एक्स्प्लोर

अक्षय कुमार अन् राणी मुखर्जी पहिल्यांदाच एकत्र; बहुप्रतिक्षित चित्रपटात झळकणार प्रमुख भूमिकेत

Akshay Kumar Returns with Rani Mukerji for the First Time Together: 'ओह माय गॉड' चित्रपटाच्या तिसऱ्या भागात अक्षय कुमार आणि राणी मुखर्जी एकत्र दिसणार आहे. दोघेही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

Akshay Kumar Returns with Rani Mukerji: 2026मध्ये अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) विविध चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तो 3 सिक्वेल चित्रपटांमध्ये दिसणार आहे. 'जॉली एलएलबी', 'हाऊसफुल 5' आणि 'केसरी चॅप्टर 5' या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तो 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटातूनही प्रेक्षकांना खळखळून हसवण्यास सज्ज झाला आहे. आता अक्षयच्या आणखी एका नव्या चित्रपटाबद्दल माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट देखील एक सिक्वेल चित्रपट आहे. 'ओह माय गॉड ३' या सिनेमात तो प्रमुख भूमिका साकारणार आहे. आतापर्यंत या चित्रपटाचे दोन भाग प्रदर्शित झाले आहेत. अक्षय कुमार दोन्ही चित्रपटांमध्ये झळकला होता. दरम्यान, तो तिसर्‍या भागातही दिसणार आहे. या चित्रपटातील तिसर्‍या भागात मुख्य भूमिकेत अभिनेत्री राणी मुखर्जी दिसणार असल्याची माहिती आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

निर्मात्यांनी या चित्रपटात अक्षय कुमारसोबत राणी मुखर्जीला कास्ट करण्यात आले आहे. पिंकव्हिलाच्या एका वृत्तानुसार, अमित राय यांनी 'ओह माय गॉड' या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. मागील दोन्ही भागांच्या तुलनेत तिसरा सिक्वेल हा भव्य दिव्य, अधिक संबंधित आणि हार्ड हिटिंग ठरेल, असा विश्वास फिल्ममेकर्सने व्यक्त केला. दरम्यान, मागील दोन भागांच्या यशानंतर अक्षय पुन्हा या फ्रँचायझीमध्ये सामील झाला आहे. 'ओह माय गॉड 3' या तिसऱ्या पार्टमध्ये अक्षय कुमारला पुन्हा झळकणार आहे. या चित्रपटात त्याला राणीचीही साथ असणार आहे. दोघांची जोडी पहिल्यांदाच रूपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सध्या या चित्रपटाचे प्री - प्रॉडक्शन सुरू झाले आहे. नंतर चित्रपटाचे शुटिंग करण्यात सुरू होईल. परंतु, निर्मात्यांकडून या चित्रपटाबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अधिकृत घोषणा होताच या चित्रपटाव शिक्कामोर्तब करण्यात येईल. 'ओह माय गॉड' या चित्रपटाचा पहिला भाग उमेश शुक्ला यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाचा दुसरा भाग अमित राय यांनी दिग्दर्शित केला होता. आता तिसऱ्या सिक्वेलचं दिग्दर्शनही अमित राय करणार असल्याची माहिती आहे.

'ओह माय गॉड' चा पहिला भाग 2012मध्ये प्रदर्शित झाला होता. 20 कोटी रूपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात 149.90 कोटी रूपयांची कमाई केली होती. 'ओह माय गॉड'च्या दुसऱ्या भागाने 221.57 कोटी रूपयांची कमाई केली होती. या चित्रपटाचे बजेट 60 कोटी रूपये होते. दरम्यान, तिसरा भाग बॉक्स ऑफिसवर कसा कामगिरी करेल? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Superstar Madhuri Dixit Life Story: दूरदर्शननं नाकारलं, पहिला सिनेमाही ठरला सुपरफ्लॉप; पण तरीही 'ती' बनली बॉलिवूडची 'लेडी सुपरस्टार'; ओळखलं का कोण?
दूरदर्शननं नाकारलं, पहिला सिनेमाही ठरला सुपरफ्लॉप; पण तरीही 'ती' बनली बॉलिवूडची 'लेडी सुपरस्टार'; ओळखलं का कोण?
Aamir Khan Confirm His Wedding With Gauri Spratt: 'होय, खरंय... आम्ही लग्न करतोय!'; आमिर खाननं कन्फर्म केली तिसऱ्या लग्नाची गूड न्यूज, तारीखही सांगून टाकली
'होय, खरंय... आम्ही लग्न करतोय!'; आमिर खाननं कन्फर्म केली तिसऱ्या लग्नाची गूड न्यूज, तारीखही सांगून टाकली
Kangana Ranaut Praises Marathi Actresses: 'महाराष्ट्रात राहून मला 20 वर्ष झाली, पण...'; मराठी रंगभूमीबाबत सर्वांदेखत कंगना रनौत नेमकं काय म्हणाली?
'महाराष्ट्रात राहून मला 20 वर्ष झाली, पण...'; मराठी रंगभूमीबाबत सर्वांदेखत कंगना रनौत नेमकं काय म्हणाली?
Sanjay Jadhav on Sukanya MOne: 'तू स्वतःला काय समजतोस! 'आभाळमाया' च्या सेटवर सुकन्या मोनेंनी संजय जाधवांना झाप झापलेलं; म्हणाल्या, ' तू कोणालाच इथे नकोयस, पण ..
'तू स्वतःला काय समजतोस! 'आभाळमाया' च्या सेटवर सुकन्या मोनेंनी संजय जाधवांना झाप झापलेलं; म्हणाल्या, ' तू कोणालाच इथे नकोयस, पण ..

व्हिडीओ

Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Munde News: जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
Embed widget