एक्स्प्लोर

UP Assembly Election 2022 : यूपीमध्ये मतदानाचा शेवटचा टप्पा, योगींसह अखिलेश यादव यांनी केला 300 जागांवर दावा

आज पाच राज्यांच्या निवडणुकांचा शेवटचा दिवस आहे. कारण यूपीमध्ये शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ आणि अखिलेश यादव या दोघांनीही विजयाचे दावे केले आहेत.

UP Assembly Election 2022 : उत्तर प्रदेशमध्ये आज शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. शेवटच्या टप्प्यातील 54 जागांसाठी मतदान होत आहे. यासाठी 613 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पाच राज्यांच्या निवडणुकांचा आज शेवटचा दिवस आहे. पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या चार राज्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी विजयाचे दावे केले आहेत. दोघांनीही 300 च्या पुढे जागांवर विजयाचे दावे केले आहेत.


 पुन्हा 300 च्या वर जागा जिंकू : योगी आदित्यनाथ
 
यूपीमध्ये भाजप प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करणार असल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. पुन्हा एकदा 300 वर जागा जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. भाजपच्या डबल इंजिन सरकारने प्रत्येक क्षेत्राकडे लक्ष दिले आहे. गोरखपूरमध्ये एम्स आली आहे. प्रत्येक घरात पिण्याचे पाणी देण्याचे आश्वासन आम्ही पूर्ण केले आहे.

यूपीमध्ये सुरक्षिततेचे उत्तम वातावरण आहे. गरिबांची सुरक्षा आणि कल्याण आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. समाजवादी पक्षाचे दहशतवादी कनेक्शन नाकारता येत नाही. सपा सरकारने दहशतवादी घटनांशी संबंधित लोकांवरील खटले मागे घेतले. या सगळ्यावर अखिलेश मौन बाळगून आहेत. अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटातील दहशतवाद्याच्या कुटुंबीयांचे समाजवादी पार्टीशी संबंध आहेत. आपले अपयश लपवण्यासाठी समाजवादी पक्ष आरोप करत असल्याचे योगी म्हणाले. काँग्रेस, बसपा आणि सपाच्या लोकांनी जनतेची माफी मागावी, जे यूपीमध्ये तरुणांना मेडिकल कॉलेज देऊ शकले नाहीत. त्यामुळे तरुणांना युक्रेनसारख्या देशात शिक्षणासाठी जावे लागले. आमच्या सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या 1 हजार 400 मुलांना परत आणल्याचे योगी यावेळी म्हणाले.

माझी रोजची दिनचर्या 4 वाजता सुरू होते. पूजा, साधना आणि उपासनेनंतर 7 ते 8 वाजेपर्यंत राष्ट्र आराधना असते. जे लोक दुपारी 12 वाजता उठतात त्यांना ना समस्या सोडवता येतात ना त्यांना समस्यांची कल्पना असते. भाजपला सर्वत्र बहुमत मिळत असल्याचा दावा सीएम योगी यांनी केला आहे.

भाजप सरकारमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडली : अखिलेश यादव

पहिल्या टप्प्यापासूनच ही निवडणूक जनतेची निवडणूक बनली आहे. कारण जनता भाजप सरकारवर नाराज होती. पहिल्या टप्प्यापासून तरुण-तरुणी समाजवादी पार्टीसोबत आले असल्याचे अखिलेश यादव म्हणाले. भाजप सरकार आकडे लपवत आहे. हे सरकार ऐकायला तयार नाही. भाजप सरकारमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडली होती. भाजपमध्ये कलंकांची कमतरता नसल्याचे ते म्हणाले. लोकांनी भाजपच्या फंदात पडू नये, असे अखिलेश यादव म्हणाले.

ज्यांचे कुटुंब आहे, त्यांना कुटुंबातील सदस्यांचे दु:ख समजते असे अखिलेश यादव म्हणाले. यावेळी जनतेने त्यांना यूपीतून हटवल्याचा मला आनंद आहे. भाजप इतर पक्षाचे नेते फोडून निवडणुका लढवते, तोच फॉर्म्युला आम्ही यावेळी वापरला. निवडणुका अशाच लढवल्या जातात असे अखिलेश म्हणाले. यावेळी सपा आघाडी 300 हून अधिक जागा जिंकत असल्याचा दावा अखिलेश यादव यांनी केला. आणखी सपामध्ये अनेक लोक येणार असल्याचा दावाही अखिलेश यादव यांनी केला. यावेळी जनता भाजपला सातासमुद्रापार फेकून देईल, असे अखिलेश म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी

व्हिडीओ

Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
Embed widget