एक्स्प्लोर

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर निवडणुकीच्या मैदानात, अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून लढवणार निवडणूक

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. संजीव भोर यांनी शहरात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनंतर भोर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

अहमदनगर : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. संजीव भोर यांनी शहरात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनंतर भोर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीसाठी उभे असलेले संग्राम जगताप आणि सुजय विखे हे धनदांडगे असल्याचा आरोपही संजीव भोर यांनी केला आहे. एवढेच नाही तर जनतेला त्यांचे प्रश्न मांडणारा उमेदवार हवाय आणि तो आपण स्वतः असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. आपण अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यात बैठका घेतल्या. समाजाच्या सर्व घटकातील लोकांचं मत आम्ही जाणून घेतलं. प्रस्थापितांच्या विरोधात लढाई लढली पाहिजे, असं मत सर्व घटकातील लोकांकडून मिळालं. म्हणून शेतकरी, कष्टकरी, पिचलेल्या समाजाचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी मी पुढे येत असल्याचं संजीव भोर यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी नाव न घेता युतीचे उमेदवार सुजय विखे आणि आघाडीचे संग्राम जगताप यांच्यावर हल्लाबोल केला. युती आणि आघाडीचे दोन्ही उमेदवार हे धनदांडदे आणि प्रस्थापित आहेत. घराणेशाहीचे वारसदार आहेत. अनेक वर्षांपासून यांच्याच घरात सत्ता आहे, राजकीय पदे आहेत. मात्र सर्व सामान्य समाजाला आणि शेतकऱ्यांना हे लोक न्याय देऊ शकले नाही, असा घणाघात संजीव भोर यांनी केला. अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी प्रकरण आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे संजीव भोर राज्याला परिचित झाले. लाखोंच्या संख्येत मराठा समाजाच्या प्रश्नासाठी 50 पेक्षा जास्त मोर्चे काढण्यात आले होते. या मोर्च्याचे संजीव भोर समन्वयक आहेत. आता भोर निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे अहमदनगर येथे मराठा क्रांती मोर्चा निवडणुकीचा मुद्दा होणार, अस चित्र आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
मुंबईतील विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, उद्धव ठाकरेंना भेटणार
मुंबईतील विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, उद्धव ठाकरेंना भेटणार
Dharmveer Gad : 'धर्मवीर गड' आता राज्य संरक्षित स्मारक घोषित, याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंना छळलं, पराक्रमाच्या स्मृतींचे संवर्धन होणार
'धर्मवीर गड' आता राज्य संरक्षित स्मारक घोषित, याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंना छळलं, पराक्रमाच्या स्मृतींचे संवर्धन होणार

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
मुंबईतील विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, उद्धव ठाकरेंना भेटणार
मुंबईतील विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, उद्धव ठाकरेंना भेटणार
Dharmveer Gad : 'धर्मवीर गड' आता राज्य संरक्षित स्मारक घोषित, याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंना छळलं, पराक्रमाच्या स्मृतींचे संवर्धन होणार
'धर्मवीर गड' आता राज्य संरक्षित स्मारक घोषित, याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंना छळलं, पराक्रमाच्या स्मृतींचे संवर्धन होणार
मन हेलावणारी दुर्घटना; रिक्षा अन् पिकअपचा भीषण अपघात, आईसह दोन लहानग्यांचा मृत्यू, परिसरात हळहळ
मन हेलावणारी दुर्घटना; रिक्षा अन् पिकअपचा भीषण अपघात, आईसह दोन लहानग्यांचा मृत्यू, परिसरात हळहळ
LPG Refill Booking : ग्रामीण भागातील एलपीजी ग्राहकांना दिलासा, गॅस सिलेंडर बुकिंगच्या 45 दिवसांच्या नियमात बदल, नवी अपडेट जाणून घ्या
ग्रामीण भागातील एलपीजी ग्राहकांना दिलासा, गॅस सिलेंडर बुकिंगच्या 45 दिवसांच्या नियमात बदल, नवी अपडेट जाणून घ्या
Radha Patil: नृत्यांगणा राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा; पुण्यातील दहीहंडी कार्यक्रम अंगलट; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
नृत्यांगणा राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा; पुण्यातील दहीहंडी कार्यक्रम अंगलट; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
IAS दिव्या मित्तल यांचा तडकाफडकी राजीनामा ताजा असतानाच आता आणखी एका महिला IAS अधिकाऱ्याने मनातील सल बोलून दाखवली; म्हणाल्या, 'आता फक्त 50 दिवसात, वर्षात चारवेळा ट्रान्सफर अन्..'
IAS दिव्या मित्तल यांचा तडकाफडकी राजीनामा ताजा असतानाच आता आणखी एका महिला IAS अधिकाऱ्याने मनातील सल बोलून दाखवली; म्हणाल्या, 'आता फक्त 50 दिवसात, वर्षात चारवेळा ट्रान्सफर अन्..'
Embed widget