मग दोघी या प्रवासाला निघतात. त्या प्रवासादरम्यान दोघींच्या नात्याला नवं वळण मिळतं. एकमेकींबद्दल काही साक्षात्कार होतात. त्याचं बोट पकडून हे नातं 'बोगदा' पार करतं. त्याची ही गोष्ट.

निशिता केणी या दिग्दर्शिकेचा हा पहिला सिनेमा आहे. आता ही निशिता कोण असा प्रश्न तुमच्या मनात येणं साहजिक आहे. पण इंडस्ट्रीत केणी हे आडनाव नवं नाही. या आडनावाबद्दल कमालीचा आदर आहे. कारण ही नितीन केणी यांची मुलगी. नितीन यांचं मराठीतलं योगदान मोठं आहे. अनेक चांगले हिंदी, मराठी सिनेमे त्यांनी दिले आहेत. त्यांची मुलगी दिग्दर्शनात उतरते आहे. त्याचं रीतसर शिक्षणही तिनं घेतलं आहे. तिचा 'बोगदा' हा सिनेमा पाहताना, तिने घेललेलं शिक्षण जागोजागी दिसत राहतं. फ्रेमिंग, कम्पोझिशन्स, शांततेचा वापर करण्याचा केलेला प्रयत्न....हे पाहता इच्छेला तांत्रिक बाबींचं लाभलेलं शिक्षण दिसतं. पण इथे थोडी गल्लत झाली आहे. इथे, तांत्रिक बाबीत सिनेमा जास्त अप-टू-डेट असला, तरी भावना आणि त्याच्या सर्वंकष परिणामाबाबत मात्र हा सिनेमा गरजेपेक्षा जास्त संथ, मोठा आणि त्यामुळे कंटाळवाणा होतो. सिनेमाचा एकूण विषय छान असला, तरी त्या नात्याला असलेली काळी किनार गडद होत होत, संपूर्ण सिनेमा व्यापून टाकू लागते, त्यामुळे हा विषय नैराश्यग्रस्त होतो. हा दिग्दर्शिकेचा पहिला प्रयत्न आहे, त्याचं कौतुक आहेच, पण त्याच नवखेपणातून आर्ट फिल्मचा आव दिसू लागतो. त्यामुळे हा 'बोगदा' संपता संपत नाही. परिणाम सिनेमा संपता संपता हाती येतं ते इरिटेशन. सिनेमाचा विषय यापूर्वी काही सिनेमातून हाताळला गेला आहे. खूप पूर्वी आभिजीत खाडे या लेखकाची एकांकिकाही आली होती. मुक्ती भवन नावाचा हिंदी सिनेमाही आला होता.. आठवतोय का? तशीच याची गोष्ट आहे. एका छोट्या गावात मायलेकी राहतायत. आईने मोठ्या हिमतीने मुलीला मोठं केलंय. फणसाचे गरे तळून घर चालवते आई. पण आता आई थकली आहे. मुलगीही कमावती आहे. आई आणि मुलीत वयाचं अंतर जरा जास्त आहे. त्यामुळे थकल्या आईचा आधार आपली मुलगी तेजू हीच आहे. एक निमित्त होतं, आणि आईला एका दुर्धर आजार होतो. यातून सुटण्याची आईची धडपड सुरु होते. शेवटचे दिवस एका गावात व्यतित करण्याबाबत दोघींचं एकमत होतं. मग दोघी या प्रवासाला निघतात. त्या प्रवासादरम्यान दोघींच्या नात्याला नवं वळण मिळतं. एकमेकींबद्दल काही साक्षात्कार होतात. त्याचं बोट पकडून हे नातं 'बोगदा' पार करतं. त्याची ही गोष्ट. चित्रपटाची कथा विलोभनीय आहे. कारण मानवी नात्यांचे नव्याने होणारे साक्षात्कार, चकित करणारे अनुभव.. पदरी येणारे अपेक्षाभंग.. नव्याने लाभणारे मापदंड हे वयाच्या कोणत्याही टप्प्यावर येऊ शकतात. कारण परिस्थिती वेळोवेळी तुम्हाला तसं वागायला भाग पाडत असते. त्यामुळे नात्यांवर बेतलेले सिनेमे पुन्हा पुन्हा आले तरी ते कंटाळवाणे होत नाही. कारण जेवढी माणसं.. तेवढे त्यांचे स्वभाव.. तितके नात्यांचे रंग. इथेही ती मजा आहे. तेजस्विनी आणि तिच्या आईमध्ये जनरेशन गॅप आहेच. एकमेकींबद्दल कमालीचं प्रेम असलं तरी आपापला स्वाभिमान आहे. परिस्थितीकडे तटस्थपणे पाहण्याची कुवत आहे. या दोघींचं नातं अधोरेखित होत असताना, त्यांची वर्तणूक सहज सोपी वाटायला हवी होती. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिचा आपला असा वेग असतो. पैस असतो. म्हणूनच कोणी शांत वाटतो, तर कोणी चंचल. या विविधतेतूनच नाती जन्माला येतात. परस्परविरोधी असूनही बंध निर्माण होतात. या सिनेमात तसं होत नाही. दिग्दर्शिकेला अभिप्रेत असलेला वेग घेऊन प्रत्येक व्यक्तिरेखा सिनेमात येते. मग ती तेजस्विनी असो. आई असो किंवा त्यांचा ड्रायव्हर किशोर असो. खरंतर किशोर आल्यामुळे हा सिनेमा जास्त खोटा होतो. आणि शेवटी.. शेवट.. म्हणजे, या बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर नेमकी मानसिकता कशी असणार आहे.. त्यावर विचार व्हायला हवा होता. झुंबड गाणं ऐकायला बरं वाटत असलं तरी ते ज्या टप्प्यावर सिनेमात येतं ते अगदीच अमान्य होऊ लागतं. अभिनयाबाबत सुहास जोशी आणि मृण्मयी देशपांडे यांनी अनुक्रमे आई-मुलीची भूमिका केलीय नेटाने. पण सिनेमाचा वेग खूप कमी असल्याने या व्यक्तिरेखांचे अपेक्षित रंग मनात घर करत नाही. त्यातल्या आईबद्दल सहानुभूती वाटता वाटता राहून जाते. हा सिनेमा पोएटिक आहे. त्याला त्याचा असा वेग आहे. पण तो नियंत्रणात असायला हवा होता. सिनेमाची लांबी जी आत्ता दोन तासांवर झाली आहे, ती १०० मिनिटांत संपायला हवी होती असं वाटून जातं. हा प्रयत्न म्हणून याकडे पाहायला हवं. सामान्यजनांना हा सिनेमा पाहिल्यानंतर पदरी निराशा येईल. एक डाव भूताचा असतो असं म्हणतात. तसं समजूया. एक नक्की, या मुलीला फ्रेमिंगचं, कम्पोझिशन्सचं चांगल भान आहे. ते यात दिसतंही. पण यातली गोष्टही तितकीच महत्वाची हवी. असो. म्हणूनच पिक्चर बिक्चरमध्ये या सिनेमाला मिळताहेत दोन स्टार्स.

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actresses: 'वर्ल्ड सोशल मीडिया डे' विशेष! कुणी फिटनेस तर कुणी फनी रिल्स, सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या 5 अभिनेत्री
'वर्ल्ड सोशल मीडिया डे' विशेष! कुणी फिटनेस तर कुणी फनी रिल्स, सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या 5 अभिनेत्री
Welcome to the jungle: अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल' ची बॉक्स ऑफिसवर सिंहगर्जना, सोमवारी धुमाकूळ घातला; किती कोटी कमावले?
अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल' ची बॉक्स ऑफिसवर सिंहगर्जना, सोमवारी धुमाकूळ घातला; किती कोटी कमावले?
Ketan Agarwal Death Case Singer Amaal Mallik Reaction: 'केतनला मारण्यासाठी एवढी मेहनत घेण्याची काहीच गरज नव्हती...'; पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणावर बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकाची पोस्ट
'केतनला मारण्यासाठी एवढी मेहनत घेण्याची काहीच गरज नव्हती...'; पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणावर बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकाची पोस्ट
Cocktail 2 Box Office Collection: लव्ह ट्रँगल ठरला सुपरहिट! 'कॉकटेल 2' या सिनेमाची सोमवारीही उत्तम कामगिरी, किती कोटी कमावले?
लव्ह ट्रँगल ठरला सुपरहिट! 'कॉकटेल 2' या सिनेमाची सोमवारीही उत्तम कामगिरी, किती कोटी कमावले?

व्हिडीओ

Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report
Uddhav Thackeray Tour In Reble MP Constituency : दौरे आणि बोल, डॅमेज की कंट्रोल? | Special Report
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं 'हित', ठाकरे 'चिंतक' | Special Report
Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरे नी*, मौलवींसोबत शय्या, 2019 मध्ये शेण खाल्लं, आता लग्नात फोटोग्राफी करावी : नितेश राणे
उद्धव ठाकरे नी*, मौलवींसोबत शय्या, 2019 मध्ये शेण खाल्लं, आता लग्नात फोटोग्राफी करावी : नितेश राणे
Sachin Ahir Anti Defection Law: कायद्यातील सर्वात मोठी पळवाट, सचिन अहिर यांना पक्षांतरबंदी कायदा लागूच होणार नाही, कारण...
कायद्यातील सर्वात मोठी पळवाट, सचिन अहिर यांना पक्षांतरबंदी कायदा लागूच होणार नाही, कारण...
Sachin Ahir joins Eknath Shinde Shivsena: 'ती' तीन नावं चर्चेत ठेवून एकनाथ शिंदेंनी सगळ्यांना गाफील ठेवलं अन् ठाकरेंचा विश्वासू मोहरा फोडला, सचिन अहिर शिंदे गटात
'ती' तीन नावं चर्चेत ठेवून एकनाथ शिंदेंनी सगळ्यांना गाफील ठेवलं अन् ठाकरेंचा विश्वासू मोहरा फोडला, सचिन अहिर शिंदे गटात
Nasrapur Case Crime news: चिमुरडीची आजीसोबत राम मंदिरात पूजा, आंघोळ करुन भरपेट खाल्लं अन् तासाभरात होत्याचं नव्हतं झालं, नसरापूरमध्ये काय-काय घडलं?
चिमुरडीची आजीसोबत राम मंदिरात पूजा, आंघोळ करुन भरपेट खाल्लं अन् तासाभरात होत्याचं नव्हतं झालं, नसरापूरमध्ये काय-काय घडलं?
Petrol Diesel: केंद्र सरकारचा पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वाचा निर्णय, 200 लिटरचा नियम हटवला
Petrol Diesel: केंद्र सरकारचा पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वाचा निर्णय, 200 लिटरचा नियम हटवला
Bollywood Movie Story: वडिलांनी फक्त 3 शब्द उच्चारले, लेकानं धडाधड 3 सिनेमे बनवून टाकले; सर्वच्या सर्व ठरले सुपरहिट, तुम्ही पाहिलेत का?
वडिलांनी फक्त 3 शब्द उच्चारले, लेकानं धडाधड 3 सिनेमे बनवून टाकले; सर्वच्या सर्व ठरले सुपरहिट, तुम्ही पाहिलेत का?
Ketan Agrawal Lohagadh Case Pune: सिया, चेतन सोडा, आता साहिल गोयलभोवती तपासाची चक्रं फिरणार; केतन अग्रवाल प्रकरणात ट्विस्ट, नेमकं काय घडलं?
सिया, चेतन सोडा, आता साहिल गोयलभोवती तपासाची चक्रं फिरणार; केतन अग्रवाल प्रकरणात ट्विस्ट, नेमकं काय घडलं?
Pune Nasrapur Case: कोर्टाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली, पण भीमराव कांबळेला प्रत्यक्षात कधी लटकवणार?; अजमल कसाबला 4 वर्षांनी झालेली फाशी
कोर्टाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली, पण भीमराव कांबळेला प्रत्यक्षात कधी लटकवणार?; अजमल कसाबला 4 वर्षांनी झालेली फाशी
Embed widget