एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्याना भुईमुगाच्या शेंगा कुठं येतात हे माहितीय का? : रावसाहेब दानवे

नांदेड : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जाहीर सभेत महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

नांदेड : सध्या निवडणुकांचे वातावरण आहे. त्यामुळे निवडणुका, उमेदवारी, अशा गोष्टींना उधाण आले आहे. अशातच आज देगदूर पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणी एक जाहीर सभा घेतली. त्या जाहीर सभेत व्यासपीठावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री भागवत खोपा, भाजप नेते आशिष शेलार, माजी मंत्री बबनराव लोणीकर, खासदार प्रताप पाटील चिखलीकर उपस्थित होते. 

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जाहीर सभेत महाविकास आघाडीवर टीका केली. "महाविकास आघाडी सरकार घोटाळेबाज आणि दगाबाज आहेत. सरकारमधील प्रत्येक विभाग मंत्री चालवत नसून दलाल चालवीत आहेत अशी घणाघाती टीका करत सरकार शेतकरी, मजूर, बाराबलुतेदार व सर्वसामान्यांचे नसून सत्तेसाठी एकत्र आलेल्यांचे असल्याची टीका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे". 

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पुढे म्हणाले, "अडीच वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेचं आणि शेतकऱ्यांचं काय भलं केलं ते सांगावं" असा सरळ प्रश्न विचारुन तीन वेळा अतिवृष्टी झाली, पंचनामे झाले पण शेतकऱ्यांना काय मिळाले हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे. असा खडा सवाल केला. मुख्यमंत्र्यांना भुईमुगाच्या शेंगा भुईला येतात आणि कणसे कुठे येतात हे माहीत नाही तर त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न कसे समजतील. महाराष्ट्रात अतिवृष्टीने एवढे नुकसान केले आहे. तरी मुख्यमंत्र्यांनी साधी पाहणी केली नाही. त्यांना शेतकऱ्यांचे नुकसान कसे कळेल, असा प्रश्न रावसाहेबांनी उपस्थित केला. 

ईडीच्या धाडीबद्दल बोलताना रावसाहेब म्हणाले, तुम्ही चोऱ्या केल्या म्हणून धाडी पडत आहेत. तुमचे पाप केंद्राच्या माथी मारू नका. जनता सगळं पाहत आहे, त्यामुळे पंढरपूरनंतर आता देगलूरची चर्चा होईल. काहीही झाले की आपण काही काही करायचे नाही आणि केंद्राकडे बोट दाखवायचे हे आता बंद करा. 

मोदी सरकार शेतकऱ्यांचा सन्मान करते. कित्येक योजना मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी राबवित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात. त्यामुळे मध्ये कोणीही येत नाही. मोदी सरकारला शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी बांधीलकी आहे. त्यांच्यासाठी ते कटिबद्ध आहेत. निवडणुकीत भाजपचेच सराकर जिंकणार आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा मिळेल. असे मत रावसाहेबांनी व्यक्त  केले. सुभाष साबणेंवर रावसाहेब म्हणाले, सुभाष दावणे हे सर्व सामान्यांचे प्रतिनिधी आहेत. त्यांचा विजय मोठाच असेल असा विश्वास रावसाहेबांनी व्यक्त केला. 

रावसाहेबांनी मुख्यमंत्र्यांबाबत सडेतोड भाष्य केले, मुख्यमंत्र्यांना भुईमुगाच्या शेंगा जमिनीत येतात का झाडाला लागतात हे माहीत आहे का? महाराष्ट्रात अतिवृष्टीने एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना मुख्यमंत्री घराबाहेर का निघत नाहीत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Full : महायुतीचा जोमात प्रचार, मविआचे बडे नेते मात्र प्रचारापासून दूरच; कारण काय?
Mahapalikecha Mahasangram Bhusawal:भुसावळ-नगरपरिषदेचा महासंग्राम, नराध्यक्षांकडून नागरिकांना अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Alibag : निवडणुकीबाबत काय वाटतं अलिबागकरांना? शेकाप पुन्हा सत्ता राखणार?
Mahapalikecha Mahasangram Dharashiv : धाराशीव शहरातील रिक्षा चालकांना निवडणुकीबाबत काय वाटतं?
Anjali Damania PC : 24 तासांत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही तर...

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
Imran Khan : इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा! भेटीवर बंदी अन् बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज, पाकिस्तानात खळबळ
इम्रान खान कुठे आहेत? तुरुंगातच मृत्यू झाल्याच्या अफवा, पाकिस्तानमध्ये खळबळ, कुटुंबीयांना भेट घेण्यापासून अडवलं
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
Embed widget