एक्स्प्लोर
Advertisement
UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)
दोन कोटी रोजगार आणि महिला सुरक्षेच्या आश्वासनांचं काय झालं? प्रियांका गांधींचा नरेंद्र मोदींना सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकांपूर्वी खूप मोठी आश्वासने दिली होती. त्यापैकी दोन कोटी रोजगार आणि महिला सुरक्षेचे काय झाले, असा सवाल काँग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी उपस्थित केला आहे.
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकांपूर्वी खूप मोठी आश्वासने दिली होती. त्यापैकी दोन कोटी रोजगार आणि महिला सुरक्षेचे काय झाले, असा सवाल काँग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी उपस्थित केला आहे. आज (मंगळवारी) पहिल्यांदाच प्रियांका काँग्रेस कार्यकर्त्यांना सामोऱ्या गेल्या. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालेकिल्ल्यात (गुजरातमध्ये) भाषण केले.
आज गुजरातमधील गांधीनगर येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर गांधीनगरध्येच आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप मोठी आश्वासने दिली होती. त्यापैकी दोन कोटी रोजगार आणि महिला सुरक्षेचे काय झाले? असा प्रश्न आपण मोदींना विचारला पाहिजे. तसेच आपण मतदारांनी बिनधास्त बोलून, सरकारला प्रश्न विचारायला हवेत," असे आवाहनही त्यांनी केले.
"पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी देशभरात भावनिक मुद्द्यांवर राजकारण करण्यापेक्षा देशाच्या विकासावर चर्चा करावी," असे आव्हान काँग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केले आहे.
प्रियांका म्हणाल्या की, "हा देश महात्मा गांधी यांच्या विचारांनी ओळखला जातो. परंतु आज या देशात जे काही घडत आहे ते अत्यंत वाईट आहे." दरम्यान प्रियांका यांनी जनतेला आवाहन केले आहे की, "तुमचं एक मत तुम्हाला आणि देशाला मजबूत करणार आहे, त्यामुळे मतदान करा. त्याबरोबर विकासाच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना प्रश्नदेखील विचारा"
Priyanka Gandhi Vadra, Congress in Gandhinagar, Gujarat: This country is made on the foundations of love, harmony & brotherhood. Today whatever is happening in the country is very sad. pic.twitter.com/ylBwJro0h9
— ANI (@ANI) March 12, 2019
Priyanka Gandhi Vadra, Congress in Gandhinagar, Gujarat: You will have to think what exactly is this election. What are you going to choose in this election? You are going to choose your future. Useless issues should not be raised. pic.twitter.com/xnN1CHZh6U
— ANI (@ANI) March 12, 2019
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
मुंबई
Advertisement