एक्स्प्लोर

Amitabh Bachchan Love Story: जया, रेखा साऱ्या नंतर, बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी बिग बींचं 'या' तरुणीसोबत जुळलेलं सूत, लग्नाच्या आणाभाका घेऊनही अधुरीच राहिली लव्हस्टोरी...

Amitabh Bachchan Love Story: सेलिब्रिटींचे किस्से लिहिणारे हनीफ झवेरी यांनी अलीकडेच एका मुलाखतीत बोलताना अमिताभ बच्चन यांच्या कुणालाही माहीत नसलेल्या लव्ह स्टोरीचा खुलासा केला आहे.

Amitabh Bachchan Love Story: बॉलिवूडच्या (Bollywood News) काही गाजलेल्या लव्हस्टोरीबाबत (Amitabh Bacchan Love Story) चर्चा सुरू झाली की, अमिताभ (Amitabh Bachchan) आणि रेखा (Rekha) या जोडीचं नाव येतंच येतं. अमिताभ आणि रेखा यांच्या अधुऱ्या कहाणीबाबतचे अनेक किस्से आपल्याला माहितीयत. तसेच,  अमिताभ बच्चन आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्या लग्नालाही 50 वर्षांहून जास्त वर्ष झालीत. 1971 मध्ये आलेल्या 'गुड्डी' चित्रपटाच्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली होती, नंतर दोघांनी सातजन्माची गाठ बांधली. पण, तुम्हाला माहितीय का? रेखा, जया यांच्याआधीही अमिताभ बच्चन यांच्या आयु्ष्यात एक तरुणी होती. 

सेलिब्रिटींचे किस्से लिहिणारे हनीफ झवेरी यांनी अलीकडेच एका मुलाखतीत बोलताना अमिताभ बच्चन यांच्या कुणालाही माहीत नसलेल्या लव्ह स्टोरीचा खुलासा केला आहे. अमिताभ बच्चन आणि त्यांच्या पहिल्या प्रेमाची आणि त्यानंतर झालेल्या ब्रेकअपची कहाणी सांगितली आहे. अमिताभ बच्चन मुंबईत येण्यापूर्वीच दोघांचं सूत जुळलं होतं, पण, बिग बींचा पहिला सिनेमा 'सात हिंदुस्तानी' प्रदर्शित होण्यापूर्वीच ब्रेकअप झालं. 

'मेरी सहेली' या युट्यूब चॅनलना दिलेल्या मुलाखतीत बोलताना हनीफ झवेरी यांनी सांगितलं की, "माया नावाच्या महिलेसोबत अमिताभ यांचं सूत जुळलं होतं. त्यावेळी बिग बी कोलकातामध्ये राहायचे आणि तिथे काम करत असताना ते दरमहा तब्बल 250-300 रुपये प्रति महिना कमवायचे. हनीफ यांनी सांगितलं की, त्यावेळी ती ब्रिटिश एअरवेजमध्ये काम करायची. अमिताभ बच्चन यांचा तिच्यावर फार जीव होता आणि तीसुद्धा बिग बींच्या आकंठ प्रेमात बुडालेली..."

अमिताभ बच्चन यांची पहिली गर्लफ्रेंड कोण? 

हनीफ झवेरी यांनी पुढे बोलताना सांगितलं की, कोलकात्यातील नोकरीनंतर अमिताभ बच्चन चित्रपटांमध्ये कामाच्या शोधात मुंबईत आले आणि सुरुवातीला जुहू इथल्या एका बंगल्यात राहत होते, जो त्याच्या आई तेजी बच्चनच्या एका मित्राचा होता. माया अनेकदा तिथे त्यांना भेटायला यायची. त्याच बंगल्यात अमिताभ बच्चन यांच्या आईचा मित्रही राहायचा, त्यामुळे बिग बींना माया सोबतच्या त्यांच्या रिलेशनबाबत त्यांच्या आईला कळेल, याची भिती वाटायची. म्हणून त्यांनी तो बंगला सोडण्याचा निर्णय घेतला.

बिंग बींनी घर बदलून टाकलं... 

ज्यावेळी अमिताभ बच्चन यांनी घर बदलण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी ते त्यांचा पहिला सिनेमा 'सात हिंदुस्तानी'वर काम करत होते. त्यावेळी ते मेहमूद यांचा भाऊ अन्वर अलीसोबत काम करत होते. त्यांनी त्यांच्या सर्व व्यथा, चिंता अन्वरला सांगितल्या, त्यानं ते समजून घेऊन स्वतःच्या घरात राहण्यासाठी जागा दिली. अन्वरने मेहमूदकडून एक अपार्टमेंट घेतले होते आणि अमिताभ काही काळ या घरात राहत होते, असं हनीफ झवेरी यांनी सांगितलं. 

एकदा सर्वांसमोर मायानं बिग बींना सुनावलेलं

हनीफ झवेरी यांनी सांगितलं की, बिग बी आणि माया काही काळ एकत्र राहिले असते, तर पुढे कदाचित दोघांचं लग्न झालं असतं, पण त्यावेळी अमिताभ यांची कारकीर्द स्थिर नव्हती. त्या काळात अमिताभ खूप लाजाळू व्यक्ती होते आणि माया खूप हुशार, चुनचुनीत होती. कधीकधी तर बिग बींसोबत कुणी आहे, याचंही भान तिला राहायचं नाही, ती तिला वाट्टेल तसं बिग बींसोबत बोलायची, त्यांना उलट-सुलट बोलायची. अन्वर अली आणि अमिताभ यांच्या इतर मित्रांना हे अजिबात आवडायचं नाही. 

...अन् एक दिवस अमिताभ-मायाचं ब्रेकअप 

हनीफ झवेरी यांनी पुढे बोलताना सांगितलं की, जेव्हा अमिताभ गोव्यात 'सात हिंदुस्थानी' सिनेमाची शुटिंग करत होते, त्यावेळी अमिताभ बच्चन यांना त्यांनी मायासोबतचं नातं तोडायला सांगितलं होतं. त्यांना वाटायचं की, माया बच्चन कुटुंबात फिट बसणार नाही आणि जर अमिताभ फिल्म्समध्ये पुढे जात होते, त्यामुळे मायामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या असत्या. अखेर एक दिवस अमिताभ बच्चन आणि माया यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि दोघांचा ब्रेकअप झाला. " दरम्यान, अमिताभ बच्चन यांचा पहिला सिनेमा 1969 मध्ये रिलीज करण्यात आला. त्यांनी 1973 मध्ये जया बच्चन यांच्याशी लग्नगाठ बांधली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Director Reacts On Priyanka Chopra Akshay Kumars Affair: 'विवाहित पुरूषांनी जरा जास्तच...'; अक्षय कुमार, प्रियांका चोप्राच्या अफेअरच्या चर्चांवर काय म्हणाला दिग्गज दिग्दर्शक?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget