एक्स्प्लोर

Y श्रेणीच्या सुरक्षेबाबत सनी देओल यांचा मोठा खुलासा

बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर राजकीय वर्तुळात आलेल्या सनी देओल यांना शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाय दर्याची सुरक्षा देण्यात आल्याचं म्हटलं गेलं होतं. मागील काही दिवसांपासून याबाबतच्या बऱ्याच चर्चाही झाल्या. पण....

नवी दिल्ली : अभिनेता आणि भाजप नेता अशी ओळख असणाऱ्या सनी देओल (sunny deol ) यांना (Y) श्रेणीची सुरक्षा पुरवण्यात आल्याची माहिती नुकतीच उघड झाली. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचललं गेल्याचं म्हटलं गेलं. शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर देओल यांना ही सुरक्षा पुरवण्यात आली असं म्हटलं गेलं. पण, आता खुद्द सनी देओल यांनीच याबाबतचा मोठा खुलासा केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्विट करत त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखित केल्या आहेत.

आपल्याला वाय दर्याची सुरक्षा ही जुलै महिन्यातच मिळाली होती. त्याचा देशात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाशी काहीही संबंध नाही असं त्यानं स्पष्ट केलं. ‘कालपासूनच काही माध्यमांनी चुकीचं वृत्त दिलं आहे की, मला (Y) श्रेणीतील सुरक्षा देण्यात आली. मुळात मला जुलै महिन्यातच ही सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. या सुरक्षाव्य़वस्थेला देशात सध्याच्या घडीला सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाशी जोडलं जात आहे जे अगदी चुकीचं आहे’, असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं.

माध्यमांवर नाराजी व्यक्त करत देओल यांनी माहितीची पडताळणी करण्याचा सल्ला दिल्याचं पाहायला मिळालं. ‘मी माध्यमांमध्ये असणाऱ्या माझ्या काही सहकाऱ्यांना विनंती करु इच्छितो की, कोणतंही वृत्त प्रसिद्ध करण्यापूर्वी त्याविषयीच्या माहितीची पडताळणी करा’, असा सूर त्यांनी आळवला. यापूर्वी मिळालेल्या माहितीनुसार किम थ्रेट परसेप्शनमुळं गृहमंत्रालयानं सनी देओल यांना Y श्रेणीची सुरक्षा दिली असून, याअंतर्गत त्यांच्यासोबत 11 जवान आणि 2 पीएसओ असणार असं म्हटलं गेलं होतं.

शेतकऱ्यांसमवेत सनी देओल

सनी देओल यांनी हल्लीच सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट करत सरकार शेतकऱ्यांसमवेत असल्याचं म्हटलं होतं. ‘मी साऱ्या जगाला सांगू इच्छितो की, ही आमचे शेतकरी आणि सरकार यांच्यातील बाब आहे. यामध्ये तुम्ही पडू नका. चर्चेनंतर दोन्ही पक्षांकडून या वादावर तोडगा नक्कीच निघेल. मला ठाऊक आहे की, अनेकजण यातून आपला फायदा साधू पाहत आहेत. इतकंच नव्हे तर ते काही अडचणीही उभ्या करत आहेत. पण, या व्यक्ती शेतकऱ्यांबाबत विचार करत नाहीयेत. त्यांचा एक वेगळाच मनसुबा आहे’, असं ट्विट त्यांनी केलं होतं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Siddharth Kharat : तुम्हाला सभागृहाची शिस्त माहिती नाही,फडणवीस चिडले
Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Prithviraj Chavan on PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Devendra Fadnavis: आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Embed widget