एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्याना भुईमुगाच्या शेंगा कुठं येतात हे माहितीय का? : रावसाहेब दानवे

नांदेड : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जाहीर सभेत महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

नांदेड : सध्या निवडणुकांचे वातावरण आहे. त्यामुळे निवडणुका, उमेदवारी, अशा गोष्टींना उधाण आले आहे. अशातच आज देगदूर पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणी एक जाहीर सभा घेतली. त्या जाहीर सभेत व्यासपीठावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री भागवत खोपा, भाजप नेते आशिष शेलार, माजी मंत्री बबनराव लोणीकर, खासदार प्रताप पाटील चिखलीकर उपस्थित होते. 

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जाहीर सभेत महाविकास आघाडीवर टीका केली. "महाविकास आघाडी सरकार घोटाळेबाज आणि दगाबाज आहेत. सरकारमधील प्रत्येक विभाग मंत्री चालवत नसून दलाल चालवीत आहेत अशी घणाघाती टीका करत सरकार शेतकरी, मजूर, बाराबलुतेदार व सर्वसामान्यांचे नसून सत्तेसाठी एकत्र आलेल्यांचे असल्याची टीका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे". 

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पुढे म्हणाले, "अडीच वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेचं आणि शेतकऱ्यांचं काय भलं केलं ते सांगावं" असा सरळ प्रश्न विचारुन तीन वेळा अतिवृष्टी झाली, पंचनामे झाले पण शेतकऱ्यांना काय मिळाले हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे. असा खडा सवाल केला. मुख्यमंत्र्यांना भुईमुगाच्या शेंगा भुईला येतात आणि कणसे कुठे येतात हे माहीत नाही तर त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न कसे समजतील. महाराष्ट्रात अतिवृष्टीने एवढे नुकसान केले आहे. तरी मुख्यमंत्र्यांनी साधी पाहणी केली नाही. त्यांना शेतकऱ्यांचे नुकसान कसे कळेल, असा प्रश्न रावसाहेबांनी उपस्थित केला. 

ईडीच्या धाडीबद्दल बोलताना रावसाहेब म्हणाले, तुम्ही चोऱ्या केल्या म्हणून धाडी पडत आहेत. तुमचे पाप केंद्राच्या माथी मारू नका. जनता सगळं पाहत आहे, त्यामुळे पंढरपूरनंतर आता देगलूरची चर्चा होईल. काहीही झाले की आपण काही काही करायचे नाही आणि केंद्राकडे बोट दाखवायचे हे आता बंद करा. 

मोदी सरकार शेतकऱ्यांचा सन्मान करते. कित्येक योजना मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी राबवित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात. त्यामुळे मध्ये कोणीही येत नाही. मोदी सरकारला शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी बांधीलकी आहे. त्यांच्यासाठी ते कटिबद्ध आहेत. निवडणुकीत भाजपचेच सराकर जिंकणार आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा मिळेल. असे मत रावसाहेबांनी व्यक्त  केले. सुभाष साबणेंवर रावसाहेब म्हणाले, सुभाष दावणे हे सर्व सामान्यांचे प्रतिनिधी आहेत. त्यांचा विजय मोठाच असेल असा विश्वास रावसाहेबांनी व्यक्त केला. 

रावसाहेबांनी मुख्यमंत्र्यांबाबत सडेतोड भाष्य केले, मुख्यमंत्र्यांना भुईमुगाच्या शेंगा जमिनीत येतात का झाडाला लागतात हे माहीत आहे का? महाराष्ट्रात अतिवृष्टीने एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना मुख्यमंत्री घराबाहेर का निघत नाहीत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
शेवाळे, किर्तीकर, अडसुळांपासून अनेक इच्छुक; पण उमेदवारी न मागणाऱ्या वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं, एकनाथ शिंदेंनी नेमकं कारण सांगितलं!
शेवाळे, किर्तीकर, अडसुळांपासून अनेक इच्छुक; पण उमेदवारी न मागणाऱ्या वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं, एकनाथ शिंदेंनी नेमकं कारण सांगितलं!
मोठी बातमी : शरद पवार स्वत: आले नाहीत, निवडणूक अधिकाऱ्यांकडून घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना
शरद पवार स्वत: आले नाहीत, निवडणूक अधिकाऱ्यांकडून घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना
Rajya Sabha Election 2026: राजकारण कोळून प्यायलेल्या ज्येष्ठ नेत्यांना डावलून एकनाथ शिंदेंनी ज्योती वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी का दिली? संजय शिरसाटांनी सांगितलं पडद्यामागचं राज'कारण'
राजकारण कोळून प्यायलेल्या ज्येष्ठ नेत्यांना डावलून एकनाथ शिंदेंनी ज्योती वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी का दिली? संजय शिरसाटांनी सांगितलं पडद्यामागचं राज'कारण'

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Embed widget