एक्स्प्लोर

मराठवाड्यात शिवसेना-भाजपमध्ये ‘या’ जागांवर होऊ शकते बंडखोरी

शिवसेना भाजपची युती झाली तर मराठवाड्यातली बंडखोरी हे सेना-भाजपाची 100% डोकेदुखी ठरणार हे निश्चित आहे.

मुंबई : राज्यात शिवसेना भाजप युतीचं त्रांगडं सुटण्याचं नाव घेत नाही. स्थानिक पातळीवरसुद्धा जागांच्या मागणीवरुन शिवसेना भाजपमध्ये चांगलच घमासान सुरु आहे. युती झाली तरी या इच्छूकांना कसं आवरायचं हे मोठं कोडं दोन्ही पक्षासमोर असणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक मतदारसंघामध्ये शिवसेना भाजपा मधील बंडखोरी अटळ आहे. शिवसेना-भाजपची युतीची चिंता उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांना किती आहे माहीत नाही. परंतू गेल्या पाच वर्षांपासून विधानसभा निवडणुकीत गुडघ्याला बाशिंग बांधून उभा असलेल्या दोन्ही पक्षाच्या नेत्याला जरूर आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजपा वेगळी लढली आणि तेव्हापासूनच प्रत्येक मतदारसंघांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी वाढायला सुरुवात झाली. मराठवाड्यातील अनेक मतदारसंघातील भाजपाच्या नेत्यांनी युती होऊ नये म्हणून नेत्यांनी तर देवच पाण्यात ठेवले आहे. मराठवाड्यात 46 जागांपैकी 22 जागांवर शिवसेना-भाजपा युती झाली तरी बंडखोरी अटळ असल्याचे सध्याचे चित्र आणि बंडोबांना थंड करण्याचं  मोठं संकट आहे. VIDEO | शिवसेना-भाजप युतीच्या घोषणेचा मुहूर्त पुन्हा लांबणीवर | ABP Majha मराठवाड्यात बंडखोरी होऊ शकते अशा जागा औरंगाबाद सिल्लोड मतदारसंघात काँग्रेसमधून अब्दुल सत्तार शिवसेनेत दाखल झाले आहेत. ती जागा भाजपची आहे. त्यामुळे भाजपा पाच वर्षांपासून इथे तयारी करते आहे. औरंगाबाद मध्य मतदारसंघासाठी शिवेसनेचे माजी आमदार किशनचंद तनवाणी भाजपमध्ये आले आहेत. आता युती झाली तर ही जागा शिवसेनेला जाईल. त्यामुळे येथे बंडखोरी होण्याची शक्यता आहे. गंगापूर मतदारसंघाची जागा युतीच्या जगावाटपात ही शिवसेनेला आहे. पण 2014 मध्ये भाजपचे प्रशांत बंब आमदार आहेत. त्यामुळे ही जागा जर भाजपला मिळाली तर सेनेचे इच्छुक उमेदवार बंडखोरी करु शकतात. औरंगाबाद पश्चिम या मतदारसंघात विद्यमान आमदार शिनसेनेचा आहे. पण याच मतदारसंघांमध्ये भाजपाच्या एका इच्छुक उमेदवारांने प्रचार कार्यालय देखील उघडले आहे. पैठण मतदारसंघाची जागा शिवसेनेला देण्यात आली आहे. तेथील आमदार सेनेचा आहे, पण येथेही भाजपमधून इच्छुक उमेदवार बंडखोरी करु शकतात. बीड बीड मतदारसंघाची जागा शिवसेना भाजपच्या जुन्या फॉर्म्युल्यानुसार ही जागा शिवसेनेच्या वाट्याला येतं आहे. याच जागेवर राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर यांना शिवनसेनेने प्रवेश दिला. मात्र या जागेवरुन शिवसंग्रामचे विनायक मेटे 2014 ला भाजपाच्या चिन्हावर लढले होते. त्यामुळे येथे बंडखोरी करण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघात शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी एकाच मतदारसंघावर दावा केलाय. त्यामुळे या मतदारसमघात बंडखोरीची चिन्ह आहे. परभणी परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार राहुल पाटील असतांना भाजपचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे भाजपकडून उमेदवारी मागत आहेत. आनंद भरोसे आणि राहुल पाटील यांच्यात व्यावसायिक व्यवहारातून वितुष्ट आलेलं आहे. त्यामुळे दोघेही एकमेकांविरोधात शड्डू ठोकून उभे आहेत. युती झाल्यास दोघांपैकी एकाला या जागेवर पाणी सोडावे लागणार आहे. गंगाखेड मतदारसंघ युतीत रासप कडे आहे. मागच्यावेळी रत्नाकर गुट्टे यांनी येथून रासपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती, पण गुट्टे शेतकर्यांच्या नावे बोगस कर्ज उचलल्याप्रकरणी तुरुंगात आहे. त्यामुळे आता या जागेवर भाजप आणि शिवसेना आपला हक्क सांगत आहेत. हिंगोली  हिंगोली जिल्ह्यातील वसमत मतदारसंघ युतीत शिवसेनेच्या वाट्याला आलेला असताना भाजपचे शिवाजी जाधव येथून उमेदवारी मागत आहेत. पक्षश्रेष्टींनी तसा लोकसभेवेळी त्यांना शब्द देऊन बंडखोरी पासून शमविले होते. पण यावेळी भाजप बंडखोरी कितपतं रोखू शकते हे पाहावे लागणार आहे. हिंगोलीतील कळमनुरी मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. पण शिवसेनेचे माजी आमदार गजानन घुगे भाजपात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना कळमनुरीची जागा त्यांच्यासाठी सोडवून घेऊ असा शब्द दिला होता.  त्यामुळे आता या जागेसाठीही रस्सीखेच सुरू आहे. नांदेड नांदेडमध्येही शिवसेना आणि भाजपात जागावाटपासाठी रस्सीखेच सुरु आहे. नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर या दोन्ही मतदार संघावर शिवसेनेचा दावा आहे, यापैकी एकतरी जागा भाजपाला सोडावी यासाठी भाजपा प्रयत्न करत आहे. जालना जालन्यात बदनापूर मतदारसंघ  युती असताना आधी शिवसेनेकडे होता. 2014 च्या निवडणुकीत स्वबळावर निवडणूक झाल्याने भाजपचे नारायन कुचे येथून निवडून आले. आता या मतदार संघावर पुन्हा भाजपने आणि शिवसेनेने दावा ठोकला आहे. उस्मानाबाद उस्मानाबादेत राणा पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर उस्मानाबाद मतदारसंघासाठी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे. शिवसेना आम्ही या जागेसाठी प्रबळ दावेदार असल्याचं सांगतायेत. त्यांना ओमराजे निंबाळकरांचे बळ आहे. Shivsena BJP Alliance | शिवसेना-भाजप जागावाटपाबाबत तोडगा निघाला तरच उद्या युतीची घोषणा- सूत्र | ABP Majha शिवसेना भाजपाच्या युतीच्या घोषणेनंतर नाराजांना जवळ करता येईल या हेतूने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस न काही मतदारसंघातील उमेदवार घोषित केले नाहीत. एमआयएमलाही असं वाटतं की मराठवाड्यात यश मिळवायचं असेल तर सेना-भाजपा वेगळी लढली पाहिजे किंवा बंडखोरी झाली पाहिजे. भाजपातील अनेक नेत्यांना वाटतंय की युती झाली नाही पाहिजे, म्हणजे संधी मिळेल. शिवसेना भाजपची युती झाली तर मराठवाड्यातली बंडखोरी हे सेना-भाजपाची 100% डोकेदुखी ठरणार हे निश्चित आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gujarat Local Body Election Results 2026: क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या बहिणीचा राजकोट महापालिकेत पराभव; भाजपने राखला बालेकिल्ला, काँग्रेसला धक्का
क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या बहिणीचा राजकोट महापालिकेत पराभव; भाजपने राखला बालेकिल्ला, काँग्रेसला धक्का
West Bengal Election 2026: मतदानापूर्वी युपीचा एन्काऊंटर स्पेशालिस्ट पश्चिम बंगालमध्ये, ममता बॅनर्जींच्या खास माणसाला वॉर्निंग, महुआ मोईत्रांनी एका वाक्यात 'हिरोगिरी'...
मतदानापूर्वी युपीचा एन्काऊंटर स्पेशालिस्ट पश्चिम बंगालमध्ये, ममता बॅनर्जींच्या खास माणसाला वॉर्निंग, महुआ मोईत्रांनी एका वाक्यात 'हिरोगिरी'...
पक्ष संघटनेसाठी नीलम गोऱ्हेंनी काहीही केलं नाही, त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊ नये, महिला आघाडीचं एकनाथ शिंदेंना पत्र 
पक्ष संघटनेसाठी नीलम गोऱ्हेंनी काहीही केलं नाही, त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊ नये, महिला आघाडीचं एकनाथ शिंदेंना पत्र 
Bacchu Kadu And Eknath Shinde: प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन होणार?; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी मोठ्या घडामोडी, एकनाथ शिंदे-बच्चू कडूंच्या भेटीत काय काय घडलं?
प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन होणार?; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी मोठ्या घडामोडी, एकनाथ शिंदे-बच्चू कडूंच्या भेटीत काय काय घडलं?

व्हिडीओ

Rohit Pawar Special Report : अजितदादांच्या तिन्ही घरांच्या बाहेर काळीजादू, रोहित पवारांचा गंभीर आरोप
Salim Dola Special Report : सलीम डोला भारतात, दाऊदच्या कंपनीला मोठा धक्का
Vidhan Parishad  BJP Candidate List : विधान परिषदेसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर
Devendra Fadnavis PC : शिवरायांचा कुणीही अपमान करू शकत नाही, गरज नसताना वाद सुरू करण्यात आला
Rohit Pawar PC : पैशांची उलाढाल,दादांच्या घराबाहेर काळी पूजा,खरातचा संबंध,रोहित पवारांचे स्फोटक आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! भाजपकडून विधानपरिषदेसाठी 5 उमेदवारांची यादी जाहीर; विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव यांचेही नाव
मोठी बातमी! भाजपकडून विधानपरिषदेसाठी 5 उमेदवारांची यादी जाहीर; विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव यांचेही नाव
कोल्हापूर व्हिडिओ कांड, शाहिदच्या मित्राला कराडमधून अटक; पोलीस तपासात आणखी व्हिडिओ, आणखी गुन्हा दाखल
कोल्हापूर व्हिडिओ कांड, शाहिदच्या मित्राला कराडमधून अटक; पोलीस तपासात आणखी व्हिडिओ, आणखी गुन्हा दाखल
Mhada Lottery 2026: मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ, सोडत कधी?
मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ, सोडत कधी?
ह्रदयद्रावक... मुलींना वाचविण्यासाठी वडिलांचीही नदी पात्रात उडी; नदीवर कपडे धुवायला गेलेल्या तिघांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... मुलींना वाचविण्यासाठी वडिलांचीही नदी पात्रात उडी; नदीवर कपडे धुवायला गेलेल्या तिघांचा मृत्यू
महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
अनंत अंबानी यांचं कोलंबियातील पाणघोड्यांचे प्राण वाचवण्याचं आवाहन, वनतारामध्ये आश्रयस्थान निर्माण करुन देण्याचा प्रस्ताव
अनंत अंबानी यांचं कोलंबियातील पाणघोड्यांचे प्राण वाचवण्याचं आवाहन, वनतारामध्ये आश्रयस्थान निर्माण करुन देण्याचा प्रस्ताव
Eknath Shinde : विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस बाकी, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, शिवसेना कोणाला संधी देणार?
पक्षांतर्गत नाराजी, नेत्यांची वक्तव्य ते विधानपरिषदेची उमेदवार निवड, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
Embed widget