एक्स्प्लोर

Aamir Khan : "वडिलांना पाहून दु:ख व्हायचं"; आमिर खानला अश्रू अनावर, आठवणींना दिला उजाळा

Aamir Khan : आमिर खान आज यशस्वी अभिनेता असला तरी त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.

Aamir Khan : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान (Aamir Khan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आमिर आज आलिशान आयुष्य जगत असला तरी त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. 

आमिरने नुकतचं एका मुलाखतीत त्याला आयुष्यात कराव्या लागणाऱ्या संघर्षावर भाष्य केलं आहे. आमिरचे वडील ताहीर हुसैन हे सिने-निर्माते होते. त्यामुळे आमिर लहानपणापासूनच आलिशान आयुष्य जगत आला असल्याचा अनेकांचा समज आहे. 

नुकत्याच एका मुलाखतीत बालपणीच्या आठवणींना उजाळा देत आमिर म्हणाला,"माझ्या वयाच्या दहाव्या वर्षी आम्हाला आर्थिक चणचणीचा सामना करावा लागला होता. एका सिनेमाच्या निर्मितीसाठी वडिलांनी बॅंकेतून कर्ज घेतलं होतं. पण त्यानंतरही त्यांना त्या सिनेमाची निर्मिती करता आली नाही. तसेच ते कर्ज फेडण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली". 

आमिर पुढे म्हणाला,"जुन्या आठवणींना उजाळा देताना खूप त्रास होतो. माझे वडील खूप प्रामाणिक असल्याने त्यावेळी वडिलांना पाहून खूप दु:ख व्हायचं. खरतर त्यांनी कर्ज घेण्याची गरज नव्हती. त्याकाळी सिनेमांच्या तिकीटांची ब्लॅकने विक्री होत असे. त्यामुळे निर्मात्यांनादेखील जास्त पैसे मिळत नसे. वडिलांच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असली तरी त्यांना जास्त पैसे मिळालेले नाहीत. वडिलांची होणारी दगदग पाहून प्रचंड त्रास व्हायचा".

सिनेमाच्या निर्मितीसाठी वडिलांनी खूप लोकांकडून पैसै घेतले होते. त्यामुळे ती मंडळी सतत फोन करून वडिलांना त्रास देत असायची. ते वडिलांसोबत भांडत असताना मी काहीच करू शकलो नाही. कारण त्यावेळी माझ्याकडेदेखील पैसे नव्हते. पण वडिलांना मात्र निराश न होता मेहनत घेतली आणि त्या सर्व लोकांना त्यांचे पैसे परत दिले. 

आमिर खानने अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे. नुकताच त्याचा 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाची निर्मात्यांकडून खूप अपेक्षा होती. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही. आमिरचा आता पुढचा प्रोजेक्ट नक्की काय असेल हे अद्याप समोर आलेले नाही. 

संबंधित बातम्या

Aamir Khan : मुलीच्या साखरपुड्यात थिरकला आमिर; व्हिडीओला कमेंट करत नेटकरी म्हणाले, 'हा तर म्हातारा...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kunal Kamra Special Report : कामराची कॉमडी, प्रेक्षकांना समन्स; पोलीस नोंदवणार प्रेक्षकांचे जबाबSuresh Dhas Full PC : कृषी केंद्राची कंत्राट अप्रत्यक्षपणे कृषी अधिकाऱ्यांकडेच : सुरेश धसSpecial Report Sanjay Raut : मोदींची सप्टेंबरमध्ये निवृत्ती,राऊतांची भविष्यवाणी;भाजप जाळ्यात अडकणार?Anjali Damania On Rajendra Ghanwat : राजेंद्र घनवट यांनी बीडच्या शेतकऱ्यांना छळून त्रास दिला:दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
Embed widget