एक्स्प्लोर

REVIEW : पिक्चर-बिक्चर : तो बात बन सकती थी 'देवा'!

मल्याळम चित्रपटाचं मराठीकरण करताना देवामध्ये अनेक संदर्भ बदलण्यात आले आहे. ते योग्य आहे. पण ते करत असताना स्थळ काळ वेळाची गोची इथे झालेली दिसते.

'टायगर जिंदा है'शी दोन हात करुन अखेर 'देवा'ने सव्वादोनशे स्क्रीन्स मिळवल्या आणि आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. 'देवा'बद्दल दोन गोष्टीमुळे कमालीची उत्सुकता आहे. एकतर यात अंकुश चौधरी, तेजस्विनी पंडित, स्पृहा जोशी अशी तगडी कास्ट आहे. आणि दुसरी बाब अशी की हा मल्याळी चित्रपट चार्ली या चित्रपटाचा रीमेक आहे. चार्लीचा वेगळा फॅन फॉलोईंग आहे. त्यामुळे 'देवा'बद्दल कमालीची उत्सुकता आहे. मुरली नलप्पा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाच्या सर्व तांत्रिक बाजू उत्तम आहे. सर्वच कलाकारांनी नेटका अभिनय केल्यामुळे हा चित्रपट किमान रंजन करतो. पण, या गोष्टीच्या पोटात असलेला थरार, मानवी नातेसंबंधांची घालमेल साकारण्यात मात्र हा चित्रपट अपयशी ठरतो. पटकथेच्या उत्तरार्धात अनेक बाबी एकत्र आल्यामुळे सिनेमाचा फोकस शिफ्ट होतो आणि मूळ देवाच्या गोष्टीपासून हा सिनेमा लांब जाऊ लागतो. मल्याळम चित्रपटाचं मराठीकरण करताना देवामध्ये अनेक संदर्भ बदलण्यात आले आहे. ते योग्य आहे. पण ते करत असताना स्थळ काळ वेळाची गोची इथे झालेली दिसते. त्यामुळे पूर्वार्धात उंचावलेला देवाचा ग्राफ नंतर मात्र कमकुवत होत खाली येतो. सिनेमाची गोष्ट काहीशी अशी, माया ही एक यशस्वी लेखिका आहे. तिच्या पहिल्या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आता तिला दुसऱ्या पुस्तकाची ऑफर आहे, पण तिच्याकडे तसा विषय नाही. तो विषय शोधण्यासाठी ती कोकण गाठते. माणसांना भेटता भेटता सुचेल एखादी गोष्ट अशी तिची धारणा. याचवेळी कोकणात तिला राहण्यासाठी मिळतं देवाचं घर. हा देवा तिथे काही काळासाठी राहत असतो. त्या घरातल्या गोष्टी पाहून माया अवाक होते. त्याचवेळी तिच्या हाती एक चित्रकथा पडते. त्यातून तिची देवाबद्दलची उत्सुकता वाढते आणि या माणसाला शोधण्यासाठी ती एकेका माणसाला शोधत तिचा शोध सुरू होतो आणि त्या प्रत्येक माणसातून देवाचा नवा पैलू तिला दिसतो. तिचा शोध हाच या चित्रपटाचा प्रवास होतो. जिथे कुठे शोध आला की ती कथा उत्कंठावर्धक व्हायला हवी. कधीमधी ती शमावी पुढे ती वाढावी या हिंदोळ्यावर सिनेमाने प्रेक्षकाला ठेवलं की तो चित्रपट आणखी रंजक आणि तितकाच धक्कादायी होतो. देवाबाबत पूर्वार्ध नेटका असला, तरी उत्तरार्धात जशी नव्या व्यक्तिरेखा येऊ लागतात तशी पटकथेवरची दिग्दर्शकाची पकड सैल होऊ लागते. विषय सोडून चित्रपट इतर माणसांची गोष्ट सांगू लागतो आणि मग अधेमधे देवा, माया दिसू लागतात. या प्रवासात देवा आणि माया यांचं तयार होणारं नातं दिसत नाही. त्यामुळे शेवटी मायाने घेतलेला निर्णय अनाकलनीय वाटतो. आणि हा सगळा पसारा नेमका का मांडलाय याची उकल होत नाही. उत्तरार्ध गडबडल्याने चित्रपटाचा पूर्ण टेम्पो कमालीचा हळू होतो. खोटा वाटू लागतो. चित्रपटाची सध्या जी ठेवण आहे ती दाक्षिणात्य सिनेमाला साजेशी असेलही कदाचित. पण मग सुरुवातीपासून ती तशी असायला हवी होती. सोयीनुसार त्याचा बाज बदलणं हे देवा चित्रपटाला घातक ठरतं. पटकथेची बाब सोडली तर अंकुश चौधरी, तेजस्विनी पंडित, स्पृहा जोशी यांनी संयमानं आपली व्यक्तिरेखा साकारली आहे. अंकुशला मोठ्या पडद्यावर पाहायला मजा येते.  मोहन आगाशे, रीमा, पंढरीनाथ कांबळे, वैभव मांगले यांच्या व्यक्तिरेखाही छोट्या पण दखल घेण्याजोग्या. या चित्रपटाचं कथानक, छायांकन, संगीत, संकलन या सर्व बाबी नेटक्या असल्या तरी सिनेमासाठी आवश्यक असलेला गाभा अर्थात पटकथा कसून न बांधल्यामुळे हा सगळा ढाचा भुसभुशीत पायावर उभा असल्याचं जाणवतं. सगळं उत्तम असूनही हाती आलेला घास कुणीतरी काढून घ्यावा अशी काहीशी गत 'देवा'ची झाली आहे. असो बेटर लक नेक्स्ट टाईम.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सोलो ट्रिप ते मैत्रीचा खास प्रवास; 'सखे गं साजणी'चा धम्माल टीझर रिलीज, पहिल्यांदाच 3 कलाकार एकत्र स्क्रीन शेअर करणार
सोलो ट्रिप ते मैत्रीचा खास प्रवास; 'सखे गं साजणी'चा धम्माल टीझर रिलीज, पहिल्यांदाच 3 कलाकार एकत्र स्क्रीन शेअर करणार
ठरलं! 'या' तारखेला रिलीज होणार 'धुरंधर 2'चा ट्रेलर; रणवीर सिंहनं दिली मोठी अपडेट
ठरलं! 'या' तारखेला रिलीज होणार 'धुरंधर 2'चा ट्रेलर; रणवीर सिंहनं दिली मोठी अपडेट
प्रसिद्ध गायिकेनं नशेत कार भरधाव पळवली; पोलिसांनी अडवून अटक केली, आता थेट कोर्टात...
प्रसिद्ध गायिकेनं नशेत कार भरधाव पळवली; पोलिसांनी अडवून अटक केली, आता थेट कोर्टात...
Bollywood Director Struggle Life Story: सर्वात मोठा ब्लॉकबस्टर दिल्यानंतर भस्मासूर बनला 'हा' दिग्गज दिग्दर्शक; अहंकार जागा झाला अन् होतं नव्हतं ते सगळं धुळीस मिळालं
सर्वात मोठा ब्लॉकबस्टर दिल्यानंतर भस्मासूर बनला 'हा' दिग्गज दिग्दर्शक; अहंकार जागा झाला अन् होतं नव्हतं ते सगळं धुळीस मिळालं

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
Maharashtra Budget 2026: देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
Maharashtra Budget 2026 : मेट्रो मार्गांचं जाळं वाढवणार, द्रूतगती मार्गांची उभारणी ते शेतकरी कर्जमाफी आणि स्टार्टअप हब, देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
विकसित महाराष्ट्राच्या दिशेनं पाऊल, मेट्रोचा विस्तार, द्रूतगती मार्गांची उभारणी ते कर्जमाफी, अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा
Embed widget