एक्स्प्लोर

स्वाभिमानाला धक्का पोहोचला म्हणून छत्रपती शिवराय दिल्ली दरबारातून उठून गेले मात्र आज?, शरद पवारांचा उदयनराजेंना टोला

आजच्या काळात ज्यांच्या हातात सत्ता आहे ते शेतकऱ्यांना कवडीची किंमत देत नाही. जे काळ्या आईशी इमान राखतात त्यांना जर हे मदत करत नसतील तर यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असे पवार म्हणाले.

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अख्ख्या जगाला अभिमान आहे. गादीचा अभिमान आहे. पुरंदर किल्ल्याचा तह झाला. त्यावेळी मिर्झाराजे आले पण छत्रपतींनी किल्ले सोडले नाहीत. छत्रपतींना दिल्लीत चुकीची वागणूक दिली गेली. आपल्या स्वाभिमानाकरीता महाराज तिथून उठून गेले. दिल्लीत स्वाभिमानाला धक्का पोहोचला म्हणून महाराजांनी सहन केले नाही मात्र आज? असा प्रश्न करत उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांना लगावला. या सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला. महाराजांचे गडकिल्ले भाड्याने देण्याचा. आता शौर्याचे प्रतीक असलेल्या आपल्या महाराजांच्या किल्ल्यात छमछम होणार आहे हे काय चालले आहे असा संतप्त सवालही शरद पवार यांनी सरकारला केला. आजच्या काळात ज्यांच्या हातात सत्ता आहे ते शेतकऱ्यांना कवडीची किंमत देत नाही. जे काळ्या आईशी इमान राखतात त्यांना जर हे मदत करत नसतील तर यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असे पवार म्हणाले. स्वातंत्र्यानंतर भारतावर पाकिस्तान, बांग्लादेश, चीनकडून हल्ले झाले मात्र या भागातील जन्मलेल्या जवानांनी ते हल्ले परतवून लावले. महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते यशवंतराव चव्हाण याच मातीतले त्यामुळे मला माहिती आहे हा जिल्हा विचारांशी प्रतारणा करणार नाही आणि जो करेल त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आज ती परिस्थिती जन्माला आली आहे ज्यांनी विचारांशी प्रतारणा केली त्यांना धडा शिकवल्याशिवाय आपण स्वस्त बसायचे नाही असे आवाहनही पवार यांनी केले. मला सातारकरांना अंतःकरणातून धन्यवाद द्यायचे आहे. साताऱ्यात आल्यानंतर त्यांनी मोठ्या जल्लोषात माझे स्वागत केले. सातारा जिल्ह्याने नेहमीच देशाच्या हितासाठी काम केले. सातारला स्वातंत्र्य लढ्याचा मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्यासाठी अनेकांनी इथे प्राणाची आहुती दिली आहे असेही  पवार म्हणाले. आज कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती आहे. त्यांनी मुलांना शिकवले एक पिढी घडवली मात्र आज काय परिस्थिती आहे. मुलं शिकली आहेत मात्र मुलांना रोजगार नाही. मुलांना पाहुणे बघायला येतात मात्र नोकरीच नसल्याने माघारी परततात हे तरुणांचे दु:ख शरद पवार यांनी सांगितले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rajya Sabha Election 2026 Sharad Pawar: राज्यसभा निवडणुकीचा सस्पेन्स कायम, शरद पवारांचे मौन; उमेदवारीचा चेंडू मविआच्या कोर्टात टाकला, नेमकी कुणाला संधी मिळणार?
राज्यसभा निवडणुकीचा सस्पेन्स कायम, शरद पवारांचे मौन; उमेदवारीचा चेंडू मविआच्या कोर्टात टाकला, नेमकी कुणाला संधी मिळणार?
Vidhan parishard Leader : राज्यसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेत विरोधी पक्षनेता निवडणार? भाजपची मोठी खेळी, दानवेंच्या जागी 'या' काँग्रेस नेत्याच्या नावाची चर्चा
राज्यसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेत विरोधी पक्षनेता निवडणार? भाजपची मोठी खेळी, दानवेंच्या जागी 'या' काँग्रेस नेत्याच्या नावाची चर्चा
Rajya Sabha Election 2026: राज्यसभेची जागा शिवसेनेला सोडण्यासाठी आदित्य ठाकरेंचा आग्रह, शशिकांत शिंदे म्हणाले, 'शरद पवारांचं नाव पुढे आल्यावर...'
राज्यसभेची जागा शिवसेनेला सोडण्यासाठी आदित्य ठाकरेंचा आग्रह, शशिकांत शिंदे म्हणाले, 'शरद पवारांचं नाव पुढे आल्यावर...'
Ajit Pawar and Sunetra Pawar Baramati: अजितदादांची बारामती सुनेत्रा पवारच सांभाळणार, बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
अजितदादांची बारामती सुनेत्रा पवारच सांभाळणार, बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

व्हिडीओ

Solapur News : पत्नीला छळणाऱ्या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून दाम्पत्याने संपवलं जीवन
Arvind Kejriwal Special Report : सत्तेसाठी भाजपनं बदनाम केल्याचा केजरीवालांचा आरोप
Shikhar Bank Scam : 25 हजार कोटींचा घपला, कोणीच दोषी नाही, कोर्टानेही स्वीकारला क्लोजर रिपोर्ट
Devendra Fadnavis : मुंबईला बापाची मालमत्ता मानणाऱ्यांना कधी ना कधी उत्तर द्यावंच लागेल- फडणवीस
Nagpur 12 Exam : नागपूरच्या वैशाली नगरच्या सक्सेस क्लासच्या पेपरफुटी प्रकरणात सहभाग

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pakistan Afghanistan War: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या रक्तरंजित संघर्षात 300 जणांचा जीव गेला, 500 जखमी; युद्धजन्य परिस्थिती का निर्माण झाली??
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या रक्तरंजित संघर्षात 300 जणांचा जीव गेला, 500 जखमी; युद्धजन्य परिस्थिती का निर्माण झाली??
Amol Mitkari: 'ज्या घरातील एक व्यक्ती गेली तो का स्टंट करेल? जर तुम्हाला चमकोगिरी वाटत असेल तर..' अमोल मिटकरींचा धनंजय मुंडेंना घरचा आहेर
'ज्या घरातील एक व्यक्ती गेली तो का स्टंट करेल? जर तुम्हाला चमकोगिरी वाटत असेल तर..' अमोल मिटकरींचा धनंजय मुंडेंना घरचा आहेर
Bolivia Plane Crash: मध्यवर्ती बँकेच्या नोटांनी भरलेलं विमान क्रॅश होऊन थेट हायवेवर आदळलं,15 जणांच्या अक्षरश: चिंधड्या, 30 जखमी; डझनभर वाहनांचा चक्काचूर अन् लोक नोटा गोळा करण्यात गुंग
Video: मध्यवर्ती बँकेच्या नोटांनी भरलेलं विमान क्रॅश होऊन थेट हायवेवर आदळलं,15 जणांच्या अक्षरश: चिंधड्या, 30 जखमी; डझनभर वाहनांचा चक्काचूर अन् लोक नोटा गोळा करण्यात गुंग
Palghar News: हृदयद्रावक! पोहण्याचा मोह जीवावर बेतला; बंद दगड खाणीत बुडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू, पालघर हळहळलं
हृदयद्रावक! पोहण्याचा मोह जीवावर बेतला; बंद दगड खाणीत बुडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू, पालघर हळहळलं
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray: ठाकरे बंधू एकत्र येऊनही मुंबई का जिंकू शकले नाही? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'मराठी माणूस...'
ठाकरे बंधू एकत्र येऊनही मुंबई का जिंकू शकले नाही? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'मराठी माणूस...'
Devendra Fadnavis On Ajit Pawar: सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची तारीख कुणी ठरवली?; देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच केला खुलासा
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची तारीख कुणी ठरवली?; देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच केला खुलासा
Gadchiroli News: दुचाकीला डुक्कराची धडक, गडचिरोली नगरपालिकेतील भाजपच्या आरोग्य सभापतींचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
दुचाकीला डुक्कराची धडक, नगरपालिकेतील भाजपच्या आरोग्य सभापतींचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
Radhmika Vijay Wedding: विजय-रश्मिकाच्या लग्नाचा सुवर्णथाट! राजेशाही दिमाखात पौराणिक दागिन्यांचा लूक, तब्बल 300 दिवस चाललेलं काम
विजय-रश्मिकाच्या लग्नाचा सुवर्णथाट! राजेशाही दिमाखात पौराणिक दागिन्यांचा लूक, तब्बल 300 दिवस चाललेलं काम
Embed widget