एक्स्प्लोर

Ramayana : 'रामायणा'मुळे रामानंद सागर 10 वर्ष अडकले होते कोर्ट-कचेरीत, काय झालं होतं नेमकं?

Ramanand Sagar Ramayana : रामायण मालिकेमुळे रामानंद सागर यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करण्यात आला होता. जवळपास 10 वर्ष खटला चालला होता.

Ramanand Sagar Ramayana : रामानंद सागर (Ramand Sagar) यांच्या 'रामायण' (Ramayana) ही मालिका 1987 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेली. या मालिकेने लोकप्रिय मालिकेचे शिखर गाठले होते. रामायण ही मालिका  वाल्मिकी रामायण आणि तुलसीदास यांच्या रामचरितमानस याच्यावर आधारीत आहे. कलाकारांचा सहजसुंदर अभियनाने प्रेक्षकांची मने जिंकली. दर रविवारी प्रसारीत होणाऱ्या मालिकेची उत्सुकता प्रेक्षकांना असायची. मात्र, रामायण मालिकेमुळे रामानंद सागर यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करण्यात आला होता. 

रामानंद सागर यांच्यावर होता दबाव

'रामायण' मालिकेतील 78 व्या भागात सीता माता ही पृ्थ्वीत लीन होते. त्यानंतर लोकांनी त्या पुढील गोष्ट सांगण्याची मागणी केली. इतकंच नाही तर दूरदर्शन आणि रामानंद सागर यांच्यावरही दबाव आणण्यास सुरुवात केली. मात्र, रामानंद सागर  त्या पुढील गोष्ट सांगण्यास तयार नव्हते. सीता मातेने पृथ्वीत स्वत:ला लीन करून घेतल्यानंतर पुढील गोष्ट दाखवण्यास नकार दिला. रामानंद सागर म्हणाले की त्यांनी या पुढील गोष्ट दाखवली तर ती कल्पनेवर आधारीत असेल. वाल्मिकी रामायण आणि तुलसीदास यांच्या रामचरितमानस मध्ये रामायणाची पुढील गोष्टच नमूद केली नाही. त्यामुळे पुढील गोष्ट कशी सांगता येईल? असा प्रश्न त्यांच्यासमोर होता.

10 वर्ष चालला कोर्टात खटला... 

दूरदर्शन आणि इतर लोकांनी सांगितल्यानंतर रामानंद सागर यांनी रामायणातील पुढील भाग सांगण्यास होकार दिला. रामानंद सागर यांनी 'रामायण उत्तर कांड' नावाचा सिक्वेल बनवला. पण त्यात दाखवलेली कथा लोकांना आवडली नाही. त्यावरून बराच वाद झाला, लोकांनी आक्षेपही व्यक्त केला आणि कोर्टात खटला दाखल करण्यात आला. काही वृत्तांनुसार,'रामायण उत्तर कांड'मुळे रामानंद सागर यांना 10 वर्षे कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागल्या.

क्लॅपर बॉय म्हणून रामानंद सागर यांचे सिनेसृष्टीत पदार्पण

रामानंद सागर  यांची रामायण ही मालिका 1987 मध्ये प्रसारित झाली होती. लॉकडाऊनमध्ये देखील ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत होती.  'रामायण' मालिकेतील संगीत लोक आजही आवडीनं ऐकतात. या मालिकेला संगीत रवींद्र जैन यांनी दिले. रामायण या मालिकेची निर्मिती, दिग्दर्शन करणारे रामानंद सागर यांचा सिनेसृष्टीतील प्रवास क्लॅपर बॉय म्हणून झालेला. क्लॅपर बॉय म्हणून त्यांनी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी पृथ्वी थिएटर्समध्ये सहाय्यक स्टेज मॅनेजर म्हणून काम केले. राज कपूरच्या बरसात या चित्रपटाची कथा आणि पटकथा रामानंद सागर यांनी लिहिली होती. 1968 मध्ये आँखे चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला होता. 1987 मध्ये चित्रपटांव्यतिरिक्त रामानंद यांनी रामायणाची निर्मिती केली. 

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
Sushant Singh Rajput: 'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...'; मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...'; मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
MHJ Fame Onkar Bhojane in Manjar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget