एक्स्प्लोर

'त्या' एका वादानंतर अमिताभ अन् अजिताभ बच्चन मतभेद टोकाला गेलेले, वडिलांच्या निधनानंतर सगळंच बदललं, काय घडलेलं?

अजिताभ अनेक कौटुंबिक कार्यक्रमांपासून दूर राहिले. अभिषेक-ऐश्वर्याच्या साखरपुड्यातही त्यांची उपस्थिती नव्हती.

Ajitabh bachchan: बच्चन कुटुंब म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते अमिताभ बच्चन यांचं भव्य व्यक्तिमत्त्व, जया बच्चन, अभिषेक, ऐश्वर्या आणि श्वेता. मात्र या झगमगाटामागे एक नाव असं आहे, ज्याबद्दल फार कमी चर्चा होते -ते म्हणजे अमिताभ बच्चन यांचे धाकटे भाऊ अजिताभ बच्चन.

हरिवंश राय बच्चन यांचे दोन पुत्र - अमिताभ आणि अजिताभ. अमिताभ जसे सिनेसृष्टीत सर्वोच्च स्थानी पोहोचले, तसे अजिताभ यांनी कायमच ग्लॅमरपासून अंतर ठेवलं. मात्र एक काळ असा होता, जेव्हा बिग बींच्या करिअरच्या पायाभरणीत अजिताभ यांचा मोठा वाटा होता.

अभिनयाच्या स्वप्नामागे भावाचा पाठिंबा

शिक्षण पूर्ण केल्यानंतर दोन्ही भाऊ कोलकात्यात नोकरी करत होते. त्याच काळात अमिताभ यांच्या मनात अभिनयाचं स्वप्न आकार घेत होतं. अजिताभ यांनी हे ओळखलं आणि भावाच्या स्वप्नाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. अमिताभ यांचे फोटो घेऊन ते निर्मात्यांकडे गेले. सुरुवातीला वारंवार नकार मिळाले, मात्र प्रयत्न सुरूच राहिले. अखेर अमिताभ यांना पहिली संधी मिळाली आणि त्यांच्या फिल्मी प्रवासाला सुरुवात झाली.


त्या' एका वादानंतर अमिताभ अन् अजिताभ बच्चन मतभेद टोकाला गेलेले, वडिलांच्या निधनानंतर सगळंच बदललं, काय घडलेलं?

अमिताभ यांचे ‘मॅनेजर’ होते अजिताभ

मुंबईत अमिताभ यांचा संघर्ष सुरू असताना अजिताभ कोलकात्यातच होते. अमिताभ यशाच्या शिखराकडे जाऊ लागल्यानंतर अजिताभ यांनी नोकरी सोडून मुंबई गाठली. ते अमिताभ यांचे मॅनेजर बनले. चित्रपटांची निवड, आर्थिक व्यवहार, भेटीगाठी - सगळं काही अजिताभच पाहत होते. त्या काळात अमिताभ यांना भेटायचं असेल, तर आधी अजिताभ यांची परवानगी घ्यावी लागायची.

व्यवसाय, राजकारण आणि वाढत गेलेले मतभेद

नंतर अमिताभ बच्चन राजकारणात सक्रिय झाले, तर अजिताभ परदेशात लंडनला व्यवसायासाठी गेले. या व्यवसायात अमिताभ यांची गुंतवणूक असल्याचंही बोललं जातं. अजिताभ आणि त्यांच्या पत्नी रमोलाने तिथे मोठ्या प्रमाणावर मालमत्ता खरेदी केली होती.

मात्र बोफोर्स प्रकरणात अमिताभ यांचं नाव आल्यानंतर त्याचे पडसाद अजिताभ यांच्या व्यवसायावरही उमटले. चौकशा, अफवा आणि दबावामुळे अजिताभ लंडनहून बेल्जियमला गेले. जरी नंतर दोघांनाही क्लीन चिट मिळाली, तरी या काळात भावांमधील अंतर वाढत गेलं.

वडिलांच्या निधनानंतर तुटले नातं

हरिवंश राय बच्चन जिवंत असताना दोन्ही भाऊ किमान औपचारिकरीत्या एकत्र दिसत होते. मात्र वडिलांच्या निधनानंतर हे नातं पूर्णपणे तुटल्याचं सांगितलं जातं. अजिताभ अनेक कौटुंबिक कार्यक्रमांपासून दूर राहिले. अभिषेक-ऐश्वर्याच्या साखरपुड्यातही त्यांची उपस्थिती नव्हती.


त्या' एका वादानंतर अमिताभ अन् अजिताभ बच्चन मतभेद टोकाला गेलेले, वडिलांच्या निधनानंतर सगळंच बदललं, काय घडलेलं?

वर्षांनंतर पुन्हा जवळ आले

2007 नंतर परिस्थिती बदलू लागली. अजिताभ आणि पत्नी रमोलाचा घटस्फोट झाला. त्यांच्या मुलींपैकी एक - नैना. हिच्या लग्नात अमिताभ आणि अजिताभ वर्षांनंतर एकत्र दिसले. पुढे 2012 च्या सुमारास संबंध सुधारल्याचं बोललं गेलं. अजिताभ पुन्हा ‘प्रतीक्षा’ बंगल्यात राहू लागले, मात्र आजही ते प्रसारमाध्यमांपासून दूरच असतात.

आजही अजिताभ बच्चन झगमगाटापासून दूर, शांत आयुष्य जगतात. पण अमिताभ बच्चन आज जे काही आहेत, त्या प्रवासात अजिताभ यांचा मोलाचा वाटा होता, हे नाकारता येत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Dev Anands Son Suniel Anand: बॉलिवूडवर शोककळा! ज्या ठिकाणी देव आनंद यांचा मृत्यू, त्याच रुग्णालयात मुलाने घेतला अखेरचा श्वास, कारणही समोर
बॉलिवूडवर शोककळा! ज्या ठिकाणी देव आनंद यांचा मृत्यू, त्याच रुग्णालयात मुलाने घेतला अखेरचा श्वास, कारणही समोर
Kangana Ranaut Statement Gen Z: तरुणींना 'गटार छाप' म्हटल्यानंतर कंगना रणौतचं आणखी वादग्रस्त वक्तव्य, जेन झीच्या आई-वडिलांबाबत नेमकं काय म्हणाली?
तरुणींना 'गटार छाप' म्हटल्यानंतर कंगना रणौतचं आणखी वादग्रस्त वक्तव्य, जेन झीच्या आई-वडिलांबाबत नेमकं काय म्हणाली?
Bhetali Tu Punha Sequel: 'भेटली तू पुन्हा' लव स्टोरीच्या पुढची स्टोरी; वैभव तत्ववादी, पूजा सावंत पुन्हा एकत्र, कधी रिलीज होणार?
'भेटली तू पुन्हा' लव स्टोरीच्या पुढची स्टोरी; वैभव तत्ववादी, पूजा सावंत पुन्हा एकत्र, कधी रिलीज होणार?
'गटार छाप, आई-बापाच्या जीवावर ऐश, ड्रग्ज, दारू घेणाऱ्या, कित्येकांसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या...'; हिंदू तरुणींबाबत कंगना नको नको ते बरळली
'गटार छाप, आई-बापाच्या जीवावर ऐश, ड्रग्ज, दारू घेणाऱ्या, कित्येकांसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या...'; हिंदू तरुणींबाबत कंगना नको नको ते बरळली

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याचा दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याचा दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
RBI Gold Reserve: रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर; सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण
रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर
Priyanka Gandhi : लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
Embed widget