एक्स्प्लोर

'त्या' एका वादानंतर अमिताभ अन् अजिताभ बच्चन मतभेद टोकाला गेलेले, वडिलांच्या निधनानंतर सगळंच बदललं, काय घडलेलं?

अजिताभ अनेक कौटुंबिक कार्यक्रमांपासून दूर राहिले. अभिषेक-ऐश्वर्याच्या साखरपुड्यातही त्यांची उपस्थिती नव्हती.

Ajitabh bachchan: बच्चन कुटुंब म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते अमिताभ बच्चन यांचं भव्य व्यक्तिमत्त्व, जया बच्चन, अभिषेक, ऐश्वर्या आणि श्वेता. मात्र या झगमगाटामागे एक नाव असं आहे, ज्याबद्दल फार कमी चर्चा होते -ते म्हणजे अमिताभ बच्चन यांचे धाकटे भाऊ अजिताभ बच्चन.

हरिवंश राय बच्चन यांचे दोन पुत्र - अमिताभ आणि अजिताभ. अमिताभ जसे सिनेसृष्टीत सर्वोच्च स्थानी पोहोचले, तसे अजिताभ यांनी कायमच ग्लॅमरपासून अंतर ठेवलं. मात्र एक काळ असा होता, जेव्हा बिग बींच्या करिअरच्या पायाभरणीत अजिताभ यांचा मोठा वाटा होता.

अभिनयाच्या स्वप्नामागे भावाचा पाठिंबा

शिक्षण पूर्ण केल्यानंतर दोन्ही भाऊ कोलकात्यात नोकरी करत होते. त्याच काळात अमिताभ यांच्या मनात अभिनयाचं स्वप्न आकार घेत होतं. अजिताभ यांनी हे ओळखलं आणि भावाच्या स्वप्नाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. अमिताभ यांचे फोटो घेऊन ते निर्मात्यांकडे गेले. सुरुवातीला वारंवार नकार मिळाले, मात्र प्रयत्न सुरूच राहिले. अखेर अमिताभ यांना पहिली संधी मिळाली आणि त्यांच्या फिल्मी प्रवासाला सुरुवात झाली.


त्या' एका वादानंतर अमिताभ अन् अजिताभ बच्चन मतभेद टोकाला गेलेले, वडिलांच्या निधनानंतर सगळंच बदललं, काय घडलेलं?

अमिताभ यांचे ‘मॅनेजर’ होते अजिताभ

मुंबईत अमिताभ यांचा संघर्ष सुरू असताना अजिताभ कोलकात्यातच होते. अमिताभ यशाच्या शिखराकडे जाऊ लागल्यानंतर अजिताभ यांनी नोकरी सोडून मुंबई गाठली. ते अमिताभ यांचे मॅनेजर बनले. चित्रपटांची निवड, आर्थिक व्यवहार, भेटीगाठी - सगळं काही अजिताभच पाहत होते. त्या काळात अमिताभ यांना भेटायचं असेल, तर आधी अजिताभ यांची परवानगी घ्यावी लागायची.

व्यवसाय, राजकारण आणि वाढत गेलेले मतभेद

नंतर अमिताभ बच्चन राजकारणात सक्रिय झाले, तर अजिताभ परदेशात लंडनला व्यवसायासाठी गेले. या व्यवसायात अमिताभ यांची गुंतवणूक असल्याचंही बोललं जातं. अजिताभ आणि त्यांच्या पत्नी रमोलाने तिथे मोठ्या प्रमाणावर मालमत्ता खरेदी केली होती.

मात्र बोफोर्स प्रकरणात अमिताभ यांचं नाव आल्यानंतर त्याचे पडसाद अजिताभ यांच्या व्यवसायावरही उमटले. चौकशा, अफवा आणि दबावामुळे अजिताभ लंडनहून बेल्जियमला गेले. जरी नंतर दोघांनाही क्लीन चिट मिळाली, तरी या काळात भावांमधील अंतर वाढत गेलं.

वडिलांच्या निधनानंतर तुटले नातं

हरिवंश राय बच्चन जिवंत असताना दोन्ही भाऊ किमान औपचारिकरीत्या एकत्र दिसत होते. मात्र वडिलांच्या निधनानंतर हे नातं पूर्णपणे तुटल्याचं सांगितलं जातं. अजिताभ अनेक कौटुंबिक कार्यक्रमांपासून दूर राहिले. अभिषेक-ऐश्वर्याच्या साखरपुड्यातही त्यांची उपस्थिती नव्हती.


त्या' एका वादानंतर अमिताभ अन् अजिताभ बच्चन मतभेद टोकाला गेलेले, वडिलांच्या निधनानंतर सगळंच बदललं, काय घडलेलं?

वर्षांनंतर पुन्हा जवळ आले

2007 नंतर परिस्थिती बदलू लागली. अजिताभ आणि पत्नी रमोलाचा घटस्फोट झाला. त्यांच्या मुलींपैकी एक - नैना. हिच्या लग्नात अमिताभ आणि अजिताभ वर्षांनंतर एकत्र दिसले. पुढे 2012 च्या सुमारास संबंध सुधारल्याचं बोललं गेलं. अजिताभ पुन्हा ‘प्रतीक्षा’ बंगल्यात राहू लागले, मात्र आजही ते प्रसारमाध्यमांपासून दूरच असतात.

आजही अजिताभ बच्चन झगमगाटापासून दूर, शांत आयुष्य जगतात. पण अमिताभ बच्चन आज जे काही आहेत, त्या प्रवासात अजिताभ यांचा मोलाचा वाटा होता, हे नाकारता येत नाही.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Actor Rahul Arunoday Banerjee Dies: शुटिंगसाठी पाण्यात उतरला अन् आयुष्य गमावून बसला; लोकप्रिय अभिनेत्याचा समुद्रात बुडून मृत्यू
शुटिंगसाठी पाण्यात उतरला अन् आयुष्य गमावून बसला; लोकप्रिय अभिनेत्याचा समुद्रात बुडून मृत्यू
Sonam Kapoor Welcome Baby Boy: सुपरस्टारची लेक, 40व्या वर्षी दुसऱ्यांदा आई झाली 'ही' अभिनेत्री; गोंडस मुलाला दिला जन्म
सुपरस्टारची लेक, 40व्या वर्षी दुसऱ्यांदा आई झाली 'ही' अभिनेत्री; गोंडस मुलाला दिला जन्म
Anushka Sharma: Flying Kissच्या व्हिडीओनंतर अनुष्का शर्मा कपड्यांमुळे चर्चेत, किंमत ऐकून डोळे फिरतील
Flying Kissच्या व्हिडीओनंतर अनुष्का शर्मा कपड्यांमुळे चर्चेत, किंमत ऐकून डोळे फिरतील
Singer Arpit Bala: LIVE कॉन्सर्टमध्ये भयंकर घडलं; गायक ऑडियन्सवर थुंकला, बाटलीही फेकली, नेमकं काय घडलं?
LIVE कॉन्सर्टमध्ये भयंकर घडलं; गायक ऑडियन्सवर थुंकला, बाटलीही फेकली, नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
Ashok Kharat Police Custody | अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal Assembly Elections 2026: पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात काँग्रेसनं उमेदवार दिला
पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर,अधीर रंजन चौधरी विधानसभेच्या रिंगणात   
Houthi Rebels : कोण आहेत हुथी बंडखोर? इराण-इस्रायल युद्धात उतरले तर चित्र पालटण्याची क्षमता, ट्रम्प यांची डोकेदुखी वाढणार
कोण आहेत हुथी बंडखोर? इराण-इस्रायल युद्धात उतरले तर चित्र पालटण्याची क्षमता, ट्रम्प यांची डोकेदुखी वाढणार
US-Iran War : पर्शियाच्या आखातात याल तर परत जाणार नाही, इराणचा अमेरिकन सैन्याला इशारा
पर्शियाच्या आखातात याल तर परत जाणार नाही, इराणचा अमेरिकन सैन्याला इशारा
Mhada Lottery 2026 : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांसाठी सोडत जाहीर, मुंबईत घर घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांसाठी सोडत जाहीर, म्हाडाच्या घरांसाठी अर्ज कसा करायचा?
Kerosene : 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल पंपावर रॉकेल मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, परवानगी किती दिवसांसाठी?
21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल पंपावर रॉकेल मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय,परवानगी किती दिवसांसाठी?
Pope Leo on War: देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
Share Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं 4 दिवसात मोठं नुकसान, पावणे दोन लाख कोटी स्वाहा, रिलायन्सला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं 4 दिवसात मोठं नुकसान, पावणे दोन लाख कोटी स्वाहा, रिलायन्सला सर्वाधिक फटका
Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांना प्रश्न, देवेंद्र फडणवीस सुनेत्राताई पवार यांचं नाव घेत म्हणाले...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांना प्रश्न, देवेंद्र फडणवीस सुनेत्राताई पवार यांचं नाव घेत म्हणाले...
Embed widget