एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्याना भुईमुगाच्या शेंगा कुठं येतात हे माहितीय का? : रावसाहेब दानवे

नांदेड : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जाहीर सभेत महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

नांदेड : सध्या निवडणुकांचे वातावरण आहे. त्यामुळे निवडणुका, उमेदवारी, अशा गोष्टींना उधाण आले आहे. अशातच आज देगदूर पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणी एक जाहीर सभा घेतली. त्या जाहीर सभेत व्यासपीठावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री भागवत खोपा, भाजप नेते आशिष शेलार, माजी मंत्री बबनराव लोणीकर, खासदार प्रताप पाटील चिखलीकर उपस्थित होते. 

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जाहीर सभेत महाविकास आघाडीवर टीका केली. "महाविकास आघाडी सरकार घोटाळेबाज आणि दगाबाज आहेत. सरकारमधील प्रत्येक विभाग मंत्री चालवत नसून दलाल चालवीत आहेत अशी घणाघाती टीका करत सरकार शेतकरी, मजूर, बाराबलुतेदार व सर्वसामान्यांचे नसून सत्तेसाठी एकत्र आलेल्यांचे असल्याची टीका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे". 

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पुढे म्हणाले, "अडीच वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेचं आणि शेतकऱ्यांचं काय भलं केलं ते सांगावं" असा सरळ प्रश्न विचारुन तीन वेळा अतिवृष्टी झाली, पंचनामे झाले पण शेतकऱ्यांना काय मिळाले हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे. असा खडा सवाल केला. मुख्यमंत्र्यांना भुईमुगाच्या शेंगा भुईला येतात आणि कणसे कुठे येतात हे माहीत नाही तर त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न कसे समजतील. महाराष्ट्रात अतिवृष्टीने एवढे नुकसान केले आहे. तरी मुख्यमंत्र्यांनी साधी पाहणी केली नाही. त्यांना शेतकऱ्यांचे नुकसान कसे कळेल, असा प्रश्न रावसाहेबांनी उपस्थित केला. 

ईडीच्या धाडीबद्दल बोलताना रावसाहेब म्हणाले, तुम्ही चोऱ्या केल्या म्हणून धाडी पडत आहेत. तुमचे पाप केंद्राच्या माथी मारू नका. जनता सगळं पाहत आहे, त्यामुळे पंढरपूरनंतर आता देगलूरची चर्चा होईल. काहीही झाले की आपण काही काही करायचे नाही आणि केंद्राकडे बोट दाखवायचे हे आता बंद करा. 

मोदी सरकार शेतकऱ्यांचा सन्मान करते. कित्येक योजना मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी राबवित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात. त्यामुळे मध्ये कोणीही येत नाही. मोदी सरकारला शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी बांधीलकी आहे. त्यांच्यासाठी ते कटिबद्ध आहेत. निवडणुकीत भाजपचेच सराकर जिंकणार आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा मिळेल. असे मत रावसाहेबांनी व्यक्त  केले. सुभाष साबणेंवर रावसाहेब म्हणाले, सुभाष दावणे हे सर्व सामान्यांचे प्रतिनिधी आहेत. त्यांचा विजय मोठाच असेल असा विश्वास रावसाहेबांनी व्यक्त केला. 

रावसाहेबांनी मुख्यमंत्र्यांबाबत सडेतोड भाष्य केले, मुख्यमंत्र्यांना भुईमुगाच्या शेंगा जमिनीत येतात का झाडाला लागतात हे माहीत आहे का? महाराष्ट्रात अतिवृष्टीने एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना मुख्यमंत्री घराबाहेर का निघत नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या

Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
Uddhav Thackeray : एका राजीनाम्यानं चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल, सरकार बदलत नाही तोपर्यंत आयुष्य बदलणार नाही : उद्धव ठाकरे
भाषण करायला नाही युवा शक्तीला नमन करायला आलोय, उद्धव ठाकरेंच्या जंतरमंतरवरील भाषणाला जोरदार प्रतिसाद

व्हिडीओ

Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
Uddhav Thackeray : एका राजीनाम्यानं चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल, सरकार बदलत नाही तोपर्यंत आयुष्य बदलणार नाही : उद्धव ठाकरे
भाषण करायला नाही युवा शक्तीला नमन करायला आलोय, उद्धव ठाकरेंच्या जंतरमंतरवरील भाषणाला जोरदार प्रतिसाद
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
Embed widget