एक्स्प्लोर

Anand Sagar Passed Away: बॉलिवूडवर शोककळा! 'रामायण’चे निर्माते रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन; गेली 15 वर्षे ‘या’ आजाराशी झुंज

‘रामायण’ ही अशी मालिका आहे जी 39 वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. ही मालिका घराघरात पोहोचवण्यात रामानंद सागर यांच्यासह त्यांच्या कुटुंबाचे मोठे योगदान होते.

Anand Ramanand Sagar Death: दूरदर्शनवरील ऐतिहासिक मालिका 'रामायण'चे निर्माते रामानंद सागर यांचे सुपुत्र आनंद रामानंद सागर चोप्रा ( Anand Ramanand Sagar) यांचे निधन झाले आहे. 13 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबईत त्यांनी वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चित्रपट आणि दूरदर्शन विश्वात शोककळा पसरली आहे. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी सागर घराण्याची परंपरा समर्थपणे पुढे नेली होती. 

मुंबईत पार पडले अंत्यसंस्कार

आनंद सागर यांचे निधन मुंबईत झाले. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईतील परमहंस स्मशान घाट येथे सायंकाळी 4.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही दुःखद बातमी जाहीर केली. पोस्टमध्ये त्यांच्या छायाचित्रासह “आमचे प्रिय वडील आनंद रामानंद सागर चोप्रा यांच्या निधनाची दुःखद माहिती देत आहोत,” असे नमूद करण्यात आले.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Deepak Yadav (@deepakyadav___)

‘या’ आजाराशी होती झुंज

आनंद सागर गेल्या सुमारे 15 वर्षांपासून पार्किन्सनसारख्या गंभीर न्यूरोलॉजिकल आजाराशी झुंज देत होते. अखेर दीर्घ आजाराशी झुंज अपयशी ठरली. सागर कुटुंबाने निवेदन जारी करत म्हटले, “अत्यंत दुःखाने सागर परिवार प्रिय आनंद रामानंद सागर यांच्या निधनाची माहिती देत आहे. आज (13 फेब्रुवारी) त्यांचे निधन झाले. ते ‘सागर आर्ट्स’च्या दुसऱ्या पिढीच्या व्यवस्थापनाचा भाग होते. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. ओम शांती.”

‘रामायण’मध्येही महत्त्वाचे योगदान

आनंद सागर यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या कामात सक्रिय सहभाग घेतला होता. 1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या रामायण मालिकेत त्यांनी सह-निर्माता म्हणून काम पाहिले. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी पौराणिक आणि भक्तिपर प्रकल्पांच्या निर्मिती, सर्जनशील देखरेख आणि व्यवस्थापनाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली.

वडिलांची परंपरा अशी नेली पुढे

पाच भावंडांपैकी आनंद सागर यांनी सागर कुटुंबाची परंपरा जपण्याची जबाबदारी उचलली. अलिफ लैला, जय जय बजरंगबली आणि जय शिव शंकर यांसारख्या मालिकांची निर्मिती त्यांनी केली. तसेच ‘आंखें’ आणि ‘अरमान’सारख्या चित्रपटांच्या निर्मितीतही त्यांचा सहभाग होता. रामायण ही मालिका प्रत्येक भारतीयाच्या घरात पोहोचलेली मालिका होती. कोरोना लॉकडाउनदरम्यान कुटुंबासह रामायणचे पुनःप्रसारण करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. या पुनर्प्रसारणालाही प्रेक्षकांनी विक्रमी प्रतिसाद दिला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
Kala Hiran The Battle for Legacy: हरणाला गोळी... सलमान खानमुळे वादाच्या कचाट्यात सापडलेला 'काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी'चा टीझर रिलीज
हरणाला गोळी... सलमान खानमुळे वादाच्या कचाट्यात सापडलेला 'काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी'चा टीझर रिलीज
Kiran Rao Supports Sonam Wangchuk: आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं
आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं
Adinath Kothare And Urmila Kanetkar Net Worth: आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने 15 वर्षांचं नातं संपवलं, नक्की कारण काय? जाणून घ्या दोघांकडे संपत्ती किती?
आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने 15 वर्षांचं नातं संपवलं, नक्की कारण काय? जाणून घ्या दोघांकडे संपत्ती किती?

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget