एक्स्प्लोर

Raju Shetti : ज्यांना जायचं होतं त्यांनी केवळ तिसऱ्या आघाडीचे कारण दिले, टोळकं होतं ते निघून गेल्याने आता कार्यकर्ते माझ्याशी खुलेपणाने चर्चा करतील : राजू शेट्टी

Raju Shetti : इतक्या उलथापालथी होऊन सुद्धा संघटनेचा बिल्ला लावून चार ते चार ते पाच आमदार विधानसभेत जातील, असा विश्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये ठाकरे गटातील दोन माजी आमदारांनी प्रवेश केल्याने संघटनेची ताकद वाढली अशी चर्चा होत असतानाच डझनभर पदाधिकाऱ्यांनी संघटनेला सोडचिट्टी दिल्याने पुन्हा एकदा राजू शेट्टी यांच्यासमोर आव्हान ठाकलं आहे. संघटनेमधील बेबनाव सुद्धा समोर येत आहे. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, सावकार मादनाईक यांच्यासह डझनभर पदाधिकाऱ्यांनी स्वाभिमानला सोडचिट्टी दिल्याने मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, इतक्या उलथापालथी होऊन सुद्धा संघटनेचा बिल्ला लावून चार ते चार ते पाच आमदार विधानसभेत जातील, असा विश्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.

शेतकरी चळवळीमध्ये अजूनही धग आहे ती पेटवण्याचा मी प्रयत्न करत आहे

पदाधिकाऱ्यांच्या सोडचिट्टी दिल्यानंतर शेट्टी यांनी आज एबीपी माझाशी संवाद साधला. राजू शेट्टी म्हणाले की, ज्यांना जायचं होतं त्यांनी केवळ तिसऱ्या आघाडीचे कारण दिलं आहे. 20-22 वर्षांपूर्वी माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला त्यावेळी मला शेतकऱ्यांनी वेळेवर रुग्णालयात नेल्याने जीवदान मिळालं. मी इथून पुढील आयुष्य शेतकऱ्यांसाठी काम करायचं ठरवलं आहे. त्यामुळे कारखानदारांना विरोध करत आलो असल्याचे सांगितले. शेतकरी चळवळीमध्ये अजूनही धग आहे ती पेटवण्याचा मी प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. जे माझ्या अवतीभवती टोळकं होतं ते निघून गेले आहे, आता कार्यकर्ते माझ्याशी खुलेपणाने चर्चा करतील असेही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

निवडणुकीच्या काळामध्ये कार्यकर्त्यांना आमिष दाखवले जातात

शेट्टी यांनी सांगितले की महाराष्ट्रामध्ये 200 ते 250 राजकीय घराणी निर्माण झाली आहेत. या प्रस्थापित घराण्यांविरोधात आम्ही उभे राहिलो आहोत. जोपर्यंत तुम्ही चळवळीत आहात तोपर्यंत कार्यकर्ते तुम्हाला पाठिंबा देत असतात. चळवळीपासून दूर गेला की तुम्ही एकटेच दूर जातात. कार्यकर्ते चळवळीसोबत राहतात. जे चळवळला सोडून गेले त्यांच्याभोवती गर्दी होती ती गर्दी केवळ चळवळीची होती. त्यामुळे ते जाताना एकटेच गेले आहेत. चळवळीत दररोज नवीन नवीन चेहरे येत असतात. चळवळ कधीही संपत नसल्याचे ते म्हणाले. समजा उद्या मी काम थांबवलं तरी चळवळ पुढे चालू राहील, पण निवडणुकीच्या काळामध्ये कार्यकर्त्यांना आमिष दाखवले जातात. चळवळीमध्ये राहुन नावारूपाला आलेलं आयतं प्रॉडक्ट राजकीय पक्षांना मिळत असतं. जे सोडून गेले त्यांना अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी म्हटलं की आता आम्हाला आमचं पहावं लागेल, त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या. इतक्या उलथापालथी होऊन सुध्दा संघटनेचा बिल्ला लावून 4 ते 5 आमदार विधानसभेत जातील

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget