एक्स्प्लोर

फिरायला जाणं जीवावर बेतलं, सावत्र वडिलांनी बॉलिवूड अभिनेत्रीसह संपूर्ण कुटुंबाला संपवलं अन् खड्ड्यात पुरलं, 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

Tragic Story of Actress Laila Khan: अभिनेत्री लैला खानची निर्घृण हत्या झाली होती. सावत्र वडिलांनी संपूर्ण कुटुंबाला संपवल्याचा आरोप.

Actress Laila Khans Heartbreaking Story: बॉलिवूडमध्ये आपल्याला प्रसिद्धी मिळावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते.  नाव, पैसा कमावण्याचं स्वप्न उराशी घेऊन लाखो लोक मायानगरीत येतात.  काहींना यश मिळतं. काहींना अपयश पदरात घेऊन पुढे जावं लागतं.  ग्लॅमरची दुनिया जितकी हवीहवीशी वाटते, तितकंच पडद्यामागचं वास्तव खूप वेगळं असतं.  अशीच एका अभिनेत्रीच्या आयुष्यातील कथा खूप भयानक आहे. आपल्याच सावत्र वडिलांनी हत्या करून जमिनीत पुरलं.   ही ह्रदय पिळवटून टाकणारी घटना  लैला खान या अभिनेत्रीसोबत घडली. तब्बल 11 महिन्यांनंतर अभिनेत्रीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत  सापडला होता. इगतपूरी येथील त्यांच्या बंगल्यात मृतदेहाचे सांगाडे सापडले होते. सावत्र वडिलांनी संपूर्ण कुटुंबाला संपवलं होतं.

अभिनेत्री लैला खान वफा: अ डेडली लव्ह स्टोरीमध्ये दिसली होती.   या चित्रपटात राजेश खन्ना मुख्य भूमिकेत होते.   या चित्रपटात लैला खान आणि राजेश खन्ना यांचे अनेक इंटिमेट सीन्स होते.  लैला खानने या चित्रपटानंतर बी आणि सी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केलं.  तिनं मुनीर खान याच्यासोबत लग्नगाठ बांधली. 

नेमकं काय घडलं?

2011 साली खान परिवारी इगतपूरी येथे सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले होते.  याच दरम्यान, लैला पाटील आई सेलिना पटेल आणि चार भावंडांसह बेपत्ता झाली.  लैलाचे सावत्र वडील  परवेझ टाकने खान कुटुंबाची निर्घृण हत्या केली.  हत्येमागचं कारण परवेझला लैलाच्या आईचा पहिला पती शेख आवडत नव्हता. असंही म्हटलं जातं की, परवेझला लैलाचं सिनेमांमध्ये काम करणं आवडत नव्हतं.  

लैलाच्या कुटुंबाने दुबईला जाण्याचा निर्णय घेतला होता.   परवेझला एकटं वाटलं होतं. याच कारणास्तव लैला, तिची आई आणि लैलाच्या भावंडांना ठार केलं असल्याची माहिती एका वृत्तातून समोर आली. लैला आपल्या कुटुंबासह इगतपूरी येथे सुट्टीसाठी गेले होते.  इथेच सर्वांची हत्या करण्यात आली.  परवेझने त्यांची हत्या करून  मृतदेह खड्ड्यात पुरले.  यानंतर लैलाचे वडील आणि सेलिनाचे पहिले पती नादिर पटेल यांनी खान कुटुंबाची बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौकशी केली. तपासात संशयाची सुई परवेझकडे फिरली. जम्मू काश्मीर पोलिसांनी परवेझला अटक केली.  नंतर मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केलं.  

आरोपीनं पोलिसांना सांगितले की, घटनेच्या दिवशी परवेझचं लैलाच्या आईसोबत कडाक्याचे भांडण झाले होते.  शेखशी सेलिनाशी होणारी वाढती जवळीक आवडत नव्हती,   शेखचा कुटुंबाशी संपर्क टाकला आवडत नव्हतं, याच कारणास्तव सर्वांना ठार मारलं, असं त्यानं स्पष्ट केलं. सरकारी वकिलांनी टाकविरूद्ध  साक्षीदारांची चौकशी केली. तसेच कुजलेले मृतदेह ताब्यात घेतले.   दरम्यान, या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने आरोपी परवेझ टाकला फाशीची शिक्षा सुनावली. 2011 साली घडलेल्या या घटनेनंतर सिनेजगतात खळबळ उडाली होती.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Marathi Film Festival: मराठी सिने चाहत्यांसाठी गुडन्यूज! पुण्यात 3 दिवस रंगणार मराठी फिल्म फेस्टिव्हल, दिग्गज कलाकारांसह क्लासिक चित्रपटांची मेजवानी
मराठी सिने चाहत्यांसाठी गुडन्यूज! पुण्यात 3 दिवस रंगणार मराठी फिल्म फेस्टिव्हल, दिग्गज कलाकारांसह क्लासिक चित्रपटांची मेजवानी
Shehnaaz Gill Affair Roumers with RCB Player: शहनाझ गिलच्या अफेअरची चर्चा, विराट कोहलीच्या RCB मधील 'त्या' खेळाडूला करतेय डेट
शहनाझ गिलच्या अफेअरची चर्चा, विराट कोहलीच्या RCB मधील 'त्या' खेळाडूला करतेय डेट
Dhurandhar 2 OTT Release: प्रतीक्षा संपली! ‘धुरंधर 2’चं अनकट व्हर्जन OTT वर रिलीज? प्रेक्षकांना मिळणार डबल धमाका
प्रतीक्षा संपली! ‘धुरंधर 2’चं अनकट व्हर्जन OTT वर रिलीज? प्रेक्षकांना मिळणार डबल धमाका
संजय दत्तला झटका; राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आधारित 'आखरी सवाल ' चित्रपटावर रिलीजपूर्वीच 'UAE'त बंदी! नेमकं कारण काय?
संजय दत्तला झटका; राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आधारित 'आखरी सवाल ' चित्रपटावर रिलीजपूर्वीच 'UAE'त बंदी! नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Embed widget