एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्याना भुईमुगाच्या शेंगा कुठं येतात हे माहितीय का? : रावसाहेब दानवे

नांदेड : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जाहीर सभेत महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

नांदेड : सध्या निवडणुकांचे वातावरण आहे. त्यामुळे निवडणुका, उमेदवारी, अशा गोष्टींना उधाण आले आहे. अशातच आज देगदूर पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणी एक जाहीर सभा घेतली. त्या जाहीर सभेत व्यासपीठावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री भागवत खोपा, भाजप नेते आशिष शेलार, माजी मंत्री बबनराव लोणीकर, खासदार प्रताप पाटील चिखलीकर उपस्थित होते. 

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जाहीर सभेत महाविकास आघाडीवर टीका केली. "महाविकास आघाडी सरकार घोटाळेबाज आणि दगाबाज आहेत. सरकारमधील प्रत्येक विभाग मंत्री चालवत नसून दलाल चालवीत आहेत अशी घणाघाती टीका करत सरकार शेतकरी, मजूर, बाराबलुतेदार व सर्वसामान्यांचे नसून सत्तेसाठी एकत्र आलेल्यांचे असल्याची टीका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे". 

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पुढे म्हणाले, "अडीच वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेचं आणि शेतकऱ्यांचं काय भलं केलं ते सांगावं" असा सरळ प्रश्न विचारुन तीन वेळा अतिवृष्टी झाली, पंचनामे झाले पण शेतकऱ्यांना काय मिळाले हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे. असा खडा सवाल केला. मुख्यमंत्र्यांना भुईमुगाच्या शेंगा भुईला येतात आणि कणसे कुठे येतात हे माहीत नाही तर त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न कसे समजतील. महाराष्ट्रात अतिवृष्टीने एवढे नुकसान केले आहे. तरी मुख्यमंत्र्यांनी साधी पाहणी केली नाही. त्यांना शेतकऱ्यांचे नुकसान कसे कळेल, असा प्रश्न रावसाहेबांनी उपस्थित केला. 

ईडीच्या धाडीबद्दल बोलताना रावसाहेब म्हणाले, तुम्ही चोऱ्या केल्या म्हणून धाडी पडत आहेत. तुमचे पाप केंद्राच्या माथी मारू नका. जनता सगळं पाहत आहे, त्यामुळे पंढरपूरनंतर आता देगलूरची चर्चा होईल. काहीही झाले की आपण काही काही करायचे नाही आणि केंद्राकडे बोट दाखवायचे हे आता बंद करा. 

मोदी सरकार शेतकऱ्यांचा सन्मान करते. कित्येक योजना मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी राबवित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात. त्यामुळे मध्ये कोणीही येत नाही. मोदी सरकारला शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी बांधीलकी आहे. त्यांच्यासाठी ते कटिबद्ध आहेत. निवडणुकीत भाजपचेच सराकर जिंकणार आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा मिळेल. असे मत रावसाहेबांनी व्यक्त  केले. सुभाष साबणेंवर रावसाहेब म्हणाले, सुभाष दावणे हे सर्व सामान्यांचे प्रतिनिधी आहेत. त्यांचा विजय मोठाच असेल असा विश्वास रावसाहेबांनी व्यक्त केला. 

रावसाहेबांनी मुख्यमंत्र्यांबाबत सडेतोड भाष्य केले, मुख्यमंत्र्यांना भुईमुगाच्या शेंगा जमिनीत येतात का झाडाला लागतात हे माहीत आहे का? महाराष्ट्रात अतिवृष्टीने एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना मुख्यमंत्री घराबाहेर का निघत नाहीत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget