एक्स्प्लोर

Actor Digamber Naik Reveals Removed From Lakshya Serial: 'रात्री पावणे बारा वाजता मला 'ज्या' मालिकेतून काढलं ती आदेश बांदेकरांचीच...'; मराठी अभिनेत्यानं सांगितला इंडस्ट्रीतला 'तो' धक्कादायक अनुभव

Actor Digamber Naik Reveals Removed From Lakshya Serial: एका मालिकेत भूमिका मिळालेली, त्यासाठी तयारीही केलेली, पण अचानक रात्री पावणे बारा वाजता त्या मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचा धक्कादायक अनुभव अभिनेत्यानं शेअर केलाय. 

Actor Digamber Naik Reveals Removed From Lakshya Serial: आयुष्यात स्ट्रगल सर्वांच्याच वाट्याला येतो, मग ते कुणीही असो. कोणत्याही गोष्टीत स्ट्रगल केल्याशिवाय आपण ध्येयापर्यंत पोहोचत नाही. हा फक्त काहींची वाट फारच खडतर असते, तर काहींची तुलनेनं खूप सोपी असते. सेलिब्रिटींच्या (Marathi Celebrity) वाट्याला स्ट्रगल आहेच. अशाच एका मराठीतल्या स्टार अभिनेत्यानं (Marathi Actor) त्याच्या आयुष्यातल्या खडतर प्रवासाबाबत एका मुलाखतीत बोलताना स्पष्ट केलंय. एका मालिकेत भूमिका मिळालेली, त्यासाठी तयारीही केलेली, पण अचानक रात्री पावणे बारा वाजता त्या मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचा धक्कादायक अनुभव अभिनेत्यानं शेअर केलाय. 

मराठी मालिका (Marathi Serial) आणि सिनेमांमधून (Marathi Movie) प्रेक्षकांना खळखळून हसवणारं नाव म्हणजे, दिगंबर नाईक (Actor Digamber Naik). 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) मध्येही ते दिसलेले. मालवणच्या मातीतून आलेल्या अभिनेत्यानं अनेक मराठी नाटकं (Marathi Theatre Play), मालिका (Television Serial) आणि सिनेमांमध्ये काम केलंय. नुकत्याच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अभिनेत्यानं त्याच्या आयुष्यातल्या स्ट्रगलबाबत सांगितलंय. 

अभिनेते दिगंबर नाईक काय म्हणाले? (Digamber Naik On Aadesh Bandekar)

अभिनेते दिगंबर नाईक म्हणालेले की, "एका शोमधून मला रात्री पावणे बारा वाजता काढून टाकलेलं. त्यात हवालदाराची भूमिका साकारायची होती. मी त्या भूमिकेसाठी केसही कापलेले. सगळी तयारी केलेली... अभिनेता म्हणून आपण शिकतच असतो. मी करतो तेच समोरचा करू शकेल असं नाही आणि तो जे करतो, ते मी करूच शकत नाही असंही नाही. एखाद्या मालिकेत घेतलं नाही तर निर्माता सांगतो, चॅनेल नको म्हणालं आणि चॅनेलला विचारल्यानंतर ते सांगतात निर्माते ऐकत नाहीत... याची तर मला आता सवयच झालीय..."

सिनेसृष्टीत आलेल्या धक्कादायक अनुभवाबाबत बोलताना अभिनेता म्हणाला की, "पाच-सात दिवसांनी मला कळलं की, माझ्या जागी कुणीतरी दुसरा काम करतोय. त्याचं मला वाईट वाटलं, 'लक्ष्य' नावाची मालिका होती ती. त्यात मी हवालदाराच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिलेली. 'फू बाई फू'नंतर सेलिब्रिटी असूनही माझा संघर्ष संपलेला नव्हता. मला 'लक्ष्य'मधून काढलं याचं कारण त्यांचं म्हणणं होतं तो 'फू बाई फू' करतो, कॉमेडी करतो. मग तो इकडे वारकरी असलेल्या हवालदाराची भूमिका कसा करेल? मला गरज असताना ती भूमिका मिळाली नव्हती, म्हणून वाईट वाटलं, पण हरकत नाही, असं होत राहतं..."

"मालवणी माणसालाच मालवणी माणूस नको असतो..." : दिगंबर नाईक (Digamber Naik On Lakshya Serial)

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना दिगंबर नाईक यांना त्यांच्या मालवणी भाषेमुळे पहिला सन्मान कधी मिळाला, असं विचारलं. त्यावर बोलताना दिगंबर नाईक म्हणाले की, "माझ्या कोकणातल्या प्रेक्षकांना वाईट वाटेल, पण मालवणी अभिनेता म्हणून माझा सन्मान असा झालाच नाही. म्हणजे मी 'फू बाई फू' शो करत होतो, तेव्हा तिथे राकेश सारंग होते, ते कोकणातले होते, परीक्षक निर्मिती सावंतसुद्धा कोकणातल्याच, पण त्यांच्यापेक्षा जास्त कौतुक माझं स्वप्नील जोशीनं केलेलं. वाईट वाटेल... पण मी स्पष्टवादी आहे. मला हे बोलताना काही फरक पडत नाही. मला आता 'वस्त्रहरण' नाटक केल्यानंतरच प्रेक्षकांनी मालवणी अभिनेता म्हणून स्वीकारलंय. मालवणी निर्मात्याला किंवा मालवणी माणसालाच मालवणी माणूस नको असतो. नाहीतरी मी कायम कामात व्यग्र राहिलो असतो. आता ज्या मालिका सुरू आहेत, त्याचे निमति मालवणीच आहेत. जर त्या मालवणी माणसाला अभिमान वाटला असता, तर हा मालवणी (दिगंबर नाईक) घरी बसलाच नसता. अभिमानहीं जाऊदे, आत्मीयता जरी वाटली असती, तरी चाललं असतं."

मुलाखतीत बोलताना दिगंबर नाईकांनी 'लक्ष्य' मालिका आणि त्या मालिकेचे निर्माते आदेश बांदेकरांवरही भाष्य केलं. ते म्हणाले की, "आदेश बांदेकर मालवणीच आहे ना... माझा मित्रच आहे तो, रात्री पावणे बारा वाजता मला ज्या मालिकेतून काढलं ती 'लक्ष्य' मालिका त्याचीच होती. तेव्हा चॅनेल हेड श्रावणी देवधर होत्या. त्यांचं मत असं होतं की, हा कॉमेडी करतो, हा गंभीर भूमिका कशी करेल? अर्थात त्यांचं हे मत असू शकतं... पण तेव्हा आदेश बांदेकरांना असं वाटलं नाही का? की हा मालवणी मुलगा आहे आणि मीसुद्धा मालवणी आहे. चला माझ्या मालिकेत याला घेऊया. आता मालवणी मालिकेतच मालवणी लोक नको असतात..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

लग्नाच्या चारच महिन्यांत सूरज चव्हाणच्या घरी पाळणा हलणार? बायकोनं बेबी बंपसह शेअर केला फोटो

महत्त्वाच्या बातम्या

5 मराठी चित्रपटांचे होणार वर्ल्ड प्रीमिअर! अमेरिकेतील NAFA फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी सिनेमाची जागतिक भरारी
5 मराठी चित्रपटांचे होणार वर्ल्ड प्रीमिअर! अमेरिकेतील NAFA फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी सिनेमाची जागतिक भरारी
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
'अल्फा' फेम शर्वरी वाघची ही वेबसीरिज पाहिलीत का? 5 एपिसोडची सिरीज पुन्हा चर्चेत; कुठे पहाल?
'अल्फा' फेम शर्वरी वाघची ही वेबसीरिज पाहिलीत का? 5 एपिसोडची सिरीज पुन्हा चर्चेत; कुठे पहाल?
इंद्रजाल'वरून वाद पेटला; प्रदर्शनाआधी गदारोळ होताच दिग्दर्शकांनीच सोडलं मौन, म्हणाले...
इंद्रजाल'वरून वाद पेटला; प्रदर्शनाआधी गदारोळ होताच दिग्दर्शकांनीच सोडलं मौन, म्हणाले...

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget